भाजपनंतर ठाकरे गटाची मोठी खेळी! विधानपरिषदेसाठी उमेदवाराचे नाव निश्चित, तर महायुतीमध्ये नाराजीचा सूर
Vidhan Parishad Election News In Marathi : राज्यातील लक्षद्वीप विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी उमेदवारांची अधिकृत घोषणा सुरू झाली असून, भाजपनंतर आता ठाकरे यांच्या शिवसेनेतून महाविकास आघाडीच्या उमेदवाराची घोषणा करण्यात आली आहे. विरोधी पक्षनेते आणि शिवसेना नेते अंबादास दानवे याचं नाव यांना विधान परिषदेचे उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी चर्चेत होते. तसेच, काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून त्यांनाच करण्याचा आग्रह केला जात होता. मात्र, अंबादास दानवे ठाकरेंच्या शिवसेनेकडून विधान परिषदेवर जाणार असल्याची माहिती आदित्य ठाकरेंनी पत्रकार परिषदेत दिल्याने आता सस्पेन्स संपला आहे.
राज्यातील विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपने ६ उमेदवार जाहीर केल्यानंतर, आता ठाकरे गटानेही सस्पेन्स संपवला आहे.ठाकरेंच्या शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या जागी आता अंबादास दानवे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. आदित्य ठाकरे यांनी याबाबत माहिती दिली. उद्धव ठाकरे विधान परिषदेचे नेते व्हावेत, अशी महाविकास आघाडीच्या नेत्यांची इच्छा होती. यामध्ये ठाकरे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरे यांच्या निवडीसाठी आग्रह धरला होता.मात्र, आता उद्धव ठाकरे यांनी आपलं वजन अंबादास दानवे यांच्या पारड्यात टाकल्यामुळे, आता ते ठाकरे गटाचे अधिकृत उमेदवार असतील. अंबादास दानवे हे शिवसेनेचे म्हणजेच महाविकास आघाडीचे विधान परिषदेचे उमेदवार असतील, उद्या सकाळी 11 वाजता ते उमेदवारी अर्ज दाखल करतील, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले.
दरम्यान, काही महिन्यांपूर्वीच अंबादास दानवे यांचा कार्यकाळ निश्चित झाला असता. यानंतर, विधान परिषदेतील उद्धव ठाकरे यांचा कार्यकाळ संपल्यानंतर त्यांच्या जागी कोण जाणार याची उत्सुकता सर्वांनाच होती.
विधान परिषदेतील १० जागांसाठी १२ मे रोजी मतदान होणार आहे. १२ मे रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ४ या वेळेत मतदान होईल. तर 12 मे रोजीच निकाल जाहीर होणार आहे.
विधानसभेच्या संख्याबळानुसार, भाजपच्या वट्यालाला ६, शिवसेनेला २, राष्ट्रवादीला १ आणि महाविकास आघाडीला १ जागा मिळेल. विधान परिषदेवर आमदार निवडण्यासाठी २८ मतांचा कोटा आवश्यक असतो.
महायुती भाजप (१३१ आमदार), एकनाथ शिंदे यांची शिवसेना (५७ आमदार) आणि अजित पवार यांचे राष्ट्रवादी (४० आमदार) यांचे संख्याबळ पाहता, महाआघाडीचे ९ उमेदवार सहज निवडून येऊ शकतात. महाविकास आघाडीचे एकूण संख्याबळ ४६ आहे. त्यामुळे त्यांचा केवळ एकच उमेदवार सहज निवडून येऊ शकतो.
दरम्यान, भाजपने विधान परिषदेसाठी ६ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. भाजप संसदीय समितीच्या मंजुरीनंतर, भाजपने महाराष्ट्रातील ५ विधान परिषदांच्या जागांसाठी पाच उमेदवारांची अधिकृत घोषणा केली आहे. त्याचप्रमाणे, विधान परिषदेच्या एका पोटनिवडणुकीसाठी एकूण ६ उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे.
सुनील कर्जतकर,
माधवी नाईक,
संजय भेंडे,
विवेक कोल्हे,
प्रमोद जठार,
प्रज्ञा सावंत
निवडणूक अधिसूचना जारी करण्याची तारीख: २३ एप्रिल २०२६
उमेदवारी अर्ज भरण्याचा अंतिम दिवस: ३० एप्रिल २०२६
उमेदवार छाननी: २ मे २०२६
उमेदवारी अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख: ४ मे २०२६
मतदानाची तारीख: १२ मे २०२६
मतदानाची वेळ: सकाळी ९ ते सायंकाळी ४.
मतमोजणी: १२ मे २०२६ सायंकाळी ५ वाजता
निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याची अंतिम तारीख: १३ मे २०२६






