फोटो सौजन्य- pinterest
एकविरा ही अनेकांची कुलदैवत आहे. विशेषतः कोळी बांधवांची. एकविरा म्हणजे एकमेव गिरी शक्ती, सर्व संकटांवर मात करणारी देवी. एकविरा मंदिराचा इतिहास अतिशय प्राचीन आणि सांस्कृतिदृष्ट्या समृद्ध आहे. हे मंदिर सह्याद्रीच्या डोंगररांगेत बसलेल्या कार्ल्या लेण्याच्या जवळ आहे. या लेण्या इ.स. पूर्व दुसऱ्या शतकात बांधल्या गेल्या असं मानलं जातं. कार्ल्या लेण्या या मुळतः बौद्ध धर्मीय भिक्षुने तयार केल्या होत्या. त्या काळात येथे मोठे व्यापारी मार्ग होते. व्यापारी आणि प्रवासी या लेण्यांमध्ये विश्रांती घेत असतं, असं मानलं जातं की या परिसरात स्थानिक लोक देवीची उपासना करत होते आणि त्यातूनच एकविरा देवीची पूजा सुरू झाली. नंतरच्या काळात विशेषतः सातवाहन आणि त्यानंतरच्या राजवटीत या भागात हिंदू धर्माचा प्रभाव वाढला. त्यावेळी स्थानिक देवीला एकविरा या नावाने ओळख मिळाली आणि तिचं मंदिर डोंगरावरती स्थापित झालं. एकविरा देवीला शक्तीचा अवतार मानलं गेलं आणि तिची पूजा मोठ्य़ा प्रमाणावर सुरू झाली.
मध्ययुगात हे मंदिर अधिक प्रसिद्ध झालं. विविध स्थानिक राजे आणि भक्तांनी मंदिराचं जतन केलं. डोंगरावरती असल्यामुळे मंदिराला नैसर्गिक संरक्षणही मिळालं. दरवर्षी लाखो भाविक येथे येतात. विशेषतः नवरात्र आणि यात्रेच्या काळात येथे भाविकांची खूप गर्दी असते. मुंबई आणि कोकण किनारपट्टीवरील कोळी समाजासाठी एकविरा देवी खूप महत्त्वाची आहे. इतिहासात असं दिसतं की, मच्छीमार लोक देवीला आपले रक्षणकर्ता मानू लागले. त्यामुळे मंदिराला विशेष महत्त्व प्राप्त झाले. आजही कोळी समाजात कोणतंही मोठं कार्य करण्यापूर्वी देवीचे दर्शन घेण्याची परंपरा आहे. कार्ला येथील देवीची पौराणिक कथा काय आहे जाणून घ्या
खूप वर्षांपूर्वी पांडव वनवासात असताना सह्याद्रीच्या डोंगरात फिरत होते. त्या काळात त्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागत होता. भूक, थकवा आणि शत्रूंचा धोका. एकेदिवशी ते कार्ल्याच्या डोंगरावरती आले तेथे त्यांना एक दिव्य शक्ती जाणवली रात्री स्वप्नात त्यांना एक तेजस्वी देवी दिसली तिच देवी एकविरा माता होय. देवीने त्यांना सांगितलं तुम्ही माझी इथे स्थापना करा आणि माझी भक्ती करा मी तुमच्या सर्व संकटांवरती मात करण्यास मदत करेल.
पांडवांनी देवीच्या सांगण्यानुसार डोंगरावरती देवीची स्थापना केली आणि मनापासून पूजा करण्यास सुरुवात केली आणि देवीच्या कृपेने त्यांना पुढील संकटांवरती विजय देखील मिळविता आला तर कोळी समाजातील एक प्रथा फारच प्रचलित आहे ती अशी की, पूर्वी समुद्रात मासेमारी करताना अनेक संकटे येतं. समुद्रातील वादळामुळे बोट बुडण्याची भीती असे. त्यामुळे लोक एकविरा देवीला प्रार्थना करतं. देवी त्यांच्या बोटींना सुरक्षित किनाऱ्यावर आणत अशी लोकांची श्रद्धा बसली. म्हणूनच कोळी समाजाने तिला आपली कुलदैवता मानले आणि कार्ला येथे तिचे मंदिर मोठ्या भक्तीने उभारले.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)
Ans: समुद्रातील संकटांपासून रक्षण करण्यासाठी कोळी बांधव देवीची प्रार्थना करत असत. त्यांच्या श्रद्धेमुळे देवीला रक्षणकर्ती मानून कुलदैवत म्हणून स्वीकारले गेले.
Ans: वनवासात असताना पांडवांना देवीने स्वप्नात दर्शन दिले आणि येथे स्थापना करण्यास सांगितले, अशी कथा प्रचलित आहे.
Ans: ती संकटांवर मात करणारी आणि भक्तांचे रक्षण करणारी शक्तिरूप देवी मानली जाते.






