साडेसातीने पिडित असलेले अनेक भाविक शनिशिंगणापुरात दर्शनासाठी जातात. शनीदेव हे पापी ग्रहांमध्ये मोडले जातात. शनीची पिडा म्हटलं की भल्याभल्यांना याची भिती वाटते. पण पुराणकथांमध्ये असं सांगितलं जातं की, एकदा शिंगणापुरात मुसळधार पाऊस सुरु झाला. यावेळी पावसामुळे नदीला पूर आलेला. या पुराच्या पाण्यात एक दगड वाहत चालला होता. एका मेंढपाळ्याने तो दगड पाहिला त्यातून त्याला रक्तस्त्राव होताना दिसला. मेंढपाळी घाबरला तो तिथून पळाला. त्यानंतर य़ा मेंढपाळ्याच्या स्वप्नात शनीदेव आले आणि म्हणाले गावच्या रक्षणासाठी या दगडाची नित्यनेमाने पूजा केली पाहिजे. मेंढपाळ्याने ही खबर गावात सांगितली. त्यानंतर या दगडाची गावात प्राणप्रतिष्ठापणा करण्यात आली. दगडाला चौथऱ्यात ठेवण्यात आलं. तेव्हापासून गावचा रक्षणकर्ता म्हणून शनीदेवांना पुजलं गेलं.
असं म्हणतात की, शिंगणापूर हे सर्वात जागृत असं देवस्थान आहे. देव गावचं रक्षण करतो म्हणून शिंगणापूर गावात कोणत्याही घरांना दरवाजे नाहीत की कुलुप लागलेलं असतं. कारण गावकऱ्यांना विश्वास आहे की, या ठिकाणी शनीदेवांचं सत्व असल्याने या गावात अघटीत असं काहीच घडणार नाही. आजंही इथल्या कुठल्याच घरांना दरवाजे नाहीत पण आतापर्यंत इथे कधीही चोरी झालेली नाही असं गावकरी सांगतात. अहमदनगर म्हणजेच आताचं अहिल्यानगरातील हे ठिकाण शिर्डीपासून जवळ आहे. जागृत क्षेत्र म्हणून शनि शिंगणापूर हे संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर देश , देशविदेशात देखील परिचित आहे. मंदिराचा कार्यकाळ हा 350 वर्ष प्राचीन आहे. दर शनिवार तसेच शनि अमावस्या व शनी जयंतीच्या वेळी येथे या ठिकाणी विशेष उत्सव साजरा केला जातो. या उत्सवाला लोखोंच्या संख्येने भाविक उपस्थिती देतात.






