फोटो सौजन्य- pinterest
ग्रहांच्या देवतेला सूर्य असे म्हटले जाते. सूर्य आपल्या राशीमध्ये वेळोवेळी बदल करत असतो. त्याच्या या बदलाचा परिणाम प्रत्येक राशीच्या लोकांवर आत्मविश्वास, आदर, सन्मान, सरकारी काम इत्यादींवर चांगला होताना दिसून येतो. काही राशीच्या लोकांना शारीरिक समस्येपासून आराम मिळतो तर काहींना कामामध्ये यश मिळते. तसेच काहींना समाजामध्ये आदर प्रतिष्ठा देखील मिळते. सूर्याच्या राशी बदलामुळे कोणत्या राशीच्या लोकांवर काय परिणाम होणार आहेत ते जाणून घ्या
सूर्य देव दर महिन्याला आपल्या राशीमध्ये बदल करतात. सध्या ते मिथुन राशीमध्ये आहे. आज गुरुवार, 17 जुलै रोजी मिथुन राशी सोडून तो कर्क राशीमध्ये प्रवेश करणार आहे. त्यासोबतच सूर्याचा मित्र चंद्र याने त्याच राशीमध्ये प्रवेश केल्यामुळे त्याचा तीन राशींच्या लोकांवर चांगला परिणाम होताना दिसून येईल. त्या तीन राशी म्हणजे वृषभ, कर्क आणि कन्या.
कर्क राशीमध्ये होणाऱ्या सूर्याच्या संक्रमणाचा सकारात्मक परिणाम वृषभ राशीच्या लोकांवर होणार आहे. या लोकांना कौटुंबिक गोष्टींत यश मिळेल. यामुळे या लोकांच्या नोकरी आणि व्यवसायामध्ये वाढ देखील होईल. त्यासोबतच उत्पन्नाचे स्त्रोत तयार होतील. तसेच या लोकांना शारीरिक आणि समस्येपासून सुटका देखील होईल. हे लोक आपल्या जोडीदारासोबत बाहेर जाण्याचे नियोजन देखील करु शकतात. जे लोक नवीन नोकरीच्या शोधात आहे अशा लोकांना फायदा होऊ शकतो.
सूर्य कर्क राशीत असल्यामुळे या राशीच्या लोकांना सूर्य देवाचा विशेष आशीर्वाद लाभेल. नोकरी करणाऱ्या लोकांना पदोन्नती आणि पगार वाढण्याची शक्यता निर्माण होते. ज्या लोकांचा व्यवसायामध्ये तुम्हाला मोठे काम मिळू शकते त्यामधून तुम्हाला चांगला नफा देखील होऊ शकतो. या लोकांचा समाजामध्ये आदर वाढलेला राहील. जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहे अशा विद्यार्थ्यांना यश मिळेल. ज्या लोकांना दीर्घकाळापासून आजार आहेत अशा लोकांची त्यातून सुटका होईल.
सूर्य देवाची कन्या राशीच्या लोकांवर विशेष कृपा असते. त्यामुळे या लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळते. ज्यामुळे कन्या राशीच्या लोकांची जी अपूर्ण राहिलेली कामे आहेत ती पूर्ण होण्यास मदत होते. त्यासोबतच या लोकांच्या जीवनामध्ये आनंद, समृद्धी आणि संपत्ती वाढेल. तसेच वैवाहिक जीवन देखील आनंदी राहील. शेअर बाजारात गुंतवणूक करणे अधिक फायदेशीर राहील.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)