• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Special Coverage »
  • Victims Of Terrorism Day 2611 Reminds The World Terrorism Is Humanitys Enemy Not Religion

Victims of Terrorism Day : ‘दहशतवादाला धर्म नाही, मानवतेचा शत्रूच’; २६/११ च्या स्मरणातून जगाला संदेश

Victims of Terrorism Day 2025 : भारतातील २६/११ मुंबई हल्ला हे दहशतवादाच्या इतिहासातील एक काळं पान आहे. आणि आज त्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या प्रत्येकाला श्रद्धांजली देण्यसाठी आजचा दिवस आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Aug 21, 2025 | 09:31 AM
Victims of Terrorism Day 26/11 reminds the world Terrorism is humanity’s enemy not religion

Victims of Terrorism Day : 'दहशतवादाला धर्म नाही, मानवतेचा शत्रूच' २६/११ च्या स्मरणातून जगाला संदेश ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

International Day of Remembrance and Tribute to Victims of Terrorism : २१ ऑगस्ट २०२५ रोजी संपूर्ण जगभरात “दहशतवादाच्या बळींच्या स्मरण आणि श्रद्धांजलीचा आंतरराष्ट्रीय दिन” पाळला जाणार आहे. संयुक्त राष्ट्रांनी हा दिवस दहशतवादाने प्रभावित झालेल्या लोकांना सन्मान देण्यासाठी आणि त्यांच्या मानवी हक्कांच्या संरक्षणासाठी समर्पित केला आहे. या दिवशी पीडितांच्या आठवणींना उजाळा देत, जगभरात करुणा, लवचिकता आणि मानवतेच्या मूल्यांचा संदेश दिला जातो.

भारतातील २६/११ मुंबई हल्ला हे दहशतवादाच्या इतिहासातील एक काळं पान आहे. २६ नोव्हेंबर २००८ रोजी फक्त १० दहशतवाद्यांनी मुंबईवर रक्तरंजित हल्ला केला. या भीषण कारवाईत १६६ निरपराध नागरिकांचा जीव गेला आणि शेकडो लोक गंभीर जखमी झाले. ताजमहाल हॉटेल, छत्रपती शिवाजी टर्मिनस, नरीमन हाऊस अशा प्रमुख ठिकाणांवर दहशतवादी थैमान घालून बसले होते. तीन दिवसांनी म्हणजे २९ नोव्हेंबर रोजी सुरक्षा दलांनी हल्लेखोरांचा पूर्णपणे खात्मा केला.

लष्कर-ए-तैयबा

या हल्ल्यामागे पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबा होती. त्यांच्या या कटाला पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा आयएसआय आणि अल-कायदा यांचंही पाठबळ असल्याचं नंतर उघड झालं. दहा दहशतवाद्यांपैकी एकमेव जिवंत पकडला गेलेला अजमल कसाब भारतात न्यायालयीन प्रक्रियेनंतर फाशी दिला गेला. कसाबने कबुली दिली की तो पाकिस्तानातील प्रशिक्षण छावण्यांतून तयार झाला होता आणि हल्ल्याचं संपूर्ण नियोजन लष्कर-ए-तैयबाच्या वरिष्ठ नेतृत्वाने केलं होतं.

हे देखील वाचा : BRICS Rupee Trade : भारतासाठी सुवर्ण क्षण! BRICS देशांचा मोठा निर्णय, व्यापार होणार डॉलरऐवजी ‘Indian Rupee’मध्ये

डेव्हिड हेडली

मुंबई हल्ल्याच्या कटात अमेरिकन नागरिक डेव्हिड हेडली आणि कॅनेडियन नागरिक तहव्वुर राणा यांचाही सहभाग सिद्ध झाला आहे. त्यांनी अमेरिकन न्यायालयात कबुल केलं की हा कट लष्कर-ए-तैयबाच्या नेतृत्वाखाली आणि आयएसआयच्या थेट पाठबळावर रचला गेला होता.

दहशतवादाला कोणताही धर्म नाही

या घटनेतून एक गोष्ट स्पष्ट झाली  दहशतवादाला कोणताही धर्म, कायदा किंवा मानवी मूल्यं मान्य नाहीत. त्यांच्या रणनीती फक्त भीती पसरवण्यावर आधारित असतात. निरपराध नागरिक, मुले, महिला किंवा वृद्ध  कोणालाही ते वाचवत नाहीत. बॉम्बस्फोट, गोळीबार, अपहरण, अशा विविध मार्गांनी ते समाजात दहशत निर्माण करतात.

अबू जिंदाल

आजही लष्कर-ए-तैयबा पाकिस्तानात उघडपणे सक्रिय आहे. २०१० मध्ये त्यांनी नवी दिल्लीतील राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत मोठा हल्ला करण्याचा कट रचला होता; मात्र गुप्तचर यंत्रणेमुळे तो उधळून लावण्यात आला. नंतर भारतीय सुरक्षा संस्थांनी सौदी अरेबियातून दहशतवादी अबू जिंदाल याला पकडले, जो भारताविरुद्ध आणखी एका हल्ल्याचा कट आखत होता.

हे देखील वाचा : Switzerland IACCC : भारतीयांचा ‘काळा पैसा’ परत मिळणार? स्वित्झर्लंडचा IACCC मध्ये सामील होण्याचा भविष्यदर्शी निर्णय

मानवतेचा शत्रू

२१ ऑगस्टचा हा स्मरणदिन आपल्याला पुन्हा एकदा आठवण करून देतो की दहशतवाद हा फक्त राष्ट्रांचा नाही तर मानवतेचा शत्रू आहे. २६/११ सारख्या घटना कधीही विसरता येणार नाहीत. त्या प्रत्येक वेळी आपल्याला सांगतात की जागरूकता, आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि कठोर कारवाई याशिवाय हा धोका थांबणार नाही.

Web Title: Victims of terrorism day 2611 reminds the world terrorism is humanitys enemy not religion

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Aug 21, 2025 | 09:28 AM

Topics:  

  • navarashtra special story
  • Pahalgam Terrorist Attack
  • special story

संबंधित बातम्या

Navaratri 2025: गौड सारस्वत ब्राह्मण समाजाचा शारदोत्सव: भक्ती, परंपरा आणि एकतेचा उत्सव
1

Navaratri 2025: गौड सारस्वत ब्राह्मण समाजाचा शारदोत्सव: भक्ती, परंपरा आणि एकतेचा उत्सव

Pune Navaratri 2025: पुण्यातील नाहर समाजाचे चामुंडा भवानी मातामंदिर, वाचा सविस्तर
2

Pune Navaratri 2025: पुण्यातील नाहर समाजाचे चामुंडा भवानी मातामंदिर, वाचा सविस्तर

घरच्यांनीच केला घात अन् इंग्रजांनी दिली अंगावर काटा आणणारी शिक्षा; बंगालच्या शेवटच्या राजाची करुण कहाणी
3

घरच्यांनीच केला घात अन् इंग्रजांनी दिली अंगावर काटा आणणारी शिक्षा; बंगालच्या शेवटच्या राजाची करुण कहाणी

Navratri 2025: शिवनगरी वाराणसीतील माँ कालरात्री मंदिराची अद्भुत कहाणी; जिथे आईने शेकडो वर्षे केली कठोर तपश्चर्या
4

Navratri 2025: शिवनगरी वाराणसीतील माँ कालरात्री मंदिराची अद्भुत कहाणी; जिथे आईने शेकडो वर्षे केली कठोर तपश्चर्या

ताज्या बातम्या

पुढे वाचा
एलजी इलेक्ट्रॉनिक्सचा IPO आजपासून खुला, फक्त 14,820 मध्ये गुंतवणुकीची संधी!

एलजी इलेक्ट्रॉनिक्सचा IPO आजपासून खुला, फक्त 14,820 मध्ये गुंतवणुकीची संधी!

Navi Mumbai: क्लिनर अपहरण केस, माजी IAS दिलीप खेडकरला जामीन देवू नका; नवी मुंबई पोलिसांचा कोर्टात युक्तिवाद

Navi Mumbai: क्लिनर अपहरण केस, माजी IAS दिलीप खेडकरला जामीन देवू नका; नवी मुंबई पोलिसांचा कोर्टात युक्तिवाद

Infertility Reason: लठ्ठपणामुळे Reproductivity आरोग्यावर होतोय दुष्परिणाम, वंध्यत्व येण्याचे महत्त्वाचे कारण

Infertility Reason: लठ्ठपणामुळे Reproductivity आरोग्यावर होतोय दुष्परिणाम, वंध्यत्व येण्याचे महत्त्वाचे कारण

Cough Syrup मुळे झालेल्या मृत्यूप्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी, सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल

Cough Syrup मुळे झालेल्या मृत्यूप्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी, सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल

तरुणाचं घटस्फोट सेलिब्रेशन चर्चेत! दूधाने अंघोळ केली, शेरवानी घातली, केक कापला अन्…; VIDEO तुफान व्हायरल 

तरुणाचं घटस्फोट सेलिब्रेशन चर्चेत! दूधाने अंघोळ केली, शेरवानी घातली, केक कापला अन्…; VIDEO तुफान व्हायरल 

मुलीला थार गाडीत नेलं, गोळ्या खायला दिल्या अन्…; साताऱ्यातील संतापजनक प्रकार

मुलीला थार गाडीत नेलं, गोळ्या खायला दिल्या अन्…; साताऱ्यातील संतापजनक प्रकार

एक उपमुख्यमंत्री, चार मंत्री असूनही सातारा जिल्ह्याची अवस्था दयनीय; अनेक रस्त्यांवर खड्डेच खड्डे

एक उपमुख्यमंत्री, चार मंत्री असूनही सातारा जिल्ह्याची अवस्था दयनीय; अनेक रस्त्यांवर खड्डेच खड्डे

व्हिडिओ

पुढे बघा
Amravati News : अमरावतीत वीज क्षेत्राच्या खासगीकरणाविरोधात महावितरण अधिकाऱ्यांचे ठिय्या आंदोलन

Amravati News : अमरावतीत वीज क्षेत्राच्या खासगीकरणाविरोधात महावितरण अधिकाऱ्यांचे ठिय्या आंदोलन

नंदूरबारमध्ये शिक्षकांच्या बदल्यानंतर अनेक शाळा शिक्षकांविना; विद्यार्थ्यांचे शिक्षण खोळंबले

नंदूरबारमध्ये शिक्षकांच्या बदल्यानंतर अनेक शाळा शिक्षकांविना; विद्यार्थ्यांचे शिक्षण खोळंबले

Dhule News : शिरपूरमध्ये लंपीच्या लसीकरणानंतरही आजाराचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकरी चिंतेत

Dhule News : शिरपूरमध्ये लंपीच्या लसीकरणानंतरही आजाराचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकरी चिंतेत

Gondia : गोंदियात आदिवासी समाजाचा एल्गार मोर्चा; आरक्षणाच्या मुद्द्यावर संताप

Gondia : गोंदियात आदिवासी समाजाचा एल्गार मोर्चा; आरक्षणाच्या मुद्द्यावर संताप

Obesity भारतीयांमध्ये वेगाने वाढत असलेली आरोग्य समस्या,काय सांगतायत आरोग्यतज्ज्ञ ?

Obesity भारतीयांमध्ये वेगाने वाढत असलेली आरोग्य समस्या,काय सांगतायत आरोग्यतज्ज्ञ ?

एकनाथ शिंदेंसमोर दादा भुसे स्पष्टच म्हणाले ‘निवडणुका महायुतीतून लढायच्या असल्या तरी…’

एकनाथ शिंदेंसमोर दादा भुसे स्पष्टच म्हणाले ‘निवडणुका महायुतीतून लढायच्या असल्या तरी…’

Ahilyanagar : बंजारा समाज आरक्षणासाठी थेट दिल्लीला धडकणार! अहिल्यानगर शहरात विराट मोर्चा

Ahilyanagar : बंजारा समाज आरक्षणासाठी थेट दिल्लीला धडकणार! अहिल्यानगर शहरात विराट मोर्चा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.