(फोटो सौजन्य - सोशल मिडिया)
इंग्लंडचा संघ भारतासाठी एक मोठे आव्हान ठरू शकतो. वानखेडेची खेळपट्टी सामान्यतः फलंदाजांसाठी अनुकूल असली तरी, जर खेळपट्टीवर हिरवे गवत असेल तर वेगवान गोलंदाजांना येथे काही मदत मिळू शकते. इंग्लंडच्या संघात अनेक मजबूत खेळाडू आहेत आणि ते येथे बऱ्याच काळापासून IPLमध्ये खेळत आहेत. म्हणूनच, त्यांना परिस्थितीची चांगली जाण आहे. म्हणूनच इंग्लंडचा संघ भारतासाठी एक महत्त्वाचे आव्हान ठरू शकतो.सोशल मीडियावर वानखेडेच्या खेळपट्टीचा एक फोटो प्रचंड व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये खेळपट्टीवर दाट हिरवे गवत दिसत आहे. सामान्यतः वानखेडेची खेळपट्टी फलंदाजांसाठी नंदनवन मानली जाते, मात्र त्यावर गवत असल्यास वेगवान गोलंदाजांना मोठी मदत मिळते.
इंग्लंडकडे जोफ्रा आर्चर आणि मार्क वूड सारखे ताशी 150 किमी वेगाने गोलंदाजी करणारे गोलंदाज आहेत. अशा खेळपट्टीवर इंग्लंडचे वेगवान गोलंदाज भारतीय फलंदाजांसाठी कर्दनकाळ ठरू शकतात, ही भीती व्यक्त केली जात आहे.
मंगळवारी भारतीय संघाने सराव सत्रात भाग घेतला. यावेळी मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी खेळपट्टीची अत्यंत बारकाईने पाहणी केली. व्हायरल फोटोंमध्ये गंभीर खेळपट्टीच्या क्यूरेटरशी चर्चा करताना प्रचंड नाराज आणि गंभीर मुद्रेत दिसत होते.
सूत्रांच्या माहितीनुसार, गंभीरला अपेक्षित असलेली खेळपट्टी आणि प्रत्यक्ष समोर असलेली खेळपट्टी यात मोठी तफावत असल्याने त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. भारत या सामन्यात फिरकीपटूंच्या जोरावर इंग्लंडला रोखण्याची रणनीती आखत असावा, पण गवतामुळे ही रणनीती उलटण्याची शक्यता आहे.
🚨 COACH GAUTAM GAMBHIR IS LOOKING UNHAPPY WITH WANKHEDE STADIUM PITCH 🚨 – Indian coach is looking furious with the pitch for Semifinal match of England vs India. – Phil Salt and Jos Buttler mostly play cricket on these types of pitch. pic.twitter.com/tWoCN3Z8cJ — Anant (@ImAnant_45) March 4, 2026
इंग्लंडचा संघ भारतासाठी नेहमीच कठीण आव्हान राहिला आहे. विशेष म्हणजे इंग्लंडचे बहुतांश खेळाडू आयपीएलमध्ये खेळत असल्यामुळे त्यांना वानखेडेच्या वातावरणाची आणि बाऊन्सची चांगली जाण आहे. जर खेळपट्टी वेगवान गोलंदाजांना साथ देणारी असेल, तर इंग्लंडचा संघ अधिक घातक ठरू शकतो.
सामन्याला अजून काही तास शिल्लक असल्याने, या खेळपट्टीवरील गवत कापले जाणार की ती ‘शेव्ड’ (Shaved) केली जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आयसीसीच्या नियमानुसार बाद फेरीच्या सामन्यांसाठी खेळपट्टीचे स्वरूप दोन्ही संघांसाठी पूरक असावे लागते, मात्र यजमान संघ नेहमीच आपल्या जमेच्या बाजू लक्षात घेऊन खेळपट्टीची मागणी करत असतो. गौतम गंभीरची ही ‘किचकिच’ टीम इंडियाला विजयापर्यंत नेणार की इंग्लंड या हिरव्या खेळपट्टीचा फायदा उठवून भारताचे विश्वचषकाचे स्वप्न भंग करणार, हे 5 मार्चलाच स्पष्ट होईल.






