फोटो सौजन्य - सोशल मिडिया
India vs West Indies T20 World Cup 2026 : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील टी२० विश्वचषक २०२६ सुपर ८ सामना १ मार्च रोजी खेळला जाणार आहे. हा सामना दोन्ही संघासाठी महत्वाचा असणार आहे, जो संघ यासामन्यात विजय मिळवेल तो संघ उपांत्य फेरीचे तिकीट मिळवणार आहे. सेमीफायनलमध्ये पोहोचण्यासाठी दोन्ही संघांसाठी हा ‘करो या मरो’चा सामना आहे. जिंकणारा संघ सेमीफायनलमध्ये पोहोचेल, तर पराभूत संघ मेगा इव्हेंटमधून बाहेर पडेल.
दक्षिण आफ्रिकेने पहिल्या त्याच्या सुपर 8 च्या सामन्यामध्ये भारताला हरवले तर दुसऱ्या सामन्यामध्ये वेस्ट इंडिजला पराभूत करुन सेमीफायनलमध्ये स्थान पक्के केले आहे. शेवटच्या सुपर 8 च्या सामन्यामध्ये दोन्ही संघ त्याचे सर्वात्तम प्लेइंग 11 मैदानामध्ये उतरवतील. दोन्ही संघ या सामन्यासाठी तयारीच्या शिखरावर आहेत. दरम्यान, वेस्ट इंडिजचा स्टार रोमारियो शेफर्डने भारताविरुद्धच्या आगामी सामन्याबाबत एक महत्त्वपूर्ण विधान केले आहे.
“खरं सांगायचं तर, आमच्याकडे दुःखी आणि पश्चात्ताप करण्यासाठी जास्त वेळ नाही,” रोमारियो शेफर्ड भारताविरुद्धच्या सामन्याबद्दल म्हणाले. “आम्हाला फक्त शांत राहून त्या मोठ्या सामन्यासाठी शक्य तितक्या लवकर परतण्याचा प्रयत्न करावा लागेल. हा एक ‘करो या मरो’ सामना आहे, म्हणून आम्हाला माहित आहे की आमचे भविष्य आमच्या हातात आहे. आशा आहे की, आम्ही तिथे जाऊन जिंकू आणि उपांत्य फेरी गाठू शकू.”
वेस्ट इंडिजचा दक्षिण आफ्रिकेकडून पराभव झाला. शेफर्डचा असा विश्वास आहे की त्या सामन्यात त्यांना ५० धावा कमी पडल्या होत्या. “हो, मलाही तसेच वाटते,” तो म्हणाला, “कारण खेळाडू बाद होत असतानाही ते आम्हाला सांगत होते की विकेट खूप चांगली आहे. मी स्वतः बाद झालो तेव्हाही ती खूप चांगली होती. माझ्या बॅटवर लागलेले पहिले काही चेंडू मी काँक्रीटवर फलंदाजी करत असल्यासारखे वाटले.”
West Indies all-rounder Romario Shepherd reckoned the team has to quickly put behind the nine-wicket loss to South Africa ahead of the final Super Eight clash against India. While the Proteas have qualified for the semifinals, the Caribbean side and Suryakumar Yadav’s men will… pic.twitter.com/NvTp8gcRcV — Sportstar (@sportstarweb) February 28, 2026
भारताने त्यांचा पहिला सुपर ८ सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळला, परंतु दक्षिण आफ्रिकेने भारताचा ७३ धावांनी मोठ्या फरकाने पराभव केला आणि टीम इंडियाची विजयी मालिका थांबवली. आता, टीम इंडियाला वेस्ट इंडिजविरुद्धच्या ‘करो या मरो’ सामन्यात आपली प्रतिभा दाखवावी लागेल.






