फोटो सौजन्य - सोशल मिडिया
Statement of Suryakumar Yadav after victory : २०२६ च्या टी-२० विश्वचषकात टीम इंडियाने झिम्बाब्वेवर ७२ धावांनी शानदार विजय मिळवला. चेन्नईतील सामन्यात फलंदाजांनी वर्चस्व गाजवले. प्रथम भारतीय संघाने २५६ धावा केल्या आणि त्यानंतर झिम्बाब्वेच्या खेळाडूंनीही धावांचा पाऊस पाडला. भारताने मोठ्या फरकाने विजय मिळवला. या विजयासह भारताच्या संघाने सेमीफायनलच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. भारताचा सुपर 8 चा शेवटचा सामना वेस्ट इंडिजविरूद्ध होणार आहे.
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यामध्ये होणार आहे, हा सामना दोन्ही संघासाठी महत्वाचा असणार आहे, जो संघ विजय मिळवेल त्या संघाला सेमीफायनलचे तिकीट मिळणार आहे. झिम्बाब्वेविरूद्ध सामन्यात विजय मिळवला तरीही, कर्णधार सूर्यकुमार यादव आनंदी दिसत नव्हता. सामन्यानंतर, त्याने टीम इंडियाच्या एका मोठ्या चुकीकडे लक्ष वेधले आणि पुढील सामन्यात त्यावर काम करण्याचे आश्वासन दिले.
T20 World Cup 2026 दरम्यान रिंकू सिंगवर कोसळला दु:खाचा डोंगर! उपचारादरम्यान झाले वडिलांचे निधन
भारताच्या विजयानंतर कर्णधार सूर्यकुमार यादवने सादरीकरण समारंभाला हजेरी लावली. त्याने फलंदाजीच्या क्रमाचे कौतुक केले, पण गोलंदाजीबद्दल तो असमाधानी होता. त्याला वाटले की भारतीय गोलंदाजांमध्ये काही खोलीची कमतरता आहे. तो म्हणाला, “वरच्या क्रमापासून ते क्रमांक ७ पर्यंत, आमच्या कामगिरीत फारशी कमतरता नव्हती. प्रामाणिकपणे सांगायचे तर, आम्ही आमच्या गोलंदाजीमध्ये थोडे चांगले करू शकलो असतो. शेवटी, विजय महत्त्वाचा आहे आणि आता आम्ही आगामी सामन्यांवर लक्ष केंद्रित केले आहे.”
सूर्या पुढे म्हणाला, “वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यापूर्वी आम्ही सर्वकाही दुरुस्त करण्याचा प्रयत्न करू. मी झिम्बाब्वेच्या फलंदाजांकडून श्रेय घेऊ इच्छित नाही. त्यांनी उत्तम फलंदाजी केली. गोलंदाजीच्या बाबतीत, महत्त्वाच्या क्षणी आम्ही थोडे अधिक हुशार असू शकलो असतो. अशा परिस्थितीत, तुम्हाला तुमचे निर्णय अधिक धाडसी असले पाहिजेत.”
IND Vs ZIM: दे घुमाके! चेपॉकमध्ये Tilak Verma-Hardik कडून झिम्बाब्वेची छप्परफाड धुलाई
२६ फेब्रुवारी २०२६ रोजी दक्षिण आफ्रिकेने वेस्ट इंडिजला दारुण पराभवाचा सामना करावा लागला, तर टीम इंडियाने झिम्बाब्वेविरुद्ध विजय मिळवला. वेस्ट इंडिज आणि भारत आता १-१ अशा बरोबरीत आहेत, दोघांनाही दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दारुण पराभव पत्करावा लागला आहे. दोन्ही संघांमधील सामना १ मार्च रोजी होईल. विजयी संघ थेट २०२६ च्या टी-२० विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत प्रवेश करेल.






