बांग्लादेशमध्ये आयोजीत SAFF महिला अंडर -19 फुटबॅाल चॅम्पियनशिपचा अंतिम सामना (SAFF Women’s Under-19 Football Championships) गुरुवारी भारत आणि बांगलादेश यांच्यात खेळला गेला. ९० मिनिटांच्या खेळात दोन्ही संघ बरोबरीत होते. यानंतर पेनल्टी शूटआऊटही बरोबरीत सुटली. नंतर नाणेफेकीनंतर भारताला विजेता घोषित करण्यात आले. या निर्णयाने बांग्लदेशच्या चाहते नाराज झाले त्यांनी मैदानाच्या मध्यभागी येत एकच गोंधळ घातला आणि भारतीय महिला संघावर दगड आणि बाटल्या फेकण्यास सुरुवात (stone pelting on women players) केली. त्यांचा हा रोष पाहता यानंतर दोन्ही संघांना संयुक्त विजेता घोषित करण्यात आले.
[read_also content=”माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर गोळीबार प्रकरणी पोलिसांनी दोघांना घेतलं ताब्यात! https://www.navarashtra.com/crime/2-people-detained-by-mumbai-police-in-abhishek-ghosalkar-firing-case-nrps-505518.html”]
भारत आणि बांगलादेश यांच्यात झालेल्या SAFF अंडर-19 महिला अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पेनल्टी शूटआऊटनंतर दोन्ही संघ 11-11 असे बरोबरीत होते, त्यानंतर नाणेफेक झाल्यानंतर सामना अधिकाऱ्यांनी भारताला स्पर्धेचा विजेता घोषित केले. बांगलादेशी मैदानावरील चाहते. दगड आणि बाटल्या फेकण्यास सुरुवात केली. यानंतर हा निकाल मागे घेण्यात आला आणि दोन्ही संघांना संयुक्त विजेता घोषित करण्यात आले. वास्तविक, ९० मिनिटांच्या या गेममध्ये दोन्ही संघ १-१ असे बरोबरीत होते. यानंतर, पेनल्टी शूटआउट झाला, जो बरोबरीत संपला आणि स्कोअर लाइन 11-11 पर्यंत पोहोचली. रेफ्री पेनल्टी शूटआऊट सुरू ठेवणार होते, पण नंतर त्याला दोन्ही बाजूंच्या कर्णधारांना बोलावून नाणेफेक करून विजेता घोषित करण्यास सांगण्यात आले.