चंद्रपुरातील बल्लारशाह-काजीपेठ रेल्वे मार्गावर रेल्वेची धडक बसून ४ ते ५ वर्षांच्या नर बिबट्याचा मृत्यू झाला. वनविभागाच्या प्राथमिक अहवालानुसार डोक्याला झालेल्या तीव्र दुखापतीमुळे न्यूरोलॉजिकल शॉक आल्याने बिबट्याचा मृत्यू झाला.
महाड विधानसभा मतदारसंघातील गणेशभक्तांसाठी सोमनाथ ओझर्डे यांनी १२ आणि १३ सप्टेंबरला मोफत बससेवा सुरू ठेवण्याची घोषणा केली आहे. मुंबई, पुणे, ठाणे आणि नालासोपारा येथून बस सोडून यंदा सुमारे १० हजार…
कर्जत तालुक्यातील वाढत्या फार्म हाऊस पर्यटनाला चालना देण्यासाठी ओला-उबर सेवा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे. सध्या पर्यटकांना कर्जतमध्ये सोडण्याची सुविधा असली तरी परतीच्या प्रवासासाठी वाहन उपलब्ध होत नसल्याने…
मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यातील हजारो शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना घरभाडे भत्ता फरकाची थकबाकी मिळणार आहे. तीन वर्षांच्या पाठपुराव्यानंतर या प्रलंबित रकमेचा मार्ग मोकळा झाला आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाची (SIR) प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू असून, आतापर्यंत ९९.६९ टक्के मतदारांचे डिजीटायझेशन पूर्ण झाले आहे. अद्याप गणना प्रपत्र जमा न केलेल्या मतदारांनी आवश्यक कागदपत्रांसह ते…
हिंगणघाटमधील विदर्भातील सर्वांत मोठ्या पाणपक्षी मिश्र विणवसाहतीत यंदा एक खास नोंद झाली आहे. प्रथमच मध्यम बगळा आणि मोठा बगळा या दोन नव्या पाणपक्षी प्रजातींनी येथे घरटी बांधल्याचे आढळून आले आहे.
मुंबई महापालिकेने जन्म-मृत्यू प्रमाणपत्राशी संबंधित कामांसाठी नागरिकांना मोठा दिलासा दिला आहे. अर्ज सादर करण्यासाठी स्वतंत्र खिडकी आणि नवीन संगणकीय प्रणाली सुरू करण्यात आली आहे.
Neral News: नेरळ ग्रामपंचायतीच्या १६व्या वित्त आयोगाच्या आराखड्याला ग्रामस्थांनी आक्षेप घेतला आहे. १५व्या वित्त आयोगातून झालेल्या कामांची माहिती आधी सादर करा, त्यानंतरच नव्या आराखड्याला मंजुरी देऊ, अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली.
चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यात इथेनॉल प्रकल्पाच्या दूषित सांडपाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. सात गावांमध्ये त्वचारोगाच्या तक्रारी वाढल्यानंतर आरोग्य विभागाने केलेल्या सर्वेक्षणात १९८ बाधित नागरिक आढळल्याने प्रशासनासमोर मोठे आव्हान…
काही महिन्यांपूर्वी ३० ते ५० रुपयांपर्यंत पोहोचलेली कोथिंबीर आता सर्वसामान्यांच्या आवाक्यात आली आहे. महाडच्या भाजी बाजारात आवक वाढल्याने कोथिंबिरीचे दर मोठ्या प्रमाणात घसरले असून ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
महाड नगरपरिषदेच्या प्रशासकीय इमारतीतील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मुख्याधिकाऱ्यांच्या दालनासह इमारतीतील बहुतांश CCTV कॅमेरे बंद असल्याची बाब समोर आल्याने प्रशासनाच्या देखभाल व्यवस्थेवर सवाल उपस्थित होत आहेत.
डॉक्टरांच्या संपाची मुंबई उच्च न्यायालयाने गंभीर दखल घेत नागरिकांच्या आरोग्याशी तडजोड करू नका, असे स्पष्ट शब्दांत सुनावले. न्यायालयाच्या निर्देशानंतर आयएमएने संप मागे घेण्याची तयारी दर्शवली.
भारतातील डेटा सेंटर उद्योगाला चालना देण्यासाठी केंद्र सरकारने परदेशी कंपन्यांसाठी अनुपालन प्रक्रिया अधिक सुलभ करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. यामुळे व्यवसाय करणे अधिक सोपे होण्याची अपेक्षा आहे.
जुन्नर-ओतूर मार्गावरील करंजाळे परिसरात मुसळधार पावसामुळे राष्ट्रीय महामार्गाचा काही भाग खचल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे. सध्या राष्ट्रीय महामार्ग विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पोलीस प्रशासनाकडून युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम सुरू…
महाडच्या क्रीडाप्रेमींसाठी आधुनिक आणि सुरक्षित क्रीडा सुविधेची मोठी भेट मिळाली आहे. शहरात प्रथमच अत्याधुनिक इनडोअर टर्फ सुरू झाल्याने युवक, महिला आणि बालकांना वर्षभर दर्जेदार वातावरणात खेळण्याची संधी उपलब्ध होणार आहे.
राजुरा ते तेलंगणा सीमेला जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 353B वरील अनेक कामे अद्याप अपूर्ण असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. वाढते अपघात, खराब रस्ते आणि प्रवासी सुविधांचा अभाव लक्षात घेता संबंधित…
देशातील सर्वाधिक प्रदूषित शहरांपैकी एक असलेल्या चंद्रपूरसाठी 'बांबू सिटी' ही संकल्पना पर्यावरणपूरक विकासाचा नवा पर्याय ठरू शकते. बांबू लागवड, उद्योग आणि पर्यटनाच्या माध्यमातून प्रदूषण कमी करत स्थानिक अर्थव्यवस्थेला बळ देण्यावर…
चंद्रपूर जिल्ह्यात यंदाच्या अनियमित मान्सूनमुळे खरीप हंगामाचे गणित पूर्णपणे बिघडले आहे. उशिरा पेरणी, तणनियंत्रणाचा वाढलेला खर्च, कीड-रोगांचा प्रादुर्भाव आणि अपुऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांसमोर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे.
पावसाळ्यात दरड कोसळण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात घडतात. यामुळे पोलादपूर-वाई मार्गावरील आंबेनळी घाट धोकादायक बनला आहे. प्रशासनाने अवजड वाहनांसाठी ३१ जुलैपर्यंत मार्ग बंद ठेवला होता. मात्र आता सोशल मीडियावर घाट सुरू…
विरार-डहाणू रोड चौपदरीकरण प्रकल्पामुळे विरार रेल्वे स्थानकाचा कायापालट वेगाने सुरू आहे. पुनर्विकासाची अनेक महत्त्वाची कामे अंतिम टप्प्यात असून प्रवाशांसाठी आधुनिक सुविधा उपलब्ध होणार आहेत.