वसई पूर्वेतील गोराई पाडा, मुकुंद नगर येथील राजप्रभा औद्योगिक परिसरात अंगावर शहारे आणणारी घटना घडली आहे. २४–२५ वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने (कोयता) निर्घृण हत्या करण्यात आली. हल्लेखोराने तरुणाच्या चेहरा व खांद्यावर वारंवार घाव घातल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात दहशत व अफरातफरीचे वातावरण पसरले आहे. घटनेची माहिती मिळताच वालिव पोलीस ठाण्याचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. यासह डीसीपी पोर्णिमा चौगुले शृंगी, एसीपी उमेश माने पाटील, फॉरेन्सिक पथक व गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनीही घटनास्थळाची पाहणी केली. पोलिसांनी पुरावे संकलनास सुरुवात केली आहे.
वसई पूर्वेतील गोराई पाडा, मुकुंद नगर येथील राजप्रभा औद्योगिक परिसरात अंगावर शहारे आणणारी घटना घडली आहे. २४–२५ वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने (कोयता) निर्घृण हत्या करण्यात आली. हल्लेखोराने तरुणाच्या चेहरा व खांद्यावर वारंवार घाव घातल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात दहशत व अफरातफरीचे वातावरण पसरले आहे. घटनेची माहिती मिळताच वालिव पोलीस ठाण्याचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. यासह डीसीपी पोर्णिमा चौगुले शृंगी, एसीपी उमेश माने पाटील, फॉरेन्सिक पथक व गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनीही घटनास्थळाची पाहणी केली. पोलिसांनी पुरावे संकलनास सुरुवात केली आहे.






