फोटो सौजन्य - Social Media
काय आहे प्रकरण?
पुण्याच्या धनकवडी येथे उषा चव्हाणांची जमीन आहे. हक्काच्या जमिनीसाठी त्या गेल्या 26 वर्षांपासून लढा देत आहेत. 26 वर्षांच्या लढ्यानंतर त्यांना यश आले. पुण्याच्या High Court ने त्यांच्या बाजूने निकाल लावला. पण त्याचा काहीच फायदा झाला नाही. कारण पुणे महानगरपालिकेने त्या जमिनीचा TDR परस्पर एका बिल्डरला देऊन टाकला. या प्रकरणात, पुणे महानगरपालिकेने उषा चव्हाणांची किंवा त्यांच्या कुटुंबीयांची कोणतीही संमती घेतली नाही.
या प्रकरणामुळे उषा चव्हाण तसेच त्यांच्या कुटुंबीयांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणी त्यांनी शासनाला पत्रही केले होते. तसेच त्या पत्राची कॉपी, सोशल मीडियावर शेअर करण्यात आली होती. त्याखाली “आपली लाडकी बहीण, ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांना न्याय मिळेल का?” असे नमूद करत, महाराष्ट्र शासनाला सवाल केला होता. त्या पत्रामध्ये त्यांनी नमुदा केलं होतं की, “न्यायालयीन वाद सुरू असतानाही पुणे महापालिकेकडून बिल्डर कंपनीला टीडीआर देण्याची प्रक्रिया करण्यात आली.
या प्रकरणात माझ्या मुलाचा कायदेशीर हिस्सा असूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं आहे. तसेच संबंधित अधिकारी, नगरविकास विभाग आणि शासनाकडे अनेकदा तक्रारी करूनही आम्हाला न्याय मिळत नाही आहे. न्याय न मिळाल्यास शासनाकडून मिळालेले पुरस्कार, ट्रॉफीज आणि सन्मान मी परत करणार.”
एकंदरीत, सामान्य नागरिकांच्या मालमत्ता हक्कांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याची त्यांनी खंत व्यक्त केली आहे. तसेच, आनंद दिघे यांच्या प्रतिमेशी V. Shantaram जीवनगौरव महाराष्ट्र शासनाचा हा मानाचा पुरस्कार वाहून तो शासनाकडे पुन्हा सुपुर्त केला आहे. महाराष्ट्र शासनाला परत केला आहे.






