(फोटो सौजन्य: X)
काय आहे प्रकरण?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत मुलींची ओळख त्रिशा (१७), पवित्रा (१६) आणि रत्नकुमारी (१६) अशी आहे. तिघीही किशोरवयीन होत्या आणि हुकुमपेटा मंडलातील जांबुवलसा गावात राहत होत्या. यांच्यासोबत असलेली चाैथी मुलगी अंजली रुग्णालयात सध्या उपचार घेत आहे. पोलिसांना प्राथमिक तपासात असे समजले की, त्या चारही मुली धबधबा पाहण्यासाठी गेल्या होत्या. यादरम्यान त्यांनी पाण्यात पोहायला सुरुवात केली. अंजली पाण्याजवळ असलेल्या खडकाच्या कड्यावर उभी होती आणि तिच्या तीन मैत्रिणी व्हिडिओ शूट करत होत्या. यावेळीच पाण्याचा प्रवाह वाढला ज्यात त्या तिघीही वाहून गेल्या. अंजलीने आपल्या मैत्रिणी वाहून जात आहेत हे पाहताच त्यांना वाचवण्याचा आतोनात प्रयत्न केला पण यात तिला यश मिळाले नाही.
“Three girls died while taking selfies.” 💔 In a heartbreaking incident, 3 teenage girls drowned while trying to take some photos at Mallugummi Waterfall in Andhra Pradesh. One girl lost her life while trying to save other two. Don’t risk your life for selfies & reels. pic.twitter.com/Smo0a8HwTa — Suraj Kumar Bauddh (@SurajKrBauddh) April 10, 2026
घटनेची नाहिती मिळताच घटनास्थळी तात्काळ बचावकार्य सुरु करण्यात आले. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढले आणि अंजलीलाही वाचवण्यात आले. तिला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिथे तिच्यावर उपचार सुरु आहेत. बाकी मुलींचे मात्र मृचदेह पोलिसांनी ताब्यात घेतले असून शवविच्छेदनासाठी त्यांना पाठवण्यात आले आहे. पोलिस आता धबधब्याच्या परिसरात सुरक्षेचे कोणते फलक लावले की नाही याची चाैकशी करत आहेत. दरम्यान धबधब्यावर जाताना पाण्याच्या प्रवाहाची काही खात्री देता येत नाही त्यामुळे कधीही अशा ठिकाणी गेल्यावर आपल्या जीवाचा आधी विचार करावा.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






