• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • World »
  • Pakistan Floods 800 Lives Lost Khawaja Asif Blames India

Pakistan floods : पाकिस्तानात महापुराचे थैमान; 800 हून अधिकांचा बळी, ख्वाजा आसिफ मात्र भारतावर दोषारोपात व्यस्त

2025 Pakistan floods : पाकिस्तानमध्ये आलेल्या विनाशकारी पुरामुळे 800 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी पुरासाठी भारताला जबाबदार धरले आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Aug 29, 2025 | 03:25 PM
pakistan floods 800 lives lost khawaja asif blames india

Pakistan floods : पाकिस्तानात महापुराचे थैमान; ८०० हून अधिकांचा बळी, ख्वाजा आसिफ मात्र भारतावर दोषारोपात व्यस्त ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

2025 Pakistan floods : पाकिस्तान सध्या शतकातील सर्वात मोठ्या पुराच्या संकटाला सामोरे जात आहे. पंजाब, सियालकोट आणि आसपासच्या भागात मुसळधार पाऊस आणि नद्यांच्या प्रचंड पुरामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. आतापर्यंत ८०० हून अधिक लोकांनी प्राण गमावले आहेत, तर १२ लाखांहून अधिक लोक प्रभावित झाले आहेत. २.५ लाख नागरिक विस्थापित झाले असून, १,४३२ गावे पाण्याखाली गेली आहेत. शेतातील पिके वाहून गेली आहेत, व्यापार ठप्प झाला आहे आणि हजारो कुटुंबांना तात्पुरत्या मदत छावण्यांमध्ये आसरा घ्यावा लागत आहे.

सरकारकडून ७०० मदत छावण्या व २६५ वैद्यकीय शिबिरे उभारण्यात आली आहेत, तरीही परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. आजही अनेक ठिकाणी बचाव पथके बोटींनी लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवत आहेत. हजारो लोक घरांचे अवशेष, पिके आणि जनावरांचे नुकसान सहन करत असताना रडवेल्या चेहऱ्यांनी मदतीची आस लावून बसलेले दिसत आहेत.

ख्वाजा आसिफ यांचा वादग्रस्त दावा

या गंभीर परिस्थितीत, पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा मोहम्मद आसिफ यांनी सियालकोटच्या भेटीदरम्यान आश्चर्यकारक विधान केले. त्यांच्या म्हणण्यानुसार, “भारताकडून सोडण्यात आलेल्या पाण्यासोबत मृतदेह, गुरेढोरे आणि कचऱ्याचे ढीग पाकिस्तानात वाहून आले आहेत. त्यामुळे स्थानिक प्रशासनाचे बचावकार्य थांबत आहे.” ते पुढे म्हणाले की, सियालकोट हे जम्मूमधून निघणाऱ्या जलमार्गांच्या खालच्या भागात असल्याने भारताकडून पाणी सोडले की इथे पूर येणे साहजिक आहे. मात्र, हे सांगतानाच त्यांनी एक कबुली दिली भारताने पाणी सोडण्यापूर्वी पाकिस्तानला दोनदा अधिकृत माहिती दिली होती.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : PM Modi In Japan : भारताला जपान प्रवासाचे मोठे फळ; 40 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त गुंतवणूक; AI, सेमीकंडक्टर आणि बुलेट ट्रेन चर्चेत

सोशल मीडियावर संताप व खिल्ली

ख्वाजा आसिफ यांच्या या विधानाने पाकिस्तानी सोशल मीडियावर प्रचंड वादंग माजले आहे. अनेक नागरिकांनी सरकारवर आरोप केला की, “खऱ्या तयारीच्या अभावाकडून लक्ष हटविण्यासाठी भारतावर दोषारोप करण्यात येत आहेत.” काहींनी तर व्यंग्यात्मक स्वरूपात लिहिले –  “पूर मृतदेहांमुळे येत नाही, तो पाण्यामुळेच येतो.”

भारत–पाकिस्तान पाणी कराराची पार्श्वभूमी

भारत व पाकिस्तानमध्ये दीर्घकाळापासून सिंधू पाणी करार अस्तित्वात होता. या करारांतर्गत पाण्याविषयीचा डेटा एकमेकांना देणे बंधनकारक होते. पण एप्रिल २०२५ मध्ये झालेल्या पहलगाम हल्ल्यानंतर भारताने हा करार स्थगित केला. तरीदेखील, सार्वजनिक सुरक्षेच्या दृष्टीने भारताने मुसळधार पावसाची व पुराची माहिती पाकिस्तानला आगाऊ कळवली होती.

३८ वर्षांतील सर्वात भीषण पूर

पाकिस्तानी पाटबंधारे विभागाच्या माहितीनुसार, ३८ वर्षांनंतर प्रथमच रावी, सतलज आणि चिनाब नद्या एकाच वेळी पुरग्रस्त झाल्या आहेत. त्यामुळे बचावकार्य अधिक कठीण झाले आहे. अनेक जिल्ह्यांत सैन्य दल, मदत संस्था व स्वयंसेवक दिवस-रात्र लोकांना वाचवण्यासाठी धडपडत आहेत.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : US–Japan Trade Deal: जागतिक राजकारण ‘असे’ फिरले, पंतप्रधान मोदींच्या जपान दौऱ्यामुळे अमेरिकेने अब्जावधी रुपये झटक्यात गमावले

संकटात मानवी वेदना

पूरामुळे कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. शेकडो लोक आप्तेष्ट गमावून शोकाकुल अवस्थेत आहेत. लहान मुले आई-वडिलांच्या शोधात रडत आहेत, तर वृद्ध लोकांना छावण्यांमध्ये अन्न-पाण्याची टाचणी सहन करावी लागत आहे. हजारो जनावरे वाहून गेल्याने शेतकऱ्यांचा आधार हरपला आहे. पाकिस्तान या संकटातून कसा बाहेर पडतो हे काळच ठरवेल. पण सध्याच्या परिस्थितीत नागरिकांच्या जिवावर बेतलेल्या या आपत्तीला राजकीय आरोप-प्रत्यारोपांनी अधिकच दुर्दैवी वळण दिले आहे.

Web Title: Pakistan floods 800 lives lost khawaja asif blames india

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Aug 29, 2025 | 03:25 PM

Topics:  

  • India pakistan Dispute
  • india pakistan war
  • India-Pakistan Conflict

संबंधित बातम्या

मोहम्मद अली जिनाने 24 वर्षाने लहान तरुणीशी केले लग्न; रागात सासऱ्यांनी थेट छापली मुलीच्या मृत्यूची बातमी
1

मोहम्मद अली जिनाने 24 वर्षाने लहान तरुणीशी केले लग्न; रागात सासऱ्यांनी थेट छापली मुलीच्या मृत्यूची बातमी

Viransh Bhanushali: ‘निर्लज्ज देश!’ ऑक्सफर्ड युनियनमध्ये भारताचा सिंह गरजला; पाकिस्तानला दाखवली लायकी, VIDEO VIRAL
2

Viransh Bhanushali: ‘निर्लज्ज देश!’ ऑक्सफर्ड युनियनमध्ये भारताचा सिंह गरजला; पाकिस्तानला दाखवली लायकी, VIDEO VIRAL

ताज्या बातम्या

पुढे वाचा
World Most Expensive Weapons : जगातील सर्वात महागडी शस्त्रे; अब्जावधींची किंमत अन् विध्वंसक

World Most Expensive Weapons : जगातील सर्वात महागडी शस्त्रे; अब्जावधींची किंमत अन् विध्वंसक

Dec 29, 2025 | 11:23 PM
Shirdi Sai Baba Temple: साई भक्तांना नववर्षाची अनोखी भेट! ३१ डिसेंबरला शिर्डीत मंदिर दर्शनासाठी रात्रभर राहणार खुले

Shirdi Sai Baba Temple: साई भक्तांना नववर्षाची अनोखी भेट! ३१ डिसेंबरला शिर्डीत मंदिर दर्शनासाठी रात्रभर राहणार खुले

Dec 29, 2025 | 09:51 PM
MPSC News: ‘एमपीएससी’ला मिळाले नवीन अध्यक्ष; विवेक भिमनवर यांची नियुक्ती

MPSC News: ‘एमपीएससी’ला मिळाले नवीन अध्यक्ष; विवेक भिमनवर यांची नियुक्ती

Dec 29, 2025 | 09:21 PM
VHT 2025-26 : CSK च्या वेगवान गोलंदाजा फोडली डरकाळी! 7 विकेट्स घेऊन हिमाचलची उडवली दाणादाण; कोण आहे रामकृष्ण घोष?

VHT 2025-26 : CSK च्या वेगवान गोलंदाजा फोडली डरकाळी! 7 विकेट्स घेऊन हिमाचलची उडवली दाणादाण; कोण आहे रामकृष्ण घोष?

Dec 29, 2025 | 09:17 PM
Mumbai Cyber Fraud: आता चोरांनी थेट हद्दच केली पार! सरन्यायाधीशांच्याच नावाचा केला वापर; महिलेची ३ कोटी ७५ लाखांची ऑनलाइन लूट

Mumbai Cyber Fraud: आता चोरांनी थेट हद्दच केली पार! सरन्यायाधीशांच्याच नावाचा केला वापर; महिलेची ३ कोटी ७५ लाखांची ऑनलाइन लूट

Dec 29, 2025 | 09:07 PM
Mumbai Redevelopment 2026: आता मुंबई वाढणार नाही, तर सुधारणार! २०२६ मध्ये पुनर्विकास ठरणार शहराच्या प्रगतीचे इंजिन

Mumbai Redevelopment 2026: आता मुंबई वाढणार नाही, तर सुधारणार! २०२६ मध्ये पुनर्विकास ठरणार शहराच्या प्रगतीचे इंजिन

Dec 29, 2025 | 08:46 PM
Maharashtra Politics: कोल्हापुरात महायुतीचे ठरले; भाजप तब्बल…, महाविकास आघाडीचे काय होणार?

Maharashtra Politics: कोल्हापुरात महायुतीचे ठरले; भाजप तब्बल…, महाविकास आघाडीचे काय होणार?

Dec 29, 2025 | 08:40 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Navi Mumbai : “कोपरखैरणे प्रभागातील पुढऱ्यांनी फक्त टेंडर काढायची कामं केली” – शिरीष पाटील

Navi Mumbai : “कोपरखैरणे प्रभागातील पुढऱ्यांनी फक्त टेंडर काढायची कामं केली” – शिरीष पाटील

Dec 29, 2025 | 07:30 PM
Solapur News : तृतीयपंथी Ayyub Sayyad च्या खून प्रकारणातील तिघांना अटक

Solapur News : तृतीयपंथी Ayyub Sayyad च्या खून प्रकारणातील तिघांना अटक

Dec 29, 2025 | 07:23 PM
Sindhudurg : नववर्षाच्या जल्लोषासाठी भोगवे हाऊसफुल्ल!

Sindhudurg : नववर्षाच्या जल्लोषासाठी भोगवे हाऊसफुल्ल!

Dec 29, 2025 | 06:43 PM
Mumbai : विकासाच्या मुद्द्यांवरच निवडणूक हवी, काँग्रेस-वंचित आघाडीवर वर्षा गायकवाडांचं वक्तव्य

Mumbai : विकासाच्या मुद्द्यांवरच निवडणूक हवी, काँग्रेस-वंचित आघाडीवर वर्षा गायकवाडांचं वक्तव्य

Dec 29, 2025 | 06:36 PM
Ahilyanagar : निवडणूक आयोगाकडून अधिकारी कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण संपन्न

Ahilyanagar : निवडणूक आयोगाकडून अधिकारी कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण संपन्न

Dec 29, 2025 | 06:23 PM
Ahilyanagar : निवडणूक आयोगाकडून अधिकारी कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण संपन्न

Ahilyanagar : निवडणूक आयोगाकडून अधिकारी कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण संपन्न

Dec 29, 2025 | 06:15 PM
Sindhudurg : नववर्षाच्या जल्लोषासाठी भोगवे हाऊसफुल्ल!

Sindhudurg : नववर्षाच्या जल्लोषासाठी भोगवे हाऊसफुल्ल!

Dec 29, 2025 | 03:10 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.