उस्मान तारिकच्या गोलंदाजीअॅक्शनवर अश्विनचे भाष्य(फोटो-सोशल मीडिया)
Ravichandran Ashwin’s commentary on Usman Tariq’s bowling action : भारतीय क्रिकेट संघाचे माजी अनुभवी खेळाडू आर. अश्विन नेहमीच चर्चेत असतो. तो आपल्या स्पष्ट मतांसाठी ओळखला जातो. आता देखील आर आश्विन चर्चेत आला आहे. त्याने पाकिस्तानी फिरकी गोलंदाज उस्मान तारिकचे समर्थन केले आहे. त्याच्या गोलंदाजी अॅक्शनसाठी टीका होत आहे, अशातच तारिकबद्दल अश्विन म्हणाला की, ही बंदी केवळ गोलंदाजांपुरती मर्यादित नसावी. बुधवारी माजी क्रिकेटपटू श्रीवत्स गोस्वामी यांनी तारिकच्या धावण्याच्या वेळी थांबण्यावर ताशेरे ओढले होते. तेव्हा तारीकची तुलना फुटबॉल नियमांमधील बदलाशी करण्यात आली जे की खेळाडूंना पेनल्टी रन-अप दरम्यान थांबण्यापासून प्रतिबंधित करत असते.
गोस्वामी यांनी टीका करताना इंस्टाग्रामवर लिहिले की, “फुटबॉलमध्ये देखील खेळाडू आता पेनल्टी रन-अप दरम्यान थांबू शकत नाहीत. ते कसे ठीक आहे? कृती – सर्व काही ठीक आहे. पण थांबणे? तेही डिलिव्हरीच्या दरम्यान, हे सुरू ठेवता येत नाही.”
गोस्वामीच्या पोस्टला उत्तर देताना आर अश्विनने इन्स्टाग्रामवर लिहिले की, “फुटबॉलमध्ये हे मान्य नाही. जेव्हा एखाद्या फलंदाजाला पंच किंवा गोलंदाजाला न कळवता एका बाजूने फलंदाजी सुरू केल्यानंतर स्विच-हिट किंवा रिव्हर्स स्विंग करण्याची परवानगी देण्यात येऊ शकते. तेव्हा हे निर्बंध गोलंदाजांपुरतेच मर्यादित का आहेत? खरं तर, गोलंदाजाला पंचांना न कळवता तो ज्या हाताने गोलंदाजी करतो तो बदलण्याची परवानगी देण्यात येत नाही. त्यांनी प्रथम तो नियम बदलायला पाहिजे.”
आर अश्विनच्या( भारतीय क्रिकेट संघा) या प्रतिक्रियेवर त्याला टीकेचा सामना करावा लागला. त्यानंतर त्याने लिहिले, “मी हे शक्य तितके स्पष्ट करू इच्छितो, की प्रथम, त्याच्या गोलंदाजीच्या कृतीची कायदेशीरता ही केवळ आयसीसीच्या गोलंदाजी कृती चाचणी केंद्रातच तपसण्यात येते. दुसरे म्हणजे, १५ अंशांचा नियम आहे ज्यामध्ये गोलंदाजाला त्याचा कोपर सरळ ठेवावा लागतो आणि मैदानावरील पंच त्या १५ अंशाच्या कोनात गोलंदाजी करत आहे की नाही हे ठरवू शकत नाहीत. यावर एकमेव उपाय म्हणजे रिअल-टाइम टेस्टिंग मशीन असायला हवे. वरील गोष्ट एक राखाडी क्षेत्र असून एखाद्यावर राखाडी क्षेत्र वापरल्याचा आरोप करणे हे चुकीचे आहे. शेवटी, क्रीजवर थांबणे कायदेशीर आहे की नाही? मला वाटते की ते पूर्णपणे कायदेशीर आहे, कारण ती त्याची नियमित कृती आहे.” असे उत्तर आर आश्विनने दिले






