India Nuclear Shift: चीन-पाकिस्तानला धडकी! भारत शांततेच्या काळातही क्षेपणास्त्रे ठेवणार 'रेडी टू फायर'; SIPRI अहवालाचा मोठा दावा ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया )
SIPRI Yearbook 2025 India nuclear report : जागतिक स्तरावर शस्त्रास्त्रांवर लक्ष ठेवणाऱ्या ‘स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट’ (SIPRI) च्या २०२५ च्या ताज्या अहवालाने जगभरात खळबळ उडवून दिली आहे. या अहवालानुसार, भारताने आपल्या अण्वस्त्र धोरणात (India Nuclear Doctrine) एक अत्यंत महत्त्वाचा आणि धोरणात्मक बदल केला आहे. आतापर्यंत शांततेच्या काळात भारत आपली अण्वस्त्रे (Warheads) आणि क्षेपणास्त्रे (Launchers) वेगळी ठेवत असे. मात्र, बदलत्या भू-राजकीय परिस्थितीमुळे भारताने आता ही शस्त्रे एकमेकांना जोडून सज्ज ठेवण्यास सुरुवात केली आहे, जेणेकरून कोणत्याही हल्ल्याला काही सेकंदात प्रत्युत्तर देता येईल.
SIPRI च्या अहवालात दावा करण्यात आला आहे की, भारत आता आपली क्षेपणास्त्रे विशेष ‘कॅनिस्टर’मध्ये साठवत आहे. याचा तांत्रिक अर्थ असा की, क्षेपणास्त्रावर अणुबॉम्ब आधीच बसवलेला असतो आणि ते कोणत्याही क्षणी डागण्यासाठी तयार असते. याला ‘रेडी टू फायर’ स्थिती म्हणतात. भारताचे ‘अग्नी-५’ आणि ‘अग्नी प्राईम’ सारखी प्रगत क्षेपणास्त्रे याच तंत्रज्ञानावर आधारित आहेत. यामुळे भारताची ‘सेकंड स्ट्राईक कॅपॅबिलिटी’ म्हणजेच शत्रूच्या पहिल्या हल्ल्यानंतरही शत्रूला उद्ध्वस्त करण्याची क्षमता कैक पटीने वाढली आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Trade Deal: ‘मेक इन इंडिया’ला मिळाले जागतिक पंख; मोदींच्या एका ‘ट्विट’ने बदललं जागतिक समीकरण अन् India-US मैत्री आणखी घट्ट
अहवालानुसार, जानेवारी २०२५ पर्यंत भारताकडे एकूण १८० अण्वस्त्रे आहेत, तर पाकिस्तानकडे १७० अण्वस्त्रे आहेत. गेल्या एका वर्षात भारताने आपल्या साठ्यात ८ ते १० अण्वस्त्रांची भर घातली आहे. सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे भारताचे लक्ष आता केवळ पाकिस्तानवर मर्यादित राहिलेले नाही. भारताने आता अशी लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे विकसित केली आहेत जी चीनच्या उत्तरेकडील टोकापर्यंत मारा करू शकतात. यामध्ये ‘मिशन दिव्यास्त्र’ अंतर्गत यशस्वी चाचणी केलेल्या ‘MIRV’ तंत्रज्ञानाचा मोठा वाटा आहे, ज्याद्वारे एकाच क्षेपणास्त्रातून अनेक शहरांवर एकाच वेळी अणुहल्ला करता येतो.
The 9 nuclear-armed states —🇺🇸🇷🇺🇬🇧🇫🇷🇨🇳🇮🇳🇵🇰🇰🇵🇮🇱— together possessed an estimated 12 241 warheads at the start of 2025.
Download this chapter of #SIPRIYearbook 2025 on world nuclear forces to learn more about nuclear weapon stockpiles: https://t.co/MAngslwHZi#NewSTART… pic.twitter.com/DZIadvH4LZ — SIPRI (@SIPRIorg) February 6, 2026
credit – social media and Twitter
तज्ज्ञांच्या मते, गलवान संघर्ष आणि पाकिस्तानच्या सीमेवरील वाढत्या कुरापतींमुळे भारतीय धोरणकर्त्यांना आपली ‘नो फर्स्ट युज’ (आधी वापर नाही) ही भूमिका कायम ठेवूनही अधिक आक्रमक सज्जता ठेवणे भाग पडले आहे. आयआयपीएचे प्राध्यापक डॉ. मनन द्विवेदी यांच्या मते, जग एका नवीन शस्त्रास्त्रांच्या शर्यतीत ओढले जात आहे. रशिया-युक्रेन आणि इस्रायल-इराण युद्धांमुळे निर्माण झालेल्या अनिश्चिततेमुळे भारताला आपली अण्वस्त्र त्रयी (Nuclear Triad) अधिक ‘लाईव्ह’ आणि सक्रिय ठेवावी लागत आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Islamabad Blast: काश्मीरचा पाकिस्तानला शेवटचा सलाम? बारामुल्ला ते श्रीनगर.. रस्त्यावर फक्त एकच घोषणा, ‘पाकिस्तान मुर्दाबाद’
भारताने समुद्रावर आधारित अण्वस्त्र सज्जतेवर (Sea-based Deterrence) अधिक भर दिला आहे. आयएनएस अरिहंत आणि नवनियुक्त आयएनएस अरिघात या अण्वस्त्रधारी पाणबुड्या सातत्याने गस्त घालत आहेत. या पाणबुड्यांवर तैनात असलेली के-१५ आणि के-४ ही बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे भारताला शत्रूच्या नजरेत न येता खोल समुद्रातून हल्ला करण्याची अफाट शक्ती देतात.
Ans: यामध्ये क्षेपणास्त्र एका बंद कंटेनरमध्ये अण्वस्त्रासह साठवले जाते, ज्यामुळे ते दीर्घकाळ टिकते आणि युद्धाच्या वेळी अतिशय कमी वेळात डागता येते.
Ans: होय, SIPRI २०२५ अहवालानुसार भारताकडे अंदाजे १८० अण्वस्त्रे आहेत, तर पाकिस्तानकडे १७० अण्वस्त्रे आहेत.
Ans: अधिकृतपणे भारताचे धोरण बदललेले नाही, परंतु अण्वस्त्रे क्षेपणास्त्रांना जोडून ठेवल्यामुळे भारताची प्रत्युत्तर देण्याची गती (Response Time) प्रचंड वाढली आहे.






