India-Pakistan Crisis: पाकिस्तानला हल्ल्याची भीती! भारत युद्धाची तयारी करत असल्याचा झरदारींनी केला दावा
India-Pakistan Crisis: ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानला भारताकडून आणखी एका हल्ल्याची भीती वाटत आहे. पाकिस्तानचे राष्ट्रपती आसिफ अली झरदारी यांनीच भारत आणखी एका युद्धाची तयारी करत असल्याचा दावा केला आहे. भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तान अद्यापही सावरलेला नाही. अशातच पाकला पुन्हा एकदा भारताच्या हल्ल्याची भीती वाटत आहे. पाकिस्तानी अध्यक्ष आसिफ अली झरदारी यांच्या अलीकडील एक विधानावरून हे स्पष्ट झाले आहे. आसिफ अली झरदारी यांनी दावा केला की, भारत “दुसऱ्या युद्धाची तयारी करत आहे.” यामुळे पुन्हा भारत-पाकिस्तान युद्ध होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
हे देखील वाचा: Israel-Iran War: इराणच्या राष्ट्रपती भवनावर इस्रायलचा भीषण बॉम्बहल्ला; 787 लोकांचा करुण अंत
पाकिस्तानकडून दहशतवादी संघटनांना आश्रय देत असल्याचे जयस्वाल यांनी सांगितले. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी म्हटले आहे की, पाकिस्तान स्वतः दहशतवादी संघटनांना आश्रय देत आहे. आपल्या अंतर्गत अपयशासाठी शेजाऱ्यांना दोष देणे ही पाकिस्तानची जुनी सवय आहे. अफगाणिस्तान आपल्या भूभागावर आपले सार्वभौमत्व वापरत आहे यामुळे पाकिस्तान संतप्त आहे. गेल्या महिन्यात पाकिस्तानने अफगाणिस्तानवर केलेल्या हवाई हल्ल्यांचा भारताने तीव्र निषेध केला. पाकिस्तान नेहमी काहीतरी खुरापती करत असते. यामुळे ते स्वत: संकटांना आमंत्रण देत असल्याचे दिसून येते. सध्या इराण-इस्राइल युद्ध तीव्र होताना दिसत असताना पाकिस्तानच्या या दाव्याने अजून कोणते नवे वळण येते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
हे देखील वाचा: स्वतः तालिबानकडून धोबीपछाड…; तरीही पाकिस्तानला हवंय America-Iran मध्ये मध्यस्थीचं ‘टेंडर’
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने आरोप फेटाळले आहेत. परंतु, संसदेच्या संयुक्त अधिवेशनाला संबोधित करताना पाकिस्तानी राष्ट्रपती म्हणाले, “भारतीय नेते म्हणत आहेत की ते दुसऱ्या युद्धाची तयारी करत आहेत. भारताला माझे सांगणे आहे की त्यांनी चर्चेसाठी पुढे यावे. युद्ध हा पर्याय नाही. कारण प्रादेशिक सुरक्षेचा हा एकमेव मार्ग आहे.” जरदारी यांनी अफगाणिस्तानमधील तालिबान सरकारवर भारताचे प्रतिनिधी म्हणून काम केल्याचा आरोप केला. झरदारी यांनी अफगाणिस्तानला सांगितले, “दुसऱ्या देशाच्या महत्त्वाकांक्षेसाठी स्वतःला युद्धभूमी बनवणे थांबवा. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने पाकिस्तानचे आरोप स्पष्टपणे फेटाळून लावले आहेत.
डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.






