इराण-अमेरिका करारामुळे पाकिस्तान अस्वस्थ; स्वत:ला शांतिदूत म्हणत केलं 'हे' मोठं विधान ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
इस्लामाबाद : गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक घडामोडी घडत आहेत. पश्चिम आशियातील सध्याचा तणाव आणि इराण-अमेरिका संघर्षाच्या पार्श्वभूमीवर, पाकिस्तान पुन्हा एकदा स्वतःला शांतिदूत म्हणून जगासमोर येण्याचा प्रयत्न करत आहे. पाकिस्तानी पंतप्रधानांनी इराण आणि अमेरिका यांच्यात लवकरच शांतता करार होण्याची आशा व्यक्त केली आहे.
आर्थिक संकट आणि प्रादेशिक दबावाशी झुंज देणारा पाकिस्तान या संपूर्ण घडामोडीत आपली उपयुक्तता सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहे. पाकिस्तानची चिंता या कारणामुळेही वाढली आहे की, पश्चिम आशियातील दीर्घकाळ चालणाऱ्या तणावाचा थेट परिणाम त्याच्या नाजूक अर्थव्यवस्थेवर आणि तेल पुरवठ्यावर होऊ शकतो. ईद-उल-अझहाच्या निमित्ताने पाकिस्तानी पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि इराणचे राष्ट्रपती यांच्यात दूरध्वनीवरून संभाषण झाले. या संभाषणादरम्यान, शाहबाज यांनी इराण आणि अमेरिका यांच्यात लवकरच एक करार होईल, ज्यामुळे संपूर्ण प्रदेशात शांतता आणि स्थिरता प्रस्थापित होईल, अशी आशा व्यक्त केली आहे.
शांतिदूत बनलेला पाकिस्तान आता बनू शकतो ‘खलनायक’; ट्रम्प यांच्या अब्राहम करारामुळे शाहबाज अडकले पेचात
दरम्यान, पाकिस्तान नेहमीच इराणच्या पाठीशी उभा राहील. पाकिस्तानी पंतप्रधानांच्या कार्यालयानुसार, दोन्ही नेत्यांनी प्रादेशिक परिस्थिती आणि पश्चिम आशिया संकटावर चर्चा केली. या चर्चेदरम्यान, पाकिस्तानने आपले लष्करप्रमुख, फील्ड मार्शल मुनीर यांच्या भूमिकेवर प्रकाश टाकला. इराणनेही असिम मुनीर यांच्या शांतता प्रयत्नांची प्रशंसा केल्याचे वृत्त आहे.
पाकिस्तानकडून अस्तित्त्वासाठी प्रयत्न सुरु
पाकिस्तान आपले आंतरराष्ट्रीय महत्त्व वाढवून या प्रकरणात आपली राजनैतिक उपस्थिती वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. पाकिस्तान बऱ्याच काळापासून आर्थिक संकट, राजकीय अस्थिरता आणि दहशतवादी प्रतिमेचा सामना करत आहे. त्यामुळे, त्याला पश्चिम आशिया संकटाचा आपल्या फायद्यासाठी वापर करायचा आहे.
संपूर्ण जगाला बसतोय युद्धाचा फटका
इराण आणि अमेरिका, इस्त्रायल या देशांतील संबंध चांगलेच ताणल्याचे दिसून येत आहे. इराणवर अमेरिका आणि इस्त्रायल या देशांकडून हल्ले करण्यात आले होते. त्याला इराणनेही प्रत्युत्तर दिले. मात्र, या युद्धाचा फटका संपूर्ण जगाला बसत आहे. त्यामुळेच पाकिस्तानकडून मध्यस्थीची भूमिका घेतल्याचे समोर आले होते. त्यानंतर आता पाकिस्तान अशा पेचात सापडला आहे, जिथे सहमत होऊनही तो अडकेल आणि नकार दिल्यास आणखी मोठ्या संकटात सापडेल.






