Sheikh Hasina : 'मला मरणाची भीती नाही…' शेख हसीना यांचा मोठा निर्णय; जीवाला धोका असूनही मायदेशी परतणार? (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
हे देखील वाचा : US Visa Investigations : भारतीयांचे अमेरिकन ड्रीम धोक्यात? H-1B व्हिसा गैरव्यवहार प्रकरणी चौकशी सुरु; IT कंपन्यांची वाढली चिंता
शेख हसीना यांनी म्हटले की, बांगलादेशला परतल्यानंतर त्यांनी अटक होऊ शकते. एवढेच नव्हे तर त्यांची हत्याही होऊ शकते. परंतु त्या तरीही मायदेशी परतणार आहत. मला माझ्या मातीतच राहायचे आहे. माझे आई-वडील जिथे दफन आहेत ज्या भूमीसाठी त्यांनी बलिदान दिले,त्याचा मातीत माझा शेवट व्हावा अशा इच्छा त्यांनी व्यक्त केली.
याशिवाय त्यांनी हेही स्पष्ट केले की, अवामी लीगचे अनेक वरिष्ठ नेतेही त्यांच्यासोबत परतणार आहेत. त्या आणि इतर नेते न्यायालयीन प्रक्रियेला सामोरे जातील माजी गृहमंत्री असदुझ्जान खान कमा यांचाही यामध्ये सामावेश आहे. त्यांनाही न्यायालयाने मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली आहे.
२०२४ ऑगस्टमध्ये हसीना सरकारविरोधात विद्यार्थ्यांनी देशव्यापी आंदोलन केले होते. या आंदोलनानंतर हसीन यांना सत्ता सोडावी लागली आणि त्यांनी भारतात आश्रय घेतला. दरम्यान हसीना यांच्या प्रत्यार्पणाची अनेकदा भारताकडे मागणीही करण्यात आली होती. ढाक्यातील सध्याच्या सत्ताधारी सरकारने त्यांना न्यायालयासमोर हजर करण्याची भूमिका कायम ठेवली होती.
नोव्हेंबर २०२५ मध्ये बांगलादेशच्या इंटनशनल क्राइम्स ट्रिब्युलने शेख हसीना यांच्या अनुउपस्थितीत मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली होती. त्यांच्यावर २०२४ मध्ये धालेल्या विद्यार्थी आंदोलनादरम्यान झालेल्या कारवाईत १,४०० जणांचा मृत्यूचा आरोप ठेवण्यात आला होता. परंतु हे सर्व आरोप राजकीय हेतून प्रेरित असल्याचा दावा शेख हसीना यांनी केला आहे. सध्या त्या डिसेंबर महिन्यात बांगलादेशला परतणार असून संपूर्ण जगाचे लक्ष्य तेथील घडामोडींकडे लागले आहे.
हे देखील वाचा : Spain Wildfire : स्पेनमध्ये जंगल वणव्याचा हाहा:कार! आगीत होरपळून १२ जणांचा मृत्यू; अनेक लोक बेपत्त






