• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • अन्य
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • World »
  • Will Indias Indus Move Cause Pak Drought Pok Floods

सिंधू पाणी कराराचा भारताच्या निर्णयामुळे पाकिस्तानात दुष्काळ आणि POKमध्ये येणार पूर? उपग्रह प्रतिमांमधून सत्य उघड

Indus Water Treaty suspension : काश्मीरमधील पहलगाम येथे नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात अनेक निर्णायक पावले उचलली आहेत.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: May 02, 2025 | 02:30 PM
Will India’s Indus move cause Pak drought POK floods

सिंधू पाणी कराराचा भारताच्या निर्णयामुळे पाकिस्तानात दुष्काळ आणि POKमध्ये येणार पूर? उपग्रह प्रतिमांमधून सत्य उघड ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

Indus Water Treaty suspension : काश्मीरमधील पहलगाम येथे नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात अनेक निर्णायक पावले उचलली आहेत. यामध्ये पाक नागरिकांचे व्हिसा रद्द करणे, हवाई आणि स्थलसीमा बंद करणे, तसेच सिंधू पाणी करार (Indus Waters Treaty – IWT) पुन्हा विचाराधीन ठेवणे या उपाययोजनांचा समावेश आहे. याच पार्श्वभूमीवर पाकिस्तानातून आरोप केला जात आहे की, भारताने अचानक पाण्याचा प्रवाह रोखला किंवा तोडून सोडला, ज्यामुळे पीओके आणि इतर भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे, तर सोशल मीडियावर काही भारतीय वापरकर्ते दावा करत आहेत की यामुळे पाकिस्तानात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होईल. मात्र, उपग्रह प्रतिमांवर आधारित विश्लेषण या दोन्ही दाव्यांमध्ये तथ्य नसल्याचे स्पष्ट करते.

उपग्रह छायाचित्रांमधून सत्य उघड

इंडिया टुडेच्या ओएसआयएनटी (OSINT) टीमने सरकारी आकडेवारी आणि उपग्रह प्रतिमांचे विश्लेषण केले असता असे आढळले की, 30 एप्रिलपर्यंत झेलम, चिनाब आणि सिंधू नद्यांमधील पाण्याचा प्रवाह नेहमीप्रमाणेच होता. म्हणजेच, पहलगाम हल्ल्यानंतरही भारताने प्रत्यक्षात सिंधू पाणी कराराचे पालनच केले आहे.

युरोपियन स्पेस एजन्सीच्या (ESA) उपग्रह छायाचित्रांनुसार, भारतात स्थित झेलमवरील उरी धरण, चिनाबवरील बागलिहार धरण, आणि सिंधूवरील निमू-बाजगो प्रकल्प, यामध्ये पाण्याचा साठा किंवा प्रवाह पूर्णपणे सामान्य आहे. याचप्रमाणे पाकिस्तानातील मंगला, मराला आणि जिना बॅरेजमध्येही कोणताही असामान्य पाणीस्तर आढळून आलेला नाही.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : ‘हो, आम्हीच दहशतवाद्यांना पोसले…’ ख्वाजा आसिफनंतर बिलावल भुट्टोनेही कबूल केला पाकिस्तानचा गुन्हा

भारतीय निर्णयाचा संभाव्य परिणाम काय?

सद्यस्थितीत पाण्याचा प्रवाह नेहमीसारखाच आहे. मात्र, भारताने जलविज्ञानविषयक माहिती (hydrological data) पाकिस्तानला देणे थांबवल्यास त्याचा मोठा परिणाम पाकिस्तानच्या सिंचन व्यवस्थेवर आणि पूर नियंत्रणावर होऊ शकतो. यामुळे शेतीवर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विशेषतः जेव्हा पूर किंवा पावसाळा सुरू होतो, तेव्हा या डेटाचा उपयोग करून पाकिस्तान जलव्यवस्थापनाचे निर्णय घेतो. जर हा डेटा दिला गेला नाही, तर नियोजनात अडथळा निर्माण होईल आणि पीओकेसारख्या प्रदेशांत पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता वाढेल.

पाणी रोखणे सध्या शक्य नाही, भू-विश्लेषक राज भगत यांचे मत

प्रसिद्ध भू-विश्लेषक राज भगत यांच्या मते, पश्चिमेकडील नद्यांचा प्रवाह थांबविणे केवळ राजकीय निर्णय नाही तर तांत्रिकदृष्ट्याही अवघड आहे. त्यासाठी मोठी धरणं, कालवे आणि यंत्रणा आवश्यक आहेत, ज्यासाठी अनेक वर्षे लागतील. त्यांनी स्पष्ट केले की, “सध्या भारताकडे झेलम, चिनाब आणि सिंधू या नद्यांचे पाणी अडवण्यासाठी पुरेशी संरचना नाही. त्यामुळे सध्या या नद्या जशा वाहत होत्या, तशाच वाहत आहेत.”

सिंधू करार, एक ऐतिहासिक करार

1960 साली विश्व बँकेच्या मध्यस्थीने भारत आणि पाकिस्तान यांच्यात हा सिंधू पाणी करार झाला. या करारानुसार, रावी, बियास आणि सतलज नद्यांचे पाणी भारताच्या हक्काचे आहे, तर झेलम, चिनाब आणि सिंधू नद्यांचे पाणी पाकिस्तानच्या वापरासाठी राखीव ठेवण्यात आले आहे. तथापि, भारत या पश्चिमेकडील नद्यांवर जलविद्युत प्रकल्प आणि सिंचनासाठी काही मर्यादित स्वरूपात पाणी वापरू शकतो, अशी मुभा करारात दिली आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : POK मध्ये हमासची उपस्थिती; पहलगाम हल्ल्यापूर्वी पाकसोबत मोठा कट रचल्याचा खळबळजनक उलगडा

सध्यातरी काही बदल नाही, परंतु भविष्यात धोका संभवतो

उपग्रह प्रतिमा आणि जलविद्युत प्रकल्पांमधील स्थिती पाहता, भारताने सिंधू पाणी कराराचे अद्याप उल्लंघन केलेले नाही. पण भारत डेटा शेअरिंग थांबवल्यास, त्याचे दीर्घकालीन परिणाम पाकिस्तानच्या जल आणि कृषी व्यवस्थेवर होऊ शकतात. या सर्व घडामोडी दहशतवादविरोधी लढ्यात भारताच्या दृष्टीकोनातून दबाव वाढवण्याचे प्रयत्न म्हणून पाहिल्या जात आहेत. मात्र प्रत्यक्षात जलसंधारणासाठी मोठ्या योजनांशिवाय पाण्याचा प्रवाह अडवणे सध्या अशक्य आहे – आणि हेच सत्य उपग्रह प्रतिमांमधून समोर आले आहे.

Web Title: Will indias indus move cause pak drought pok floods

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: May 02, 2025 | 02:30 PM

Topics:  

  • india pakistan war
  • international news
  • Pahalgam Terror Attack
  • sindhu river

संबंधित बातम्या

पाकिस्तानी दावे ठरले फोल! ‘Operation Sindoor’दरम्यान पाक नौदलाने केले ‘असे’ होते पलायन, पहा Satellite images
1

पाकिस्तानी दावे ठरले फोल! ‘Operation Sindoor’दरम्यान पाक नौदलाने केले ‘असे’ होते पलायन, पहा Satellite images

इराकमधील नरसंहाराचे काळेकुट्ट पान! अल-खफसा येथे सर्वात मोठ्या एकाच कबरीत दफन 4 हजारांहून अधिक मृतदेह
2

इराकमधील नरसंहाराचे काळेकुट्ट पान! अल-खफसा येथे सर्वात मोठ्या एकाच कबरीत दफन 4 हजारांहून अधिक मृतदेह

Russia Nuclear System : रशियन ‘डेड हँड’ अणु प्रणाली बनू शकते संपूर्ण जगासाठी धोक्याची घंटा; वाचा काय आहे खासियत?
3

Russia Nuclear System : रशियन ‘डेड हँड’ अणु प्रणाली बनू शकते संपूर्ण जगासाठी धोक्याची घंटा; वाचा काय आहे खासियत?

भारत रशियाला मोठा धक्का देणार? ‘या’ आवश्यक गोष्टीची खरेदी कमी करण्याची तयारी
4

भारत रशियाला मोठा धक्का देणार? ‘या’ आवश्यक गोष्टीची खरेदी कमी करण्याची तयारी

ताज्या बातम्या

पुढे वाचा
वृद्ध महिलेला ऑनलाइन १ लिटर दूध ऑर्डर करणे महागात पडले, १८.५ लाख रुपये गमावले

वृद्ध महिलेला ऑनलाइन १ लिटर दूध ऑर्डर करणे महागात पडले, १८.५ लाख रुपये गमावले

Devendra Fadnavis: “… हे नवीन पिढीपर्यंत पोहोचेल”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन

Devendra Fadnavis: “… हे नवीन पिढीपर्यंत पोहोचेल”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन

मतचोरीने लोकशाहीची लावली वाट…आण्णा हजारेंना कशी आली नाही जाग?

मतचोरीने लोकशाहीची लावली वाट…आण्णा हजारेंना कशी आली नाही जाग?

महिलेचे दागिने चोरणाऱ्याला दिल्लीतून ठोकल्या बेड्या; चौकशीतून आरोपीबाबत धक्कादायक माहिती समोर

महिलेचे दागिने चोरणाऱ्याला दिल्लीतून ठोकल्या बेड्या; चौकशीतून आरोपीबाबत धक्कादायक माहिती समोर

गाझामधे पसरतोय खतरनाक व्हायरस, तब्बल १०० हून अधिक लहान मुलांना लागण.. काय आहे प्रकरण?

गाझामधे पसरतोय खतरनाक व्हायरस, तब्बल १०० हून अधिक लहान मुलांना लागण.. काय आहे प्रकरण?

Asia Cup 2025: गेल्या टी-२० आशिया कपपासून भारतीय संघात किती बदल? कोण इन, कोण आऊट, वाचा सविस्तर

Asia Cup 2025: गेल्या टी-२० आशिया कपपासून भारतीय संघात किती बदल? कोण इन, कोण आऊट, वाचा सविस्तर

‘कोर्टात मी ओरडत राहिले, रडत होते’, पहिल्यांदाच धनश्रीने युझवेंद्र चहलशी घटस्फोटानंतर सोडले मौन, ‘टी-शर्ट स्टंट…’

‘कोर्टात मी ओरडत राहिले, रडत होते’, पहिल्यांदाच धनश्रीने युझवेंद्र चहलशी घटस्फोटानंतर सोडले मौन, ‘टी-शर्ट स्टंट…’

व्हिडिओ

पुढे बघा
Kalyan : कल्याणमध्ये पावसामुळे कोसळली घराची भिंत ‪

Kalyan : कल्याणमध्ये पावसामुळे कोसळली घराची भिंत ‪

Kolhapur News : राजकीय सोयीसाठी प्रभाग पद्धत रद्द करावी-असीम सरोदे

Kolhapur News : राजकीय सोयीसाठी प्रभाग पद्धत रद्द करावी-असीम सरोदे

Parbhani : कृषी पदवीधारकांचा आक्रोश मोर्चा; विद्यापीठातील जागा भरण्याची मागणी

Parbhani : कृषी पदवीधारकांचा आक्रोश मोर्चा; विद्यापीठातील जागा भरण्याची मागणी

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांचे बेमुदत आंदोलन, नेमकं प्रकरण काय ?

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांचे बेमुदत आंदोलन, नेमकं प्रकरण काय ?

Palghar : पालघरमध्ये ठेकेदारांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रमक आंदोलन

Palghar : पालघरमध्ये ठेकेदारांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रमक आंदोलन

Ahilyanagar : अजित पवारांचे गोरक्षकांविरोधी विधान, सागर बेगांचा संतप्त सवाल

Ahilyanagar : अजित पवारांचे गोरक्षकांविरोधी विधान, सागर बेगांचा संतप्त सवाल

Thane : ठाणे ते CSMT सर्व ट्रेन रद्द, प्रवाशांची फलाटावर गर्दी

Thane : ठाणे ते CSMT सर्व ट्रेन रद्द, प्रवाशांची फलाटावर गर्दी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.