• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • World »
  • Will Indias Indus Move Cause Pak Drought Pok Floods

सिंधू पाणी कराराचा भारताच्या निर्णयामुळे पाकिस्तानात दुष्काळ आणि POKमध्ये येणार पूर? उपग्रह प्रतिमांमधून सत्य उघड

Indus Water Treaty suspension : काश्मीरमधील पहलगाम येथे नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात अनेक निर्णायक पावले उचलली आहेत.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: May 02, 2025 | 02:30 PM
Will India’s Indus move cause Pak drought POK floods

सिंधू पाणी कराराचा भारताच्या निर्णयामुळे पाकिस्तानात दुष्काळ आणि POKमध्ये येणार पूर? उपग्रह प्रतिमांमधून सत्य उघड ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

Indus Water Treaty suspension : काश्मीरमधील पहलगाम येथे नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात अनेक निर्णायक पावले उचलली आहेत. यामध्ये पाक नागरिकांचे व्हिसा रद्द करणे, हवाई आणि स्थलसीमा बंद करणे, तसेच सिंधू पाणी करार (Indus Waters Treaty – IWT) पुन्हा विचाराधीन ठेवणे या उपाययोजनांचा समावेश आहे. याच पार्श्वभूमीवर पाकिस्तानातून आरोप केला जात आहे की, भारताने अचानक पाण्याचा प्रवाह रोखला किंवा तोडून सोडला, ज्यामुळे पीओके आणि इतर भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे, तर सोशल मीडियावर काही भारतीय वापरकर्ते दावा करत आहेत की यामुळे पाकिस्तानात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होईल. मात्र, उपग्रह प्रतिमांवर आधारित विश्लेषण या दोन्ही दाव्यांमध्ये तथ्य नसल्याचे स्पष्ट करते.

उपग्रह छायाचित्रांमधून सत्य उघड

इंडिया टुडेच्या ओएसआयएनटी (OSINT) टीमने सरकारी आकडेवारी आणि उपग्रह प्रतिमांचे विश्लेषण केले असता असे आढळले की, 30 एप्रिलपर्यंत झेलम, चिनाब आणि सिंधू नद्यांमधील पाण्याचा प्रवाह नेहमीप्रमाणेच होता. म्हणजेच, पहलगाम हल्ल्यानंतरही भारताने प्रत्यक्षात सिंधू पाणी कराराचे पालनच केले आहे.

युरोपियन स्पेस एजन्सीच्या (ESA) उपग्रह छायाचित्रांनुसार, भारतात स्थित झेलमवरील उरी धरण, चिनाबवरील बागलिहार धरण, आणि सिंधूवरील निमू-बाजगो प्रकल्प, यामध्ये पाण्याचा साठा किंवा प्रवाह पूर्णपणे सामान्य आहे. याचप्रमाणे पाकिस्तानातील मंगला, मराला आणि जिना बॅरेजमध्येही कोणताही असामान्य पाणीस्तर आढळून आलेला नाही.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : ‘हो, आम्हीच दहशतवाद्यांना पोसले…’ ख्वाजा आसिफनंतर बिलावल भुट्टोनेही कबूल केला पाकिस्तानचा गुन्हा

भारतीय निर्णयाचा संभाव्य परिणाम काय?

सद्यस्थितीत पाण्याचा प्रवाह नेहमीसारखाच आहे. मात्र, भारताने जलविज्ञानविषयक माहिती (hydrological data) पाकिस्तानला देणे थांबवल्यास त्याचा मोठा परिणाम पाकिस्तानच्या सिंचन व्यवस्थेवर आणि पूर नियंत्रणावर होऊ शकतो. यामुळे शेतीवर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विशेषतः जेव्हा पूर किंवा पावसाळा सुरू होतो, तेव्हा या डेटाचा उपयोग करून पाकिस्तान जलव्यवस्थापनाचे निर्णय घेतो. जर हा डेटा दिला गेला नाही, तर नियोजनात अडथळा निर्माण होईल आणि पीओकेसारख्या प्रदेशांत पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता वाढेल.

पाणी रोखणे सध्या शक्य नाही, भू-विश्लेषक राज भगत यांचे मत

प्रसिद्ध भू-विश्लेषक राज भगत यांच्या मते, पश्चिमेकडील नद्यांचा प्रवाह थांबविणे केवळ राजकीय निर्णय नाही तर तांत्रिकदृष्ट्याही अवघड आहे. त्यासाठी मोठी धरणं, कालवे आणि यंत्रणा आवश्यक आहेत, ज्यासाठी अनेक वर्षे लागतील. त्यांनी स्पष्ट केले की, “सध्या भारताकडे झेलम, चिनाब आणि सिंधू या नद्यांचे पाणी अडवण्यासाठी पुरेशी संरचना नाही. त्यामुळे सध्या या नद्या जशा वाहत होत्या, तशाच वाहत आहेत.”

सिंधू करार, एक ऐतिहासिक करार

1960 साली विश्व बँकेच्या मध्यस्थीने भारत आणि पाकिस्तान यांच्यात हा सिंधू पाणी करार झाला. या करारानुसार, रावी, बियास आणि सतलज नद्यांचे पाणी भारताच्या हक्काचे आहे, तर झेलम, चिनाब आणि सिंधू नद्यांचे पाणी पाकिस्तानच्या वापरासाठी राखीव ठेवण्यात आले आहे. तथापि, भारत या पश्चिमेकडील नद्यांवर जलविद्युत प्रकल्प आणि सिंचनासाठी काही मर्यादित स्वरूपात पाणी वापरू शकतो, अशी मुभा करारात दिली आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : POK मध्ये हमासची उपस्थिती; पहलगाम हल्ल्यापूर्वी पाकसोबत मोठा कट रचल्याचा खळबळजनक उलगडा

सध्यातरी काही बदल नाही, परंतु भविष्यात धोका संभवतो

उपग्रह प्रतिमा आणि जलविद्युत प्रकल्पांमधील स्थिती पाहता, भारताने सिंधू पाणी कराराचे अद्याप उल्लंघन केलेले नाही. पण भारत डेटा शेअरिंग थांबवल्यास, त्याचे दीर्घकालीन परिणाम पाकिस्तानच्या जल आणि कृषी व्यवस्थेवर होऊ शकतात. या सर्व घडामोडी दहशतवादविरोधी लढ्यात भारताच्या दृष्टीकोनातून दबाव वाढवण्याचे प्रयत्न म्हणून पाहिल्या जात आहेत. मात्र प्रत्यक्षात जलसंधारणासाठी मोठ्या योजनांशिवाय पाण्याचा प्रवाह अडवणे सध्या अशक्य आहे – आणि हेच सत्य उपग्रह प्रतिमांमधून समोर आले आहे.

Web Title: Will indias indus move cause pak drought pok floods

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: May 02, 2025 | 02:30 PM

Topics:  

  • india pakistan war
  • international news
  • Pahalgam Terror Attack
  • sindhu river

संबंधित बातम्या

US-Venezuela Tension: अमेरिकेची लढाऊ विमानं व युद्धनौका तैनात; व्हेनेझुएलासाठी पुढचे २४ तास तणावाचे
1

US-Venezuela Tension: अमेरिकेची लढाऊ विमानं व युद्धनौका तैनात; व्हेनेझुएलासाठी पुढचे २४ तास तणावाचे

World’s Most Unhappy Country : रडगाणं…दुःख अन् वेदना; जगातील ‘हे’ देश आहेत सर्वात जास्त दुःखी
2

World’s Most Unhappy Country : रडगाणं…दुःख अन् वेदना; जगातील ‘हे’ देश आहेत सर्वात जास्त दुःखी

Shutdown in France: अमेरिकेनंतर आता फ्रान्समध्येही शटडाऊन; नेमकी काय आहेत कारणे?
3

Shutdown in France: अमेरिकेनंतर आता फ्रान्समध्येही शटडाऊन; नेमकी काय आहेत कारणे?

Pakistan IMF Loan: कंगाल पाकिस्तानला मिळणार ‘लाइफलाईन’; IMF कडून ७ अब्ज डॉलरचे कर्ज मिळण्याची शक्यता
4

Pakistan IMF Loan: कंगाल पाकिस्तानला मिळणार ‘लाइफलाईन’; IMF कडून ७ अब्ज डॉलरचे कर्ज मिळण्याची शक्यता

ताज्या बातम्या

पुढे वाचा
२ लाख घ्या अन् अमेरिका सोडा…; कोणाला दिली ट्रम्प प्रशासनाने ही ऑफर? काय आहे प्रकरण? 

२ लाख घ्या अन् अमेरिका सोडा…; कोणाला दिली ट्रम्प प्रशासनाने ही ऑफर? काय आहे प्रकरण? 

‘मला उशीर अजिबात मंजूर नाही, लवकर पावलं उचला नाहीतर…’, ट्रम्पची हमासला धमकी

‘मला उशीर अजिबात मंजूर नाही, लवकर पावलं उचला नाहीतर…’, ट्रम्पची हमासला धमकी

Tech Tips: वारंवार तुमचा फोन चार्ज करणं पडू शकतं महागात! तुम्ही तर या चूका करत नाही ना…

Tech Tips: वारंवार तुमचा फोन चार्ज करणं पडू शकतं महागात! तुम्ही तर या चूका करत नाही ना…

Syria News : सीरियाच्या माजी राष्ट्राध्यक्षांची हत्या करण्याचा प्रयत्न; रशियामध्ये विषप्रयोग झाल्याची चर्चा

Syria News : सीरियाच्या माजी राष्ट्राध्यक्षांची हत्या करण्याचा प्रयत्न; रशियामध्ये विषप्रयोग झाल्याची चर्चा

GST 2.0 मुळे Maruti, Tata आणि Mahindra च्या विक्रीला अच्छे दिन! धडाधड विकल्या गेल्या कार

GST 2.0 मुळे Maruti, Tata आणि Mahindra च्या विक्रीला अच्छे दिन! धडाधड विकल्या गेल्या कार

Crime News: अमेरिकेत भारतीय सुरक्षित नाहीत? USA मध्ये विद्यार्थ्यावर गोळीबार अन्…; नेमके काय घडले?

Crime News: अमेरिकेत भारतीय सुरक्षित नाहीत? USA मध्ये विद्यार्थ्यावर गोळीबार अन्…; नेमके काय घडले?

भीष्मांचे पांडवांवर प्रेम तरी ते त्यांच्या विरोधात का लढले? काय होत सत्य? नक्की वाचा

भीष्मांचे पांडवांवर प्रेम तरी ते त्यांच्या विरोधात का लढले? काय होत सत्य? नक्की वाचा

व्हिडिओ

पुढे बघा
MPSC Candidate : अनुकंपा, एमपीएससीतील उमेदवारांना नियुक्तीपत्रे

MPSC Candidate : अनुकंपा, एमपीएससीतील उमेदवारांना नियुक्तीपत्रे

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?

Latur : नागरी सुविधा मिळत नसल्याने परिसरातील संतप्त नागरिक केला रस्ता रोको

Latur : नागरी सुविधा मिळत नसल्याने परिसरातील संतप्त नागरिक केला रस्ता रोको

Uday Samant : 2026 पासून रत्नागिरीतून विमानसेवा सुरू! डॉ. उदय सामंत यांची मोठी घोषणा

Uday Samant : 2026 पासून रत्नागिरीतून विमानसेवा सुरू! डॉ. उदय सामंत यांची मोठी घोषणा

Dhule News : शेतात थैमान डुकरांचा बंदोबस्त करा! शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मागणी

Dhule News : शेतात थैमान डुकरांचा बंदोबस्त करा! शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मागणी

CM Fadnavis यांची ग्वाही; Suresh Mhatre यांनी मानले आभार!

CM Fadnavis यांची ग्वाही; Suresh Mhatre यांनी मानले आभार!

RATNAGIRI : शहरातील चांगल्या कामाचे क्रेडीट कोणाला द्यायचे, हे जनता ठरवेल – दावा बंदरकर

RATNAGIRI : शहरातील चांगल्या कामाचे क्रेडीट कोणाला द्यायचे, हे जनता ठरवेल – दावा बंदरकर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.