वाहनचालकांची पहिली पसंती 'ट्यूबलेस टायर'च का? (Photo Credit- X)
ट्यूबलेस टायर म्हणजे असे टायर ज्यांच्या आत स्वतंत्र अशी रबरी ट्यूब नसते. यामध्ये हवा थेट टायर आणि व्हील रिमच्या मध्ये भरली जाते. या टायरच्या आतील बाजूला ‘हलो लायनर’ नावाचा एक खास एअरटाईट थर असतो, जो हवा बाहेर जाण्यापासून रोखतो. तसेच, टायर आणि रिममध्ये इतकी घट्ट पकड (Seal) असते की, ट्यूबशिवायही हवा दीर्घकाळ टिकून राहते.
ट्यूबलेस टायरमध्ये हवा भरल्यानंतर टायर थोडा विस्तारतो आणि रिमच्या कडांना घट्ट चिकटतो. यामुळे रिम आणि टायरमध्ये एक हवाबंद पोकळी तयार होते. जेव्हा वाहन चालते, तेव्हा टायरवर पडणाऱ्या दाबाचा परिणाम ट्यूब नसल्यामुळे विभागला जातो. यामुळे टायर आणि रिममधील संपर्क कायम राहून हवा बाहेर पडण्याची प्रक्रिया पूर्णपणे थांबते.
Maruti च्या ‘या’ 5 कार्सची विक्री धाडकन कोसळली, फेब्रुवारीत काही 45% तर काही कार्सची 80% मागणीत घट
१. अपघाताचा धोका कमी: ट्यूबलेस टायरचा सर्वात मोठा फायदा म्हणजे सुरक्षितता. साध्या टायरमध्ये खिळा शिरल्यास ट्यूब फाटून हवा अचानक बाहेर पडते, ज्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटून अपघात होऊ शकतो. मात्र, ट्यूबलेस टायरमध्ये खिळा शिरला तरी हवा अत्यंत संथ गतीने बाहेर पडते, ज्यामुळे वाहन सुरक्षित ठिकाणी नेण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो.
२. पंक्चर दुरुस्त करणे सोपे: ट्यूबलेस टायर पंक्चर झाल्यास तो दुरुस्त करण्यासाठी अनेकदा टायर रिममधून काढण्याचीही गरज पडत नाही. पंक्चर किटच्या सहाय्याने अवघ्या काही मिनिटांत दुरुस्ती करता येते.
३. इंधन कार्यक्षमता: हे टायर वजनाने हलके असतात. ट्यूब नसल्यामुळे चाकाचे वजन कमी होते आणि इंजिनवर कमी ताण पडतो, ज्यामुळे इंधनाची बचत होते.
४. कमी उष्णता: सतत धावल्यामुळे साध्या टायरमध्ये ट्यूब आणि टायरमध्ये घर्षण होऊन उष्णता निर्माण होते. ट्यूबलेस टायरमध्ये ही समस्या नसल्याने टायर जास्त गरम होत नाहीत आणि सुरक्षित राहतात.
टायर किती दिवस टिकेल हे वाहन चालवण्याची पद्धत आणि रस्त्यांच्या स्थितीवर अवलंबून असते. तरीही, सामान्यतः कारचे ट्यूबलेस टायर ४०,००० ते ६०,००० किलोमीटर पर्यंत चालू शकतात. दुचाकींच्या बाबतीत हे अंतर साधारणपणे २०,००० ते ३०,००० किलोमीटर असते. टायरमधील ‘ट्रेड्स’ (Grip) पूर्णपणे झिजण्यापूर्वी किंवा दर ५ ते ६ वर्षांनी टायर बदलणे सुरक्षेच्या दृष्टीने हिताचे ठरते.






