• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • अन्य
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Business »
  • India Has Exported 2 Lakh Crore Worth Of Smartphones So Far Nrhp

जगभरात भारताची छाप! 2 लाख कोटींची स्मार्टफोन निर्यात, इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात ऐतिहासिक यश

भारताच्या इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्राने इतिहास रचला आहे. चालू आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये भारताने आतापर्यंतची सर्वाधिक 2 लाख कोटी रुपयांची स्मार्टफोन निर्यात केली आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Apr 14, 2025 | 07:52 AM
India has exported ₹2 lakh crore worth of smartphones so far

जगभरात भारताची ख्याती, आतापर्यंत भारताने २ लाख कोटी रुपयांचे स्मार्टफोन निर्यात केले आहेत ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

नवी दिल्ली : भारताच्या इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्राने इतिहास रचला आहे. चालू आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये भारताने आतापर्यंतची सर्वाधिक २ लाख कोटी रुपयांची स्मार्टफोन निर्यात केली आहे. सेल्युलर अँड इलेक्ट्रॉनिक्स असोसिएशन (ICEA) ने दिलेल्या माहितीनुसार, ही निर्यात ५५ टक्क्यांनी वाढली असून, यामुळे भारत जगभरात एक प्रमुख इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन केंद्र म्हणून उदयास येत आहे.

मोबाईल उत्पादनातही प्रचंड वाढ

गेल्या काही वर्षांत भारताच्या इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनात मोठी वाढ झाली आहे. आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये देशातील एकूण मोबाईल फोन उत्पादनाचे मूल्य ₹४.२२ लाख कोटी इतके होते, तर २०२४-२५ मध्ये हे मूल्य वाढून ₹५.२५ लाख कोटी इतके झाले आहे.ICEA चे अध्यक्ष पंकज मोहिंद्रू यांनी सांगितले की, “ही आकडेवारी भारताच्या इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील वाढत्या क्षमतेचा स्पष्ट पुरावा आहे. केंद्र सरकारच्या उत्पादनाशी जोडलेल्या प्रोत्साहन योजनेमुळे (PLI Scheme) हा बदल शक्य झाला आहे.”

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : बांगलादेशातील 10 लाख मुस्लिमांनी केले ‘जिहाद’चे आवाहन, नेतन्याहू यांच्या पोस्टरवर चप्पलांचा मारा

PLI योजनेमुळे निर्यातीला गती

केंद्र सरकारने सुरू केलेली PLI (Production Linked Incentive) योजना ही या यशामागील मुख्य कारणांपैकी एक मानली जात आहे. या योजनेमुळे केवळ देशांतर्गत उत्पादन वाढले नाही, तर जागतिक गुंतवणूकदारांचा भारतावरचा विश्वासही वाढला. या योजनेद्वारे भारताने जागतिक मूल्य साखळीत (Global Value Chain) आपले स्थान बळकट केले आहे. Apple आणि Samsung सारख्या आघाडीच्या कंपन्यांनी भारतातील उत्पादन लक्षणीयरीत्या वाढवले आहे, ज्यामुळे स्मार्टफोन निर्यातीच्या आकडेवारीत मोठी झेप पाहायला मिळाली.

🚨 India’s smartphone exports hit record Rs 2 lakh crore, becomes country’s top export commodity. ICEA. pic.twitter.com/WZ0JSL7wUt

— Indian Tech & Infra (@IndiaTechInfra) April 11, 2025

credit : social media

जागतिक व्यापारातील बदल भारतासाठी फायदेशीर

अलीकडच्या काळात जागतिक व्यापारात मोठे बदल झाले आहेत. अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलेल्या परस्पर शुल्क धोरणांमुळे भारतासारख्या देशांना अमेरिकन बाजारपेठेत प्रवेश मिळण्याची संधी निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर ICEA अध्यक्ष मोहिंद्रू म्हणाले, “आमचे उद्दिष्ट म्हणजे भारताला सर्व प्रमुख जागतिक बाजारपेठांसाठी एक विश्वासार्ह आणि प्रमुख उत्पादन भागीदार म्हणून उभे करणे. जगाने भारताकडे इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनासाठी एक नैसर्गिक आणि धोरणात्मक पर्याय म्हणून पाहिले पाहिजे.”

भारताचा इलेक्ट्रॉनिक्समधील उदय, भविष्याची दिशा

भारत आता स्मार्टफोन निर्यातीत चीन आणि व्हिएतनामसारख्या देशांना टक्कर देत आहे. देशांतर्गत पातळीवर मजबूत उत्पादन संरचना, कुशल मनुष्यबळ, आणि धोरणात्मक सरकारी हस्तक्षेपामुळे भारताला हे यश मिळाले आहे. जसजसा भारत अधिकाधिक जागतिक उत्पादन साखळीत समाविष्ट होत आहे, तसतशी देशाची स्पर्धात्मकताही वाढत आहे. हे चित्र केवळ स्मार्टफोन क्षेत्रापुरते मर्यादित नसून, संपूर्ण इलेक्ट्रॉनिक्स आणि सेमीकंडक्टर उद्योगासाठीही महत्त्वपूर्ण आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : तहव्वूर राणाच्या तीन ‘निर्दोष’ मागण्या की दहशतवादी कटाचा नवा धागा? NIA ची तपासणी सुरुच…

 भारताची जागतिक स्तरावरील मजल

२ लाख कोटी रुपयांची निर्यात हे केवळ एक आर्थिक यश नसून, भारताच्या उत्पादन क्षेत्राच्या सामर्थ्याचे प्रतीक आहे. आगामी काळात भारत ग्लोबल मॅन्युफॅक्चरिंग हब बनण्याच्या मार्गावर असल्याचे स्पष्ट होत आहे. PLI योजना, जागतिक बाजारपेठेतील बदल, आणि आंतरराष्ट्रीय कंपन्यांची भारतातील वाढती उपस्थिती – हे सारे घटक भारताला इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनात जागतिक नेतेपद मिळवून देतील, यात शंका नाही.

Web Title: India has exported 2 lakh crore worth of smartphones so far nrhp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Apr 14, 2025 | 07:52 AM

Topics:  

  • india
  • smartphone
  • Trump tariffs

संबंधित बातम्या

400% नफा आणि 200% महसूल…Labubu Doll च्या कंपनीला लॉटरी, 6 महिन्यात पैशांचा पाऊस
1

400% नफा आणि 200% महसूल…Labubu Doll च्या कंपनीला लॉटरी, 6 महिन्यात पैशांचा पाऊस

Ajit Doval Wang Yi Meeting: चीनसोबतच्या सीमा प्रश्नावर NSA अजित डोवाल यांची चर्चा, चर्चेत नेमके काय ठरले?
2

Ajit Doval Wang Yi Meeting: चीनसोबतच्या सीमा प्रश्नावर NSA अजित डोवाल यांची चर्चा, चर्चेत नेमके काय ठरले?

Redmi च्या नव्या बजेट स्मार्टफोनची धमाकेदार एंट्री, 7,000mAh बॅटरी आणि 5G कनेक्टिव्हिटीने सुसज्ज! जाणून घ्या किंमत
3

Redmi च्या नव्या बजेट स्मार्टफोनची धमाकेदार एंट्री, 7,000mAh बॅटरी आणि 5G कनेक्टिव्हिटीने सुसज्ज! जाणून घ्या किंमत

Google Pixel 10 सिरीजच्या लाँचिंगपूर्वी कमी झाली या फोनची किंमत! 20,000 रुपयांच्या डिस्काऊंटसह खरेदी करण्याची संधी
4

Google Pixel 10 सिरीजच्या लाँचिंगपूर्वी कमी झाली या फोनची किंमत! 20,000 रुपयांच्या डिस्काऊंटसह खरेदी करण्याची संधी

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Vats Dwadashi: वत्स द्वादशी कधी आहे? जाणून घ्या या व्रताचे पूजा पद्धत आणि महत्त्व

Vats Dwadashi: वत्स द्वादशी कधी आहे? जाणून घ्या या व्रताचे पूजा पद्धत आणि महत्त्व

Asia Cup Hockey 2025 :पाकिस्तान अधिकृतपणे बाहेर; ओमानचीही स्पर्धेतून माघार, ‘या’ दोन संघांची झाली एंट्री..

Asia Cup Hockey 2025 :पाकिस्तान अधिकृतपणे बाहेर; ओमानचीही स्पर्धेतून माघार, ‘या’ दोन संघांची झाली एंट्री..

BEST Election Results: पहिल्याच परिक्षेत ठाकरे बंधु नापास, ‘बेस्ट टेस्ट’ मध्ये हरले उद्धव-राज, वाचा निकाल

BEST Election Results: पहिल्याच परिक्षेत ठाकरे बंधु नापास, ‘बेस्ट टेस्ट’ मध्ये हरले उद्धव-राज, वाचा निकाल

Pune crime news : पुण्यात पुन्हा वैष्णवी हगवणे प्रकरण; उच्चशिक्षित तरुणीने संपवलं जीवन, नवऱ्याला हवी होती सोन्याची अंगठी, फ्लॅट…

Pune crime news : पुण्यात पुन्हा वैष्णवी हगवणे प्रकरण; उच्चशिक्षित तरुणीने संपवलं जीवन, नवऱ्याला हवी होती सोन्याची अंगठी, फ्लॅट…

दीर्घकाळ तरुण दिसण्यासाठी सद्गुरूंनी सांगितलेल्या ‘या’ पदार्थांचे नियमित करा सेवन, वाढत्या वयात सुद्धा दिसाल सुंदर

दीर्घकाळ तरुण दिसण्यासाठी सद्गुरूंनी सांगितलेल्या ‘या’ पदार्थांचे नियमित करा सेवन, वाढत्या वयात सुद्धा दिसाल सुंदर

कोल्हापुरात मुसळधार पावसाचा गर्भवती महिलेला फटका; वेळेवर उपचार न मिळाल्याने भर पावसात झाली प्रसूती, बाळ दगावलं

कोल्हापुरात मुसळधार पावसाचा गर्भवती महिलेला फटका; वेळेवर उपचार न मिळाल्याने भर पावसात झाली प्रसूती, बाळ दगावलं

Zodiac Sign: गजकेसरी योगामुळे वृषभ राशीसह या राशीच्या लोकांचे चमकेल नशीब

Zodiac Sign: गजकेसरी योगामुळे वृषभ राशीसह या राशीच्या लोकांचे चमकेल नशीब

व्हिडिओ

पुढे बघा
Kalyan : कल्याणमध्ये पावसामुळे कोसळली घराची भिंत ‪

Kalyan : कल्याणमध्ये पावसामुळे कोसळली घराची भिंत ‪

Kolhapur News : राजकीय सोयीसाठी प्रभाग पद्धत रद्द करावी-असीम सरोदे

Kolhapur News : राजकीय सोयीसाठी प्रभाग पद्धत रद्द करावी-असीम सरोदे

Parbhani : कृषी पदवीधारकांचा आक्रोश मोर्चा; विद्यापीठातील जागा भरण्याची मागणी

Parbhani : कृषी पदवीधारकांचा आक्रोश मोर्चा; विद्यापीठातील जागा भरण्याची मागणी

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांचे बेमुदत आंदोलन, नेमकं प्रकरण काय ?

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांचे बेमुदत आंदोलन, नेमकं प्रकरण काय ?

Palghar : पालघरमध्ये ठेकेदारांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रमक आंदोलन

Palghar : पालघरमध्ये ठेकेदारांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रमक आंदोलन

Ahilyanagar : अजित पवारांचे गोरक्षकांविरोधी विधान, सागर बेगांचा संतप्त सवाल

Ahilyanagar : अजित पवारांचे गोरक्षकांविरोधी विधान, सागर बेगांचा संतप्त सवाल

Thane : ठाणे ते CSMT सर्व ट्रेन रद्द, प्रवाशांची फलाटावर गर्दी

Thane : ठाणे ते CSMT सर्व ट्रेन रद्द, प्रवाशांची फलाटावर गर्दी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.