काय घडलं नेमकं?
कुंवर साय यांचे कुटुंब घरात झोपलेले होते, त्यावेळी शेजारी राहणाऱ्या तुलसी सारथी (वय 26) हा कुऱ्हाड घेऊन घरात शिरला आणि झोपलेल्या सदस्यांवर अंधाधुंद हल्ला चढवला. या हल्ल्यात दोन जणांचा घटनास्थळी मृत्यू झाला, तर एक लहान मुलाचा रुग्णालयात नेत असतांना वाटेत मृत्यू झाला. तर दोघ गंभीर जखमी झाले. जखमींवर तातडीने उपचार सुरु असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. ही घटना पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास बरमकेला ब्लॉकमधील झाल गावात घडली.
पाच वर्षांपासून वाद
प्राथमिक तपासात दोन्ही कुटुंबामध्ये सुमारे पाच वर्षांपूर्वी वाद झाला होता. त्या वादातून दोन्ही कुटुंबामध्ये वैर निर्माण झाले. आरोपी तुलसी हा गावाबाहेर एका
हॉटेलमध्ये मजुरी करत होता, तर तीन दिवसांपूर्वी तो गावात परतला होता. त्याच्या वडिलांनी सांगितले की पहाटे चारच्या सुमारास तुलसी जंगलात जात असल्याचे सांगून घराबाहेर पडला. त्यानंतर काही वेळातच शेजारील घरातून आरडाओरड ऐकू आली. ग्रामस्थ घटनास्थळी पोहोचेल असता सर्वत्र रक्ताचे थारोळे आणि जखमी अवस्थेतील कुटुंबीय पाहून खळबळ उडाली.
याची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलीस घटनास्थळी तातडीने दाखल झाले. फॉरेन्सिक पथकासह वरिष्ठ अधिकारीही तपासासाठी दाखल झाले आहे. आरोपी हा पळून जाण्याच्या तयारीत होता, मात्र पोलिसांनी घेराबंदी करून त्याला अटक केली आहे. या सामूहिक हत्याकांडानंतर झाल गावात भीती आणि शोककळा पसरली आहे.
Ans: छत्तीसगड राज्यातील सारंगढ-बिलाईगढ जिल्ह्यातील झाल गावात ही घटना घडली.
Ans: दोन्ही कुटुंबांमध्ये पाच वर्षांपूर्वी झालेल्या वादातून निर्माण झालेल्या वैरातून हल्ला झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
Ans: घटनास्थळी धाव घेऊन आरोपीला घेराबंदी करून अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.






