तामिळनाडू: तामिळनाडू येथून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. बापाने आपल्या तीन निष्पाप मुलांचा गळा चिरून हत्या केल्याचे समोर आले आहे. येवढेच नाही तर हत्या केल्यानंतर स्वतः पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले आहे. आरोपीची पत्नी त्याच्यापासून वेगळी राहू लागल्यामुळे त्याने संतापाच्या भरात हत्या केल्याचे कबूल केले आहे. ही घटना पत्तुकोट्टईजवळील पेरियाकोट्टई गावात घडली आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून तपास सुरू केला आहे.
नेमकं काय प्रकरण?
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, आरोपीचं नाव विनोथ कुमार असे आहे. विनोथ कुमार याच लग्न नित्याशी झालं होत. ११ वर्षांची ओविया, ८ वर्षांची कीर्ती आणि ५ वर्षांचा ईश्वर हे त्यांच्या तीन मुलांची नावे आहेत. गेल्या सहा महिन्यांपासून विनोथ आणि नित्या यांच्यात वाद सुरु होता. ते वेगवेगळे राहत होते. नित्य आपल्या माहेरी राहत होती, तर मुलं हे आपल्या वडिलांसोबत मधुकुर गावात राहत होती. काही दिवसांपूर्वी विनोथनं नित्याशी पुन्हा एकत्र राहण्याचा प्रयत्न केला, परंतु तिने नकार दिला. त्यामुळे विनोथ खूप खचला. शुक्रवारी त्याने आपल्या मुलांसाठी मिठाई आणली, त्यांना ती दिली आणि त्यानंतर तिन्ही मुलांचा गळा चिरून हत्या केली.
पोलिसांसमोर आत्मसमर्पण
हत्या केल्यानंतर विनोथनं स्वतः थेट पोलिस ठाण्यात जाऊन आत्मसमर्पण केलं. मधुकुर पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे. पोलिसांनी सांगितलं की, घटना घडत असताना घरात अन्य कोणीही उपस्थित नव्हतं.तिन्ही मुलांचे मृतदेह पोस्टमार्टमसाठी सरकारी रुग्णालयात पाठवले आहे.
तपासात काय समोर?
हत्येमागील कारणांची सखोल चौकशी सुरू आहे. प्राथमिक तपासात समोर आलं आहे की विनोथ मानसिक ताणाखाली होता आणि वैवाहिक वादामुळे अत्यंत त्रस्त झाला होता. या घटनेनं संपूर्ण परिसर हादरला आहे. ग्रामस्थ म्हणतात की, विनोथ आपल्या मुलांवर खूप प्रेम करायचा, त्यामुळे त्याचं हे पाऊल सर्वांसाठी धक्कादायक आहे. पोलिस आता हेही शोधत आहेत की ही हत्या विनोथनं आधीच आखलेली होती का, की ती रागाच्या भरात केलेली होती.