शहरातील उकाड्यात होणारी वाढ कायम (फोटो- istockphoto)
शहरातील उकाड्यात होणारी वाढ कायम
पुणे शहरात किमान तापमानामध्ये चढ-उतार
कमाल तापमानामध्ये देखील १ अंश सेल्सिअसची घट
पुणे: गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरात किमान तापमानामध्ये चढ-उतार नोंदविण्यात येत होते. त्यामुळे शहरात कधी ढगाळ वातावरण तर कधी कडक ऊन असे चित्र होते. शुक्रवारी (ता. २७) किमान आणि कमाल तापमानामध्ये वाढ झाली. परिणामी पुणेकरांना उकाड्याचा सामना करावा लागला. पुढील दोन ते तीन दिवसांत किमान तापमानामध्ये वाढ होणार असल्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे.
शहर आणि परिसरात गेल्या काही दिवसांपासून १७ ते १८ अंश सेल्सिअस पर्यंत किमान तापमानाची नोंद करण्यात आली होती. मात्र रविवारी यामध्ये किंचित घट होऊन ते १४.७ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. तर कमाल तापमानामध्ये देखील १ अंश सेल्सिअसची घट होऊन ते ३२ अंश सेल्सिअस इतके नोंदविले गेले. दुपारी कडक ऊन पडल्याने नागरिकांना उकाड्याचा सामना करावा लागला. मात्र पुढील दोन ते तीन दिवसांत किमान आणि कमाल तापमानामध्ये वाढ होण्याची शक्यता असल्याचे हवामानशास्त्र विभागाने सांगितले आहे.
Unseasonal Rain: अवकाळीमुळे ‘राजा’ संकटात; शेतकऱ्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
पुणे आणि परिसरात शनिवारी (ता. २८) कमाल तापमान आणि किमान तापमानामध्ये किंचित वाढ होण्याची शक्यता आहे. कमाल तापमान ३३ अंश सेल्सिअस तर १५ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदविण्यात येणार आहे. आकाश मुख्यतः निरभ्र राहण्याची शक्यता आहे. तर रविवारपासून (ता. १) कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअस तर किमान तापमान १६ अंश सेल्सिअस नोंदविण्यात येणार आहे. आकाश मुख्यतः निरभ्र राहण्याची शक्यता आहे.
260 किमी वेगाने विनाश जवळ येतोय!
देशातील हवामानात सतत बदल होताना दिसत आहे. उत्तर भारतापासून दक्षिण भारतापर्यंत हवामान लोकांना आश्चर्यचकित करत आहे. राजधानी दिल्लीत उष्णता वाढत आहे, तर डोंगराळ भागात पाऊस आणि बर्फवृष्टीचा इशारा जारी करण्यात आला आहे. दरम्यान, हिंदी महासागरातून वाहणाऱ्या वाऱ्यांचा वेग हवामान परिस्थिती बदलत आहे.
समुद्रावर निर्माण झालेले चक्रीवादळ ‘होरासिओ’ ताशी २६० किमी वेगाने पोहोचले आहे. हवामानशास्त्रज्ञ या वर्षीचे सर्वात धोकादायक वादळ म्हणत आहेत. जरी त्याचा थेट परिणाम भारतावर होणार नसला तरी, त्याने संपूर्ण भारतीय उपखंडातील हवामान विस्कळीत केले आहे. वादळाच्या पार्श्वभूमीवर, हवामान विभागाने (IMD) आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला. केरळच्या किनारी भागातही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.






