काय घडलं नेमकं?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देवानंद व संबंधित महिलेची काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावरून ओळख झाली होती आणि त्यातून प्रेमसंबंध निर्माण झाले. गेल्या काही दिवसांपासून ही महिला देवानंद पासून दूर राहत असल्याने त्यांच्यात वाद निर्माण झाला होता. यामुळे देवानंदने शनिवारी तिच्यावर गावठी कट्ट्याने गोळी झाडली व त्यानंतर स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज चोपडा पोलिसांनी व्यक्त केला आहे. याबाबत मयत प्रियकरावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सातारा शहर पोलिसांची धडक कामगिरी; 12 तासाच्या आत दरोडा घालणाऱ्या पाच जणांना शिरपूरमधून अटक
घटना कशी उघडकीस आली ?
१२ वर्षांपूर्वी महिलेचा विवाह चोपडा तालुक्यातील एका गावातील तरूणाशी झाला होता. तिला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. मुलगी सकाळी साडेदहाच्या सुमारास शाळेतून घरी आली तेव्हा रक्ताच्या थारोळ्यात आईचा मृतदेह पाहून तिने आरडा ओरडा केला. त्यांनतर शेजारी घटनास्थळी धावून आले व पोलिसांना माहिती देण्यात आली.
तपास सुरु
घटनास्थळावरून तसे पुरावे मिळाले आहेत. दोघांच्या मोबाइल आणि सोशल मीडिया चॅटवरून इतर तपास करण्याचे काम सुरू आहे अशी माहिती चोपडा शहर पोलिस निरीक्षक, मधुकर साळवे, यांनी दिली आहे.
कॉलेजमध्ये अपमान सहन न झाल्याने टोकाचं पाऊल; विद्यार्थ्याची गळफास घेऊन जीवनयात्रा संपली
जळगाव शहरातून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. कॉलेजच्या प्राचार्यांनी मित्रांसमोर मारहाण केल्यामुळे विद्यार्थ्याने नैराश्यातून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थ्यांचे नाव श्याम प्रभाकर पाटील (२० वर्ष) असे आहे. त्याने आत्महत्या करण्यापूर्वी चिठ्ठी लिहून ठेवली होती. त्यात त्याने प्राचार्यच नाव लिहून ठेवलं. या प्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात संबंधित प्राचार्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Ans: जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील अक्कलखेडा गावात.
Ans: शिरपूर तालुक्यातील देवा धनगर नावाचा तरुण.
Ans: प्राथमिक माहितीनुसार प्रेमसंबंधातून हा प्रकार घडल्याची शक्यता आहे; तपास सुरू आहे.






