सातारा पोलिसांनी 12 तासांमध्ये २१५ ग्रॅम सोने लुटणाऱ्या दरोडेखाऱ्यांना अटक केली (फोटो - सोशल मीडिया)
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, श्री नितीन खेमचंद जैन (वय ५०, रा. अमृतप्लाझा कॉलनी, सदरबझार, सातारा) यांनी तक्रार दिली आहे. ते १८५, रविवार पेठ, सातारा येथील ‘श्रद्धा ज्वेलर्स’मध्ये मागील २५ वर्षांपासून व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहेत. मुंबईतील झवेरी बाजार येथे असलेल्या रितेश कावेडिया ज्वेलर्सकडे वितळवलेले सोन्याचे बार पाठविण्याचे तसेच तयार दागिने मागविण्याचे काम ते नियमितपणे करतात.
दि. २७ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ७.१५ वाजता जैन यांनी न्यू लक्ष्मी एअर पार्सल कुरिअर, सातारा येथील कर्मचारी कोमलसिंग परिहार यांना मुंबईसाठी कुरिअर पाठवायचे असल्याची माहिती दिली. त्यानुसार रात्री ८ वाजण्याच्या सुमारास परिहार हे श्रद्धा ज्वेलर्स येथे आले. त्यावेळी ५० ग्रॅम वजनाचा सोन्याचा बार पार्सल करून त्यांच्या ताब्यात देण्यात आला.
हे देखील वाचा : मावळमध्ये घर खरेदी करणाऱ्यांची मोठी फसवणूक; बँकेकडे गहाण ठेवलेल्या सदनिका विक्री, बिल्डर्सवर गुन्हा दाखल
मात्र, दि. २८ फेब्रुवारी रोजी सकाळी सुमारे ७ वाजता जैन यांनी परिहार यांच्याशी संपर्क साधला असता, रात्री चार अनोळखी व्यक्तींनी मारहाण करून सोन्याचे कुरिअर असलेली बॅग जबरीने लुटल्याची माहिती त्यांनी दिली. त्यानंतर जैन यांनी तात्काळ सातारा शहर पोलीस ठाण्यात धाव घेतली.
दरम्यान, या घटनेत इतर ज्वेलर्सचाही मुद्देमाल लुटल्याचे समोर आले आहे. संतोषी ऑर्नामेंट्स, ५०१ पाटी, सातारा येथील शशिकांत जाधव यांचे ८५ ग्रॅम वजनाच्या तीन सोन्याच्या गोळ्या (अंदाजे किंमत ११,५३,००० रुपये) तसेच त्रिमूर्ती गोल्ड शॉपचे मालक उत्तम साळुंखे यांचे ८० ग्रॅम वजनाचा सोन्याचा बार (अंदाजे किंमत १२,६४,००० रुपये) चोरीस गेला आहे. तसेच जैन यांचा ५० ग्रॅम वजनाचा सोन्याचा बार (अंदाजे किंमत ७,८७,५०० रुपये) लुटण्यात आला आहे. एकूण २१५ ग्रॅम वजनाचे ३२,०४,५०० रुपयांचे सोने चोरीस गेले आहे.
हे देखील वाचा : Iran Israel वादाचे भारतात पडसाद; खामेनेईच्या मृत्यूनंतर शेकडो शिया मुस्लीम रस्त्यावर, श्रीनगरमध्ये जोरदार निदर्शने
ही घटना दि. २८ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री १२.१५ वाजण्याच्या सुमारास पोवई नाका येथील ‘राजधानी सातारा’ सेल्फी पॉईंट येथे घडली आहे. चार अनोळखी इसम पांढऱ्या रंगाच्या कारमधून आले. त्यांनी कोमलसिंग परिहार (वय ३६, रा. सातारा) यांना अडवून मारहाण केली आणि त्यांच्या ताब्यातील सोन्याचा मुद्देमाल जबरीने पळवून नेला. या प्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात चार अनोळखी इसमांविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. शहरात घडलेल्या या धाडसी दरोड्यामुळे व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.






