नेमकं काय प्रकरण?
घडलेली घटना बंगळुरू येथील आहे. आरोपी बापाचे नाव तीम्मरायप्पाला (४८) असे आहे. तर मृत मुलीचे नाव मेघना असे आहे. आरोपी वडील हा शेतकरी आहे. मेघनाचे एका मुलावर प्रचंड प्रेम होते. त्याची कबुली देखील आई-वडिलांना दिली होती. मेघनाचा प्रियकर हा तिच्या आईच्या माहेरच्या नात्यातला होता. मेघ मला त्याच्यासोबतच लग्न करायचे होते यामुळे आरोपी वडील हा संतापला.
16 एप्रिल रोजी आरोपीने मेघनाला त्याच्या शेतावर कामासाठी बोलावले. तिथे त्याने आपल्या मुलीचा गळा दाबून तिची हत्या केली. पट्ट्या केल्यानंतर तिला विहिरीत फेकून दिले आणि कोणाला संशय येऊ नये म्हणून पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार त्याने दाखल केली. त्यानंतर मध्यरात्री अंधाराचा फायदा घेत आरोपीने मुलीचा मृतदेह जमिनीत गाडला. काही दिवसांनी त्याने आपल्या घरातून देखील पड काढला. बरेच दिवस तो परत आला नाही म्हणून त्याच्या पत्नीने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी त्याचा देखील तपास करायला सुरुवात केली. या तपासा दरम्यान पोलिसांनी 15 मे रोजी आरोपीला एका गावातून ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याची चौकशी केली असता त्याने केलेल्या गुन्ह्याची त्याने कबुली दिली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीवर गंभीर गुन्हा दाखल केला असून तपास करत आहेत. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
तरुणीने थोबाडीत मारल्यामुळे तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; गळफास लावून संपवले जिवन
Ans: ही घटना कर्नाटकातील बंगळुरू येथे घडली.
Ans: मुलीचे प्रेमसंबंध आणि तिची लग्नाची इच्छा यामुळे आरोपी संतापला होता.
Ans: पत्नीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तपास करत आरोपीला एका गावातून ताब्यात घेतले.






