काय घडलं नेमकं?
या प्रकरणातील आरोपीचे नाव उमेश कश्यप असे आहे. उन्हाळ्याचे दिवस असल्याने पीडित कुटुंब घराच्या आत न झोपता बाहेर वारंड्यात मच्छरदाणी लावून झोपले होते. त्यावेळी उमेश कश्यक हा छताच्या रस्त्याने अत्यंत गुप्तपणे घराच्या आत घुसला. सर्व कुटुंब गाड झोपत असल्याची खात्री करून घेत त्याने अचानक मच्छरदाणीच्या वरूनच संपूर्ण कुटुंबावर ऍसिड फेकले.
NEET पेपरफुटी प्रकरणात मोठी अपडेट, अखेर शिवराज मोटेगावकरला सीबीआयकडून अटक
ऍसिड अंगावर पडतात कुटुंब असाह्य वेदनेने किंचाळले. या हल्ल्यात विवाहित महिला तिचा पती आणि दोन लहान मुले गंभीररित्या होरपळली. तातडीने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर स्थानिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार सुरू करण्यात आले आहे. तर एकाची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याने त्याला पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलवावे लागले आहे. या घटनेने प्रचंड परिसरात खळबळ उडाली.
या घटनेची माहिती पोलिसांना मिळतात पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. आरोपी उमेश कश्यप याला पीडित महिलेची लग्न करण्याची इच्छा होती. त्याने यापूर्वी तिला लग्नाचा प्रस्ताव दिला होता, मात्र महिलेने त्याचा हा प्रस्ताव स्पष्टपणे नाकारला. विशेष म्हणजे आरोपी उमेश हा आधीपासूनच विवाहित आहे तरीही तो पीडित महिलेवर लग्न करण्यासाठी दबाव टाकत होता. आरोपी गेल्या अनेक दिवसापासून त्या महिलेला सतत त्रास देत होता आणि तिच्यावर वेगवेगळ्या प्रकारे दबाव निर्माण करत होता मात्र जेव्हा महिलेने कोणत्याही परिस्थितीत त्याचे ऐकण्यास नकार दिले तेव्हा त्यांनी राग मनात धरून हे टोकाचे निर्णय उचलले. असे स्थानिकांनी माहिती दिली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
तरुणीने थोबाडीत मारल्यामुळे तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; गळफास लावून संपवले जिवन
Ans: ही घटना उत्तर प्रदेशातील बरेली जिल्ह्यातील शेरगड परिसरात घडली.
Ans: महिलेने विवाहाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून आरोपीने सूडाने हल्ला केला.
Ans: या हल्ल्यात महिला, तिचा पती आणि दोन लहान मुले असे चार जण गंभीर जखमी झाले.






