मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यापूर्वी नवी मुंबईत ‘अदृश्य आदेश’? बार, हॉटेल, क्लब बंद ठेवण्याच्या तोंडी आदेशाची चर्चा
सामान्यतः व्हीआयपी किंवा मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेसाठी पोलीस प्रशासनाकडून अधिकृत लेखी नोटीस जारी केली जाते. मात्र, या प्रकरणात कोणतेही लेखी आदेश न देता केवळ वरिष्ठ पातळीवरून ‘ तोंडी सूचना’ देऊन रात्रीच्या आस्थापना बंद पाडल्या जात असल्याचे बार मालकांचे म्हणणे आहे. त्यामुळे “हा अदृश्य आदेश नेमका कोणाचा आणि कोणत्या कायद्याखाली?” असा सवाल उपस्थित केला जात आहे.
चाकूने भोसकून सराईत गुंडाची हत्या; प्रेयसीला दुसऱ्या तरुणासोबत पाहून झाला वाद अन्…
दरम्यान, तरुण पिढीला ड्रग्ज आणि इतर व्यसनांपासून दूर ठेवण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘कॅम्पस कनेक्ट’ ही विशेष मोहीम राबवली जात आहे. पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे हे या मोहिमेसाठी अतिशय मेहनत घेत असून संपूर्ण नवी मुंबईत मोठ्या प्रमाणावर जनजागृती करत आहेत. युवापिढीचे भविष्य सुरक्षित करणाऱ्या पोलीस प्रशासनाच्या या कौतुकास्पद आणि चांगल्या उपक्रमाला नवी मुंबईकरांनीही तितकीच मनापासून साथ देणे अत्यंत गरजेचे आहे, असा सूर सुजाण नागरिकांमधून उमटत आहे.
दुसऱ्या बाजूला, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यवसायिकांवरही या निमित्ताने बोट ठेवले जात आहे. शासनाने ठरवून दिलेल्या वेळेत आस्थापना बंद केल्या तर कोणालाही अडचण असणार नाही. परंतु, अनेक बार व क्लब चालक सुरक्षेच्या नियमांचा गैरफायदा घेत रात्री उशिरापर्यंत किंवा पहाटेपर्यंत अनधिकृतपणे व्यवसाय सुरू ठेवतात. यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो आणि प्रशासनाला अशा कठोर पावलांचा अवलंब करावा लागतो, अशीही चर्चा रंगली आहे. या संपूर्ण प्रकरणावर पोलीस प्रशासन किंवा स्थानिक आयुक्त कार्यालयाकडून अद्याप कोणतीही अधिकृत स्पष्टता दिलेली नाही. त्यामुळे हा निर्णय केवळ सुरक्षेचा भाग आहे की राजकीय दबावापोटी घेतलेला निर्णय, यावर नवी मुंबईच्या वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू आहेत.
कान्हे येथे 105 ग्रॅम गांजा जप्त, 55 वर्षीय व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल; वडगाव मावळ पोलिसांची कारवाई






