Raigad News: ८ महिन्यांच्या लढ्यानंतर अखेर न्याय मिळालाच! शाळकरी मुलाच्या मृत्यू प्रकरणी २ वैद्यकीय अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल
म्हसळा न्यू इंग्लिश स्कूलमध्ये इयत्ता ८ वी मध्ये शिक्षण घेणाऱ्या गर्वांग याला दिनांक ४ एप्रिल २०२५ रोजी ताप आल्याने त्याचे वडील दिनेश गायकर व चुलते सुरेश गायकर यांनी प्रथम ग्रामिण रुग्णालय म्हसळा येथे उपचारासाठी दाखल केले. त्यानंतर पुन्हा ताप वाढल्याने त्याला ग्रामिण रुग्णालय म्हसळा येथून उपजिल्हा रुग्णालय माणगाव येथे पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले. माणगाव उपजिल्हा रुग्णालयात संबंधित डॉक्टरांनी योग्य उपचार केले नाहीत, ना रुग्णालयात दाखल करून घेतले. ६ एप्रिल २०२५ रोजी सकाळी पुन्हा ग्रामिण रुग्णालय म्हसळा येथे दाखल केले असता सकाळी ८.५४ वाजता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. (फोटो सौजन्य – Pinterest)
या प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सविता गर्जे यांच्या मार्गदर्शनाखाली स.पोलीस निरीक्षक रविंद्र पारखे व पोलीस उपनिरीक्षक एस.पी. रोहिणकर करीत आहेत. तब्बल आठ महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर दोषींवर कारवाई सुरू झाल्याने गाँगच्या कुटुंबीयांना आणि ग्रामस्थांना दिलासा मिळाला असून आरोग्य यंत्रणेच्या हलगर्जीपणावर कठोर कारवाईची मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे.
तपासादरम्यान जिल्हा रुग्णालय अलिबाग येथील तज्ञ समितीच्या अहवालात डॉ. अभिषेक रापते व डॉ. नितिश सावंत यांनी उपचारात गंभीर निष्काळजीपणा केल्याचे अखेर उघडकीस आले आहे. मयत मुलाचे वडील दिनेश गायकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार म्हसळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असल्याचे पोलिस निरीक्षक रवींद्र पारखे यांनी सांगितले.
माणगाव उपजिल्हा रुग्णालयात संबंधित डॉक्टरांनी योग्य उपचार केले नाहीत, ना रुग्णालयात दाखल करून घेतले. उपचाराअभावी कुटुंबीयांनी गवांग यास परत घुम येथे घेवून जाण्याची वेळ आली. मात्र ताप न उतरल्याने दिनांक ६ एप्रिल २०२५ रोजी सकाळी पुन्हा ग्रामिण रुग्णालय म्हसळा येथे दाखल केले असता सकाळी ८.५४ वाजता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेनंतर म्हसळा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. या प्रकरणाचा सखोल तपास पोलीस उपनिरीक्षक एस.पी. रोहिणकर यांनी, स.पो.नि. रविंद्र पारखे यांच्या मार्गदर्शनाखाली केला.






