काय घडलं नेमकं?
सोमवारी मध्यरात्री शेकुंबर नदाफ यांचा श्रीकृष्ण देशमुख व मल्लीनाथ माशाळे यांच्याशी चेष्टा-मस्करीतून मोबाईल देण्या-घेण्याच्या कारणावरून वाद झाला. मल्लीनाथ माशाळे याने शेकुंबरला हाताने चापटा मारल्या, तर श्रीकृष्ण देशमुख याने शिवीगाळ करत रागाच्या भरात मोठा दगड उचलून थेट शेकुंबरच्या डोक्यात मारला. हा वाद कधी हिंसक वळणावर गेला हे कळलंच नाही. डोक्याला दगड मारल्याने शेकुम्बर जागीच बेशुद्ध पडला. काही वेळातच त्याचा मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस ठाण्याचे अधिकारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. प्राथमिक तपासात पोलिसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले आहे. मृतकाच्या पत्नी सायरा मेहबुब शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून श्रीकृष्ण देशमुख व मल्लीनाथ माशाळे (रा. समाधान नगर, अक्कलकोट रोड, सोलापूर) यांच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिक तपास करत आहे.
प्रेयसीच्या घरच्यांनी लग्नाला दिला नकार; 28 वर्षीय तरुणाने उचललं टोकाचं पाऊल
सोलापूर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका २८ वर्षीय तरुणाने गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्याने जुना पुणे नाका परिसरातील भाग्यलक्ष्मी लॉजमध्ये आत्महत्या केली. आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव हरीश भास्कर बंडी असे आहे. हरीशच्या कुटुंबियांनी त्याच्या प्रेयसीच्या घरच्यांवर आरोप केले आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
आईने केले प्रेयसीच्या कुटुंबियांवर आरोप
हरिषच्या आईला मृत्यूची माहिती मिळताच त्यांनी मोठा हंबरडा फोडला. माध्यमांशी बोलतांना त्यांनी आरोप केला की, “माझा मुलगा फक्त त्या मुलीला भेटण्यासाठी तडफडत होता, पण तिच्या पालकांनी त्याला भेटू दिले नाही.” मुलीच्या आई-वडिलांच्या आडमुठेपणामुळेच हरिषने आत्महत्या केल्याचा दावा त्याच्या पालकांनी केला असून या मृत्यूला त्यांनाच जबाबदार धरले आहे.
Ans: शेकुंबर महिबूब नदाफ (वय 39).
Ans: मोबाईलच्या किरकोळ वादातून भांडण वाढल्याने.
Ans: दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन खुनाचा गुन्हा दाखल केला.






