आम्ही भाई आहोत, या भागात राहायचे असेल तर…; गुलटेकडीत अल्पवयीन मुलांकडून गोळीबार
काय घडलं नेमकं
या प्रकरणातील मृत्यू झालेल्या महिलेचे नाव उमाकांती असे आहे. तिचा विवाह नोव्हेंबर २०२५ मध्ये झाला. तर आरोपीचं नाव अजय (२२) असे आहे. मंगळवारी उमाकांती हिच्या वडिलांनी अजयला ई-रिक्षा देऊन उमाकांतीला तिच्या सासरहून आणण्यासाठी पाठवले होते. मात्र तो बुधवारी रात्री सव्वा दहाच्या सुमारास एकाच घरी परतला आणि रडत सांगितले की, ‘काही अज्ञात तरुणांनी मला अमली पदार्थ देऊन उमाकांतीचे अपहरण केले आहे.’
तिच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात तात्काळ धाव घेत अपहरणाची तक्रार नोंदवली. या तक्रारीनंतर पोलिसांनी तात्काळ तपासाला सुरुवात केली. पोलिस अधीक्षक जे.पी. सिंह यांनी तपासाचे चक्रे फिरवली असता अजयने सांगितलेल्या घटनास्थळावर अपहरणाचे कोणतेही पुरावे आढळले नाहीत. अजय आणि उमाकांती यांच्या मोबाईलचे लोकेशन ट्रेस केल्यावर त्याचे लोकेशन त्याने सांगितलेल्या रस्त्याऐवजी दुसऱ्याच मार्गावर आढळून आले. यामुळे पोलिसांना आजवर संशय बळावला. पोलिसांनी रात्री दीड वाजता अजयची कडक चौकशी केली. त्या पोलीस खाक्या दाखवताच त्याने बहिणीची हत्या केल्याचे कबूल केले.
हत्ये मागचं कारण काय?
‘बहीण घरातील किरकोळ गोष्टींवरून वाद घालायची आणि वडील तिचेच ऐकायचे. तिच्याच सांगण्यावरून वडिलांनी मला आठवड्यापूर्वी घराबाहेर काढले होते,’ असं कारण अजयने सांगितलं.
कशी केली हत्या?
जेव्हा अजय उमाकांती हिला घेऊन माहेरी परतत होता तेव्हा वाटेत पुन्हा त्याच्यात वाद झाला होता. आणि याच वादाने संतापून अजयने उमाकांतीच्याच शॉलने तिचा गळा आवळून खून केला. त्यानंतर तिचा मृतदेह जंगलातील झुडपांमध्ये फेकून दिला. पोलिसांनी उमाकांतीचा मृतदेह,शॉल आणि ई-रिक्षा जप्त केली आहे. पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये गुदमरून मृत्यू झाल्याचे समोर आले. या प्रकरणाचा वेगाने छडा लावणाऱ्या पोलीस पथकाला पोलीस अधीक्षकांनी 10 हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.
कंपनीच्या मालकाचा फोटो व्हॉट्सअॅपला डीपी ठेवून फसवणूक; पुणे पोलिसांकडून आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश
Ans: तिचाच सख्खा भाऊ अजय (२२).
Ans: मोबाईल लोकेशन आणि कडक चौकशीतून सत्य समोर आले.
Ans: घरगुती वादातून रागाच्या भरात हत्या केल्याचे आरोपीचे म्हणणे.






