काय नेमकं प्रकरण?
पीडित महिलेने दिलेल्या माहितीनुसार, २२ जून २०२३ रोजी तिचे लखनौ येथील निशांत कुमारसोबत लग्न झाले होते. लग्नात मुलीच्या आई वडिलांनी सासरच्यांना दागिने, ८ लाख रुपये रोख आणि महिंद्रा थार गाडी दिली होती. मात्र, लग्न झाल्यानंतर संबंधित महिला जेव्हा सासरी गेली तेव्हा परिस्थिती अत्यंत भयावह होती.लग्नानंतर, तिचा पती तिच्यापासून अंतर ठेवायचा आणि अनेकदा तिची सासू त्या दोघांच्या मध्ये झोपायची. एवढेच नाही तर, तिचे सासरे परवानगीशिवाय तिच्या खोलीत येऊन तिचे फोटो काढायचे. यासंदर्भात पतिला माहिती दिली असता तोही दुर्लक्ष करायचा. दरम्यान, पतीचे दुसऱ्या एका महिलेशी अफेअर असल्याचेही तिला नंतर समजले असे गंभीर आरोप केले आहे.
…अथवा स्वतःची किडनी दे
एप्रिल २०२४ मध्ये पीडितेच्या हाती पतीची एक जुनी मेडिकल फाईल पडली, त्यातून धक्कादायक माहिती समोर आली नशेच्या वसनामुळे पतीच्या दोन्ही किडनी २०२२ मध्येच निकामी झाल्या होत्या. त्याचे डायलिसिस सुरू होते. हे समजल्यानंतर, तिच्या पायाखालची जमीन सरकली. तिने सासरच्यांना यासंदर्भात जाब विचारला, तर सासरच्यांनी तिला ३० लाख रुपये आण अथवा स्वतःची किडनी दे, असे उत्तर दिले.
गुन्हा दाखल
अखेर या सततच्या छळाला कंटाळून ११ ऑक्टोबर २०२४ रोजी पीडितेने संसार सोडले. ती सध्या कानपूरमध्ये राहते. तिने चकेरी पोलीस ठाण्यात पती आणि सासरच्यांविरुद्ध फसवणूक, हुंडा आणि छळाचा गुन्हा दाखल केला असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
Nagpur News: नागपूर RSS मुख्यालयाजवळ जिलेटिनच्या कांड्या आणि डेटोनेटर सापडले; शहरात हाय अलर्ट






