फोटो सौजन्य - Social Media
नक्की काय आहे प्रिया बापटची पोस्ट?
प्रिया बापट म्हणते की “मी रागावली आहे. मी नाराज आहे. कदाचित मला प्रत्येक तपशील माहीत नसेल किंवा प्रत्येक प्रश्नाचं उत्तरही माहीत नसेल. पण मला एवढं नक्की माहीत आहे की ‘आपण एका लोकशाही असलेल्या देशात राहतो. येथे प्रत्येक नागरिकाला प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे. सरकार हे आपल्या नागरिकांसमोर उत्तरदायी असते. नागरिकांनी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला म्हणून त्यांचा आवाज दाबला जाऊ शकत नाही आणि दाबला जाऊ नये. किमान त्यांचं म्हणणं ऐकून घेणं आणि संवादाची सुरुवात करणं, एवढी तरी अपेक्षा आपण ठेवू शकतो. पण सध्या जे घडत आहे, ते निश्चितच तसं नाही घडत आहे.”
प्रियाने रिपोस्ट केला आणखीन महत्वाचा मुद्दा!
प्रिया बापटने @rishabshah2012 या सोशल मीडिया हॅन्डलने केलेली पोस्ट तिच्या सोशल मीडिया हँडलवर रिपोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये नमूद आहे की, “भाजपचा समर्थक असतानाही शिक्षणाच्या प्रश्नावर सरकारला जाब विचारणं योग्य आहे. काँग्रेसचा समर्थक असतानाही जर लोकसभेचे कामकाज ठप्प होत असेल तर त्यावर प्रश्न करणे अयोग्य नाही. सोनम वांगचुक यांच्या मतांशी सहमत नसाल तरी त्यांच्या धैर्याचे आणि चिकाटीचे कौतुक केले तर यात काय वाईट? तसेच जरी तुम्ही CJP समर्थक नसाल तरीदेखील तुम्ही त्यांच्या मुद्द्यांशी आणि उद्दिष्टांशी सहमत असू शकता आणि याला दुतोंडी भूमिका नाही म्हणत. एकंदरीत, यालाच खरी लोकशाही म्हणतात.”
फक्त प्रिया बापट नव्हे तर इतर अनेक मराठी कलावंतांनी त्यांचे मत मांडले आहे. अभिनेत्री रसिका सुनील तसेच जितेंद्र जोशी आणि इतर कलावंतांनीही त्यांचे मत नोंदवले आहे.






