काय घडलं नेमकं?
वलगाव येथे मध्यरात्री २ तरुणांची हत्या करण्यात आली होती. ऋतिक पंडित (वय २५ वर्षे) आणि संजोग जोशी (वय २४ वर्षे) अशी हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. कबूतर चोरल्याच्या वादातून ही हत्या करण्यात आली. मध्यरात्रीच्या सुमारास ऋतिक पंडित आणि संजोग जोशी हे दोघे वलगाव बसस्टँड परिसरात असताना आरोपींनी त्यांच्यावर अचानक जीवघेणा हल्ला केला. धारदार शस्त्राने वार करत त्यांना जागीच संपवण्यात आले होते. हा हल्ला इतका भयानक होता की संजोग आणि ऋतिक या गंभीर जखमी झालेल्या दोघांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने खळबळ उडाली आहे.
Nashik Crime: पतीने पत्नी आणि मुलाची केली निर्घृण हत्या; विष पिऊन आत्महत्येचाही प्रयत्न; कारण काय?
अत्यंत किरकोळ आणि जुन्या वादातून ही हत्याकांडाची घटना घडली होती. या प्रकरणी सरपंचासुधीर उगले यांचा सहभाग आढळून आल्यामुळे त्यांना देखील अटक करण्यात आली आहे. या हत्येचा सखोल तपास वलगाव पोलीस करत आहे. या सर्व आरोपींना आज अमरावती जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. पोलीस पुढील कारवाई करत आहे.
अमरावतीत ट्रक चालकाला ट्रकसह जिवंत जाळलं; पैशाच्या वादातून हत्या, पंजाबचा आरोपी जळगावातून अटकेत
अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यात घडलेल्या एका थरारक हत्याकांडाने संपूर्ण राज्य हादरले आहे. सुरुवातीला अपघात वाटणाऱ्या या प्रकरणामागे खुनाचा कट असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. पैशाच्या वादातून ट्रक चालकाचा गळा दाबून खून केल्यानंतर पुरावे नष्ट करण्यासाठी आरोपीने ट्रकसह चालकाला जिवंत जाळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपीला पंजाबला पळून जाण्याच्या तयारीत असताना जळगाव जिल्ह्यातील रावेर येथून पोलिसांनी अटक केली असून, या निर्घृण हत्येमागील संपूर्ण कटाचा तपास सुरू आहे.
Accident News : रांजणगावात रॅम्पमध्ये चिरडून टेम्पो चालकाचा मृत्यू; टेम्पोचा पडदा बांधताना…
Ans: सात आरोपींना.
Ans: ऋतिक पंडित आणि संजोग जोशी.
Ans: कबूतर चोरीच्या जुन्या वादातून.






