अरविंद केजरीवाल निर्दोष मुक्ततेनंतर कथित दारु घोटाळा प्रकरण भाजपचे षडयंत्र असल्याचा आरोप केला (फोटो - सोशल मीडिया)
दिल्लीतील एका विशेष न्यायालयाने शुक्रवारी अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया आणि इतर सर्व आरोपींना कथित दारू धोरण घोटाळ्यातील दोषमुक्त केले. तसेच आरोपींविरुद्ध सीबीआयच्या आरोपपत्राची दखल घेण्यास न्यायालयाने नकार दिला. अरविंद केजरीवाल यांची निर्दोष मुक्तता झाल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांचा अश्रूंचा बांध फुटला. केजरीवाल म्हणाले की, “हा खटला पूर्णपणे बनावट आहे. हे एक षडयंत्र आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी आम आदमी पक्षाला नष्ट करण्यासाठी स्वतंत्र भारतातील सर्वात मोठा राजकीय षड्यंत्र रचण्याचा एकत्रित कट रचला आहे,” असा आरोप केजरीवाल यांनी केला.
हे देखील वाचा : मी आजारी नव्हतो तर…! राजीनाम्याबाबत माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचे मोठे वक्तव्य
पुढे ते म्हणाले की, “आम आदमी पक्षाच्या पाच प्रमुख नेत्यांना तुरुंगात टाकण्यात आले. एका विद्यमान मुख्यमंत्र्यांनाही त्यांच्या घरातून अटक करून तुरुंगात पाठवण्यात आले, जे भारतीय इतिहासात कधीही घडले नाही. हे अमित शहा यांनी रचलेले सर्वात मोठे राजकीय षड्यंत्र आहे. पक्षातील अनेक नेत्यांना तुरुंगात टाकण्यात आले आहे, जे लोकशाहीसाठी चिंतेचा विषय आहे. सहा महिने तुरुंगवास भोगावा लागला आणि माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी जवळजवळ दोन वर्षे तुरुंगात घालवली. प्रतिमा मलिन करण्यासाठी चिखलफेक करण्यात आली. टीव्ही चॅनेलवर त्यांना सतत भ्रष्ट म्हणून दाखवण्यात आले,” असा आरोप केजरीवाल यांनी सत्ताधारी भाजपवर केला आहे.
हे देखील वाचा : रोहित पवारांची ही स्टंटबाजी…! राष्ट्रवादीच्याच आमदाराने साधला जोरदार निशाणा
पुढे ते म्हणाले की, “२०२२-२३ च्या दिल्ली उत्पादन शुल्क धोरणापासून संपूर्ण प्रकरण सुरू झाले, ज्यामध्ये सीबीआय आणि ईडीने मनी लाँड्रिंग आणि फसवणुकीचे आरोप दाखल केले. या प्रकरणात अनेक नेत्यांना तुरुंगात टाकण्यात आले. न्यायालयाने स्पष्टपणे म्हटले की संवैधानिक अधिकाऱ्यांवर आरोप करण्यासाठी ठोस पुरावे आवश्यक आहेत; केवळ दाव्यांवर खटला उभारता येत नाही,” असा टोला देखील आप नेते अरविंद केजरीवाल यांनी लगावला आहे.






