नांदेड वाघाळा महापालिकेच्या पहिल्या सर्वसाधारण सभेची तयारी सुरू आहे (फोटो - सोशल मीडिया)
Nanded News : नांदेड : नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेची पहिली सर्वसाधारण सभा मार्च पहिल्या महिन्याच्या आठवड्यात होण्याची शक्यता वर्तविली जात असून या सभेत स्थायी समितीसह महिला व बालकल्याण, शिक्षण समिती तसेच स्वीकृत सदस्यांची निवड केली जाणार असल्याचे वृत्त आहे, कोणत्या सदस्याला कोणत्या समितीवर स्थान द्यायचे ? याबाबत भाजपामध्ये खलबत सुरू आहेत. मनपा प्रशासनाने पहिल्या सर्वसाधारण सभेसाठीची आवश्यक ती तयारी देखील सुरू केली आहे. (Nanded News)
शिवाजीनगरच्या सिग्नलची प्रतीक्षा
महानगरपालिकेवर भाजपाने एकहाती सत्ता स्थापन केली असून महापौर, उपमहापौरांची निवड होवून दोन आठवड्याचा कालावधी लोटला आहे, स्थायी समिती सदस्य व अन्य विषय समित्यांची निवड अद्याप झाली नाही, येत्या आठवडाभरात या सर्व सदस्यांची निवडप्रक्रिया पूर्ण होणे अपेक्षित आहे, निवड केल्या जाणाऱ्या सदस्यांच्या नावाची शिफारस करावी, असे पत्र नुकतेच नगरसचिवांनी सर्व पक्षाच्या गटनेत्यांना पाठविले आहे.
‘शिवाजीनगर कडून सिग्नल मिळाल्यानंतर भाजपाच्या सदस्यांची नावे नगरसचिव विभागाकडे गटनेत्यांकडून पाठविली जातील, असे सांगण्यात आले आहे. या अनुषंगाने भाजपकडून चाचपणी सुरू झाली आहे.
हे देखील वाचा : रोहित पवारांची ही स्टंटबाजी…! राष्ट्रवादीच्याच आमदाराने साधला जोरदार निशाणा
मार्चच्या पहिल्या आठवड्यात सभा?
काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी, एमआयएम, राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाकडून अजून याबाबत कोणतीही हालचाल झाली नसल्याचे दिसून आले आहे.
नगरसचिव विभागाने मनपाच्या पहिल्या सर्वसाधारण सभेसाठीची सर्वतोपरी सज्जता केली असून पहिल्या सभेत नेमके कोणते विषय घ्यायचे याबाबत विचारविनीमय केल्या जात असल्याचे वृत्त आहे, येत्या १० मार्च पूर्वी ही सर्वसाधारण सभा पार पडावी, या दृष्टीने नियोजन सुरू आहे.
हे देखील वाचा : रोहित पवारांच्या लढ्याला आले बळ! FIR संबंधित राज ठाकरेंनी सुपुर्द केले दोन दाखले
वसमत तहसीलमध्ये महसूलीचा मातीघोटाळा?
वसमत शहर व तालुक्यात सध्या सुरू असलेल्या विटभट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर महसूल विभागाच्या वसुलीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तालुक्यात सुमारे २०० पेक्षा अधिक विटभट्ट्या कार्यरत असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र या भट्टयांवर वापरल्या जाणाऱ्या ‘सनवट’ मातीची रॉयल्टी प्रत्यक्षात किती जमा होते, याबाबत पारदर्शक माहिती उपलब्ध नसल्याने शंका अधिक गडद होत आहे. दररोज ४०० ते ५०० ब्रास मातीची आवक ? स्थानिक सूत्रांच्या माहितीनुसार, वसमत शहरात दररोज अंदाजे ४०० ते ५०० ब्रास माती येते. एका ब्रास मातीवरील रॉयल्टी धरली, तर दिवसाला साधारण २ ते २.५ लाख रुपयांचा महसूल शासनाच्या तिजोरीत जमा होणे अपेक्षित आहे. त्याप्रमाणे महिन्याला हा आकडा ६० लाख रुपयांपर्यंत जाऊ शकतो. वर्षभराचा विचार केला, तर कोट्यवधींचा महसूल जमा व्हायला हवा. मात्र प्रत्यक्षात इतका महसूल तहसील कार्यालयात जमा होतो का, हा खरा प्रश्न आहे.
रॉयल्टीचा हिशोब कुठे? रॉयल्टीचा हिशोब कुठे? सर्व भट्टयांची नोंद
अधिकृतपणे महसूल विभागाकडे आहे का? दररोज किती ब्रास माती उत्खननास परवानगी दिली जाते? प्रत्यक्षात किती माती वाहतूक होते? रॉयल्टीची रक्कम कोणत्या खात्यात जमा होते? महसूल विभागाकडे याचा लेखाजोखा सार्वजनिक आहे का? या सर्व प्रश्नांची उत्तरे अद्याप धूसरच आहेत. स्थानिक नागरिकांमध्ये अशी चर्चा आहे की, शासनाच्या खात्यात जाणारा महसूल आणि प्रत्यक्ष वसुली यामध्ये तफावत असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांकडून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी होत आहे. सर्व विटभट्टचांची नोंद, उत्खनन परवानग्या, वाहतूक चलन, रॉयल्टी पावत्या आणि महसूल खात्याचे ऑडिट सार्वजनिक करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.






