Galwan Conflicts: लष्कराचे दोन वास्तव... दोन्ही परस्परविरोधी; गलवानचे सत्य?
New Delhi: गलवानमधील चिनी लष्करी घुसखोरी आता ६ वर्षांनंतर भारतीय राजकारणात पुन्हा चर्चेत आली आहे. या घुसखोरीमुळे सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष एकमेकांसमोर आले आहेतच; शिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मविश्वासावरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. याच घुसखोरीमुळे तत्कालीन लष्करप्रमुख एमएम नरवणे (दिल्लीतील लष्कर मुख्यालयात) आणि तत्कालीन लेफ्टनंट जनरल वाय.के. जोशी (तत्कालीन उत्तर कमांडचे प्रमुख म्हणजेच आघाडीवर) यांच्या आत्मचरित्रांमध्येही तीव्र विरोधाभास निर्माण झाला आहे.
२०२० मध्ये कथित चिनी घुसखोरीदरम्यान सीमेवरील दोन्ही वास्तवता वेगळ्या आहेत. यामुळे आता गलवानचे खरे सत्य काय होते? हा प्रश्न निर्माण होतो. नरवणे त्यांच्या ‘फोर स्टार्स ऑफ डेस्टिनी’ या पुस्तकात स्पष्ट करतात की, सरकारने त्यांना कृतीच्या बाबतीत एका चौरस्त्यावर उभे केले आणि त्यांना जे योग्य आहे ते करण्यास सांगितले. किंवा, जोशी यांच्या ‘हू डेअर्स विन्सः अ सोल्जर्स मेमोअर’ या पुस्तकातील वस्तुस्थिती, ज्यामध्ये त्यांनी उल्लेख केला आहे की, सरकारने मोकळीक दिली आणि सैन्याच्या सैनिकांनी चिनी टैंकना मागे हटवले.
२०२० मध्ये लडाखमधील नॉर्दर्न कमांडचे प्रमुख वाय. के. जोशी यांनी त्याच्या हू डेअर्स विन्सः अ सोल्जर्स मेमोअर’ या पुस्तकात परिस्थितीचे वर्णन केले आहे. त्यांनी गलवान व्हॅली संघर्षांदरम्यान भारतीय सैन्याचे नेतृत्व केले आणि त्यांच्या पुस्तकात तपशीलवार लिहिले की, चीनने गलवानवर मोठ्या ताकदीने हल्ला केला.
पुढील काही दिवसांत पैंगोंग त्सोच्या उत्तरेकडील किना-यावर हल्ले वाढले. हॉट संप्रंग्स क्षेत्रातही एलएसीचे उल्लंघन झाले, त्यानंतर भारतीय सैन्याने जबाबदारी स्वीकारली, १५ जून रोजी, गलवानमध्ये हिंसक संघर्ष झाला, नियोजन आणि तयारीनंतर, भारतीय सैन्याने जेट-फॉर-टेंट तोडगा सुरू केला.
अखेर ऑपरेशन स्नो लेपर्ड सुरू झाले, ज्याने एकाच रात्रीत परिस्थिती उलथवून टाकली. आम्ही पीएलएला मांगे ढकलले. ते पराभूत होऊन परतले. पीएलएने भारतीय सैन्याच्या ताकदीला कमी लेखले, चीनच्या कनिष्ठ कमांडरांच्या अतिउत्साहामुळे परिस्थिती आणखी बिकट झाली.
पण भारतीय सैनिक सन्मानाने लढले, त्यांच्या प्रशिक्षणामुळे आणि प्रेरणेमुळे विजय झाला. ऑपरेशन स्नो लेपर्डने इतिहास घडवला. सुमदोरोंग चू किवा नाथू ला येथील मागील कोणत्याही चकमकीपेक्षा ते मोठे होते. गलवानमध्ये आमचे २० सैनिक शहीद झाले. तथापि, पीएलएने ४० हून अधिक सैनिक गमावले.
राहुल गांधीच्या मते, माजी प्रमुख मनोज नरवणे याच्या आम्काशित पुस्तक ‘फोर स्टार्स ऑफ डेस्टिनी’ चा हवाला देत सरकारने गलवान संघर्षांदरम्यान निर्णय घेतला नाही. चिनी टैंक रेचिनला येथे पोहोचले. नरवणे यांनी संरक्षणमंत्र्यांना फोन केला पण त्याना कोणतेही निर्देश मिळाले नाहीत. ३१ ऑगस्ट २०२० रोजी चिनी टैंक पुढे सरकले, लेफ्टनंट जनरल वाय. के. जोशी यांनी नरवणे यांना माहिती दिली. नरवणे यांनी राजनाथ सिंह, अजित डोभाल, विपिन रावत आणि एस. जयशंकर यांना फोन करून विचारले की काय आदेश आहेत? सुरुवातीला त्यांना कोणतेही निर्देश मिळाले नाहीत. नंतर राजनाथ सिंह म्हणाले की, तुम्हाला जे योग्य वाटेल ते करा. राहुल यांच्या मते, लष्करप्रमुखांची परिस्थितीत त्या गरम बटाट्यासारखी झाली जो ते न खाऊ शकत होते, न हातात पकडू शकत होते.






