Iran Israel संघर्षात कांदिवलीच्या 'दीक्षित सोळंकी'चा मृत्यू (Photo Credit- X)
🇮🇷 Iran America 🇺🇸 War/ My deepest condolences to the Solanki family of Ghogla, Diu, for the loss of their son, Dixit. He was a crew member on oil tanker in the Gulf of Oman during the ongoing conflict involving the United States, Iran/Israel. My heart goes out to your family pic.twitter.com/zzybVmnqOp — Ketan Patel (@KPatelINC) March 3, 2026
मिळालेल्या माहितीनुसार, दीक्षित सोलंकी ‘MKD Vyom’ या ऑईल टँकरवर क्रू मेंबर म्हणून कार्यरत होता. मार्शल आयलंडचा ध्वज असलेले हे जहाज ओमानच्या मस्कत किनारपट्टीपासून साधारण ५२ नॉटिकल मैल अंतरावर असताना, स्फोटकांनी भरलेल्या एका मानवरहित ड्रोन बोटीने जहाजाला धडक दिली. हा हल्ला इतका भीषण होता की, जहाजाच्या इंजिन रूममध्ये मोठा स्फोट होऊन आग लागली. ज्यावेळी हा अपघात झाला, त्यावेळी दीक्षित इंजिन रूममध्ये आपली ड्युटी करत होता, या आगीत होरपळून त्याचा जागीच मृत्यू झाला.
Middle East War : १०० वेळा फोन केला, पण…; दुबईत अडकलेल्या भारतीय पर्यटकाचे हाल; काय आहे सत्य स्थिती?
दीक्षित सोलंकी हा मूळचा दीव (गुजरात) येथील रहिवासी होता, मात्र गेल्या काही वर्षांपासून तो कांदिवलीत स्थायिक झाला होता. त्याचे वडील अमृतलाल सोलंकी हे दीवमध्ये मच्छीमारीचा व्यवसाय करतात. दीक्षित हा कुटुंबातील सर्वात धाकटा मुलगा होता. धक्कादायक बाब म्हणजे, केवळ महिनाभरापूर्वीच दीक्षितच्या आईचे निधन झाले होते. आईच्या अंत्यविधीसाठी तो गावी आला होता आणि त्यानंतर पुन्हा कर्तव्यावर रुजू झाला होता. मात्र, महिना उलटत नाही तोच दीक्षितच्या मृत्यूच्या बातमीने सोलंकी कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे.
दुसरीकडे, अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्षामुळे हवाई वाहतुकीवर परिणाम झाल्याने दुबईत (UAE) शेकडो भारतीय पर्यटक अडकून पडले होते. या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र सरकारने तत्परता दाखवत दुबईत अडकलेल्या राज्यातील १६४ पर्यटकांना सुरक्षित मायदेशी आणले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली या पर्यटकांच्या प्रवासासाठी विशेष विमानांची व्यवस्था करण्यात आली होती. युएईमधील फुजैरा विमानतळावरून दोन विशेष विमानांद्वारे हे पर्यटक मुंबईत दाखल झाले. ७६ पर्यटक मंगळवारी रात्री मुंबईत पोहोचले. ८८ पर्यटकांना घेऊन दुसरे विमान रात्री उशिरा मुंबई विमानतळावर उतरले. यामध्ये पुण्यातील ‘इंदिरा स्कूल ऑफ बिजनेस स्टडीज’च्या ८४ एमबीए विद्यार्थ्यांचा आणि कर्मचारी वर्गाचा समावेश आहे. या सर्व पर्यटकांनी मायदेशी परतल्यानंतर सुटकेचा निश्वास टाकला आहे.






