Loksabha Election 2026: 'ट्रेड डील' बळीराजाशी विश्वासघात; काँग्रेसचा गंभीर आरोप; शेती-वाडी अमेरिकेकडे गहाण
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी या करारावर आणि देशाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले, सभागृहात बोलू न दिल्याने झालेल्या गदारोळानंतर बाहेर येत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली. मोदी घाबरलेले असून त्यांच्यावर दबाव आहे. हा करार म्हणजे एक ‘साईड शो’ आहे. मोदींनी देशाची शेती आणि शेतकरी अमेरिकेकडे गहाण ठेवले आहेत, असे राहुल म्हणाले.
मणिपूरमधील राष्ट्रपती राजवट अखेर हटवली; वाय. खेमचंद सिंह असणार राज्याचे नवे मुख्यमंत्री
अमेरिकेत अदाणींवर जो खटला आहे, तो प्रत्यक्षात मोदींवरच आहे. अमेरिकेने ‘एपस्टीन फाइल्स’मधील बरेच काही अजून उघड केलेले नाही. त्यामुळे मोदी दबावात आहेत. म्हणूनच या कराराची माहिती देशाला ट्रम्प यांच्याकडून मिळत आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’च्या वेळी अचानक झालेल्या सीजफायरची माहिती ट्रम्प यांनी दिली होती. त्यावेळी शहीद जवानांशी विश्वासघात झाला आणि आता शेतकऱ्यांशी होत आहे, असा आरोप राहुल यांनी लावला.
काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी भारत-अमेरिका व्यापार कराराबाबत सरकारकडे स्पष्टीकरणाची मागणी केली. ते म्हणाले, या करारामध्ये नेमके काय आहे, हे आम्हाला जाणून घ्यायचे आहे. विरोधी पक्ष केवळ स्पष्टता मागत आहे. आम्हाला अटी माहित नाहीत. आमच्याकडे फक्त डोनाल्ड ट्रम्प आणि नरेंद्र मोदी यांची ‘पोस्ट’ आहे, संसदीय लोकशाहीत एवढेच पुरेसे आहे का? ट्रम्प म्हणतात की है कृषी क्षेत्राशी संबंधित आहे, मग भारतीय शेतकऱ्यांसाठी सुरक्षा तरतुदी काय आहेत, असा सवाल जरूर यांनी केला, ते पुढे म्हणाले की, ट्रम्प याला ५०० अब्ज डॉलर्सचा करार म्हणत आहेत.
वॉशिंग्टनमध्ये मोगॅम्बो खुश आहे. मोदींनी अखेर हार मानली असे दिसते, असे काँग्रेस सरचिटणीस जयराम रमेश यांनी म्हटले. भारत आता रशिया सोडून अमेरिका, व्हेनेझुएलाकडून तेल खरेदी करणार का? अमेरिकेकडून जास्त माल खरेदी करण्याच्या अटीमुळे ‘मेक इन इंडिया चे काय होणार?, असे सवाल त्यांनी उपस्थित केले.
भारतीय क्षेपणास्त्रांची ताकद वाढली! DRDO कडून ‘SFDR’ तंत्रज्ञानाची यशस्वी चाचणी; शत्रूचा थरकाप उडणार
काँग्रेस खासदार रणदीप सुरजेवाला यांनी सरकारला विचारले की, अमेरिकेचे कापूस, मका, गहू, दुग्धजन्य पदार्थ आणि सफरचंद भारतात कोणत्याही टेरिफशिवाय विकले गेले, तर भारतीय शेतकऱ्यांचे काय होईल? आधी तीन काळ्या कायद्यांद्वारे शेती विकण्याचा कट रचला गेला आणि आता अमेरिकन उत्पादनांना मुक्त रान दिले जात आहे. सरकारने हा करार संसदेत मांडून त्यावर चर्चा करावी.
लोकसभेत राहुल गांधींच्या भाषणावरून सलग दुसऱ्या दिवशी गोंधळ झाला. राहुल यांनी मंगळवारी दुपारी २ वाजता माजी लग्करप्रमुखांच्या अप्रकाशित पुस्तकातील एक लेख सभागृहात मांडला. ते म्हणाले, मला बोलू दिले जावे. मी विरोधी पक्षनेता आहे. मी राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा उपस्थित केला आहे. भारत आणि चीनमध्ये काय घडले, हे मी सांगत आहे. पूर्व लडाखमध्ये आपले सैनिक शहीद झाले. त्यांनी असे म्हणताच एनडीए खासदारांनी त्यांना रोखण्यास सुरुवात केली. राहुल १४ मिनिटे बोलण्याचा प्रयत्न करत होते, पण गदारोळ वाढत गेला. सोमवारीही त्यांनी ४६ मिनिटे बोलण्याचा प्रयत्न केला होता.
स्पीकरच्या दिशेने कागद फेकल्याची घटना सभागृहाच्या मयदिचे उल्लंधन मानली गेली. पीठासीन अधिकारी सैकिया यानी काँग्रेसचे भंडारा-गोंदियाचे खासदार प्रशांत पडोळे, लुधियानाचे खासदार अमरिंदरसिंग राजा वाडिंग, मणिकम टागोर, किरण कुमार रेड्डी, हिबी ईडन, गुरुजीत औजला, डीन कुरियाकोस आणि एस. वेंकटेशन या ८ खासदारांना संपूर्ण अधिवेशनासाठी निलंबित केले.






