दिल्लीत भाजपच्या विजयावर पंतप्रधान मोदींची प्रतिक्रिया (फोटो- ट्विटर)
Delhi Assembly Election Result 2025: दिल्ली विधानसभा निवडणुकीत आपचा दारूण पराभव होताना दिसत असून २७ वर्षांनंतर दिल्लीची सूत्र भाजपच्या हातात जाताना दिसत आहेत. भाजपला सर्वात मोठा धक्का अरविंद केजरीवाल यांच्या पराभवाने बसला आहे. तब्बल 27 वर्षांनी दिल्लीत भाजपचे कमळ फुलले आहे. दरम्यान हा विजय साजरा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज भाजप मुख्यालयात जाऊन कार्यकर्त्याना संबोधित करण्याची शक्यता आहे. दरम्यान भाजपने मिळवलेल्या यशावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करत जनतेचे आणि कार्यकर्त्यांचे आभार मानले आहेत.
दिल्ली विधानसभेत भाजपने 70 पैकी 48 जागा जिंकल्या आहेत. आम आदमी पक्षाचा सुपडा साफ झाला आहे. अरविंद केजरीवाल यांचा दारुण पराभव झाला आहे. भाजपचे दिल्लीत 27 वर्षांनी सरकार स्थापन होणार आहे. केजरीवाल यांचा पराभव करणारे प्रवेश वर्मा हे दिल्लीचे नवीन मुख्यमंत्री होण्याची शक्यता आहे. दरम्यान भाजपच्या अभूतपूर्व विजयावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी?
लोकशक्ती सर्वोतोपरी! विकास जिंकला, सुशासन जिंकले..
दिल्लीतील माझ्या सर्व बंधू आणि भगिनींना भाजपला ऐतिहासिक विजय मिळवून दिल्याबद्दल माझा प्रणाम आणि अभिनंदन. तुम्ही दिलेल्या भरपूर आशीर्वादासाठी आणि प्रेमासाठी मी तुम्हा सर्वांचा मनापासून आभारी आहे.
जनशक्ति सर्वोपरि!
विकास जीता, सुशासन जीता।
दिल्ली के अपने सभी भाई-बहनों को @BJP4India को ऐतिहासिक जीत दिलाने के लिए मेरा वंदन और अभिनंदन! आपने जो भरपूर आशीर्वाद और स्नेह दिया है, उसके लिए आप सभी का हृदय से बहुत-बहुत आभार।
दिल्ली के चौतरफा विकास और यहां के लोगों का जीवन उत्तम…
— Narendra Modi (@narendramodi) February 8, 2025
दिल्लीचा सर्वांगीण विकास सुनिश्चित करण्यासाठी आणि तेथील लोकांचे जीवन सुधारण्यासाठी आम्ही कोणतीही कसर सोडणार नाही. हा आमचा विश्वास आहे. यासोबतच, विकसित भारताच्या निर्मितीमध्ये दिल्लीची भूमिका महत्त्वाची राहील याचीही आम्ही खात्री करून घेऊ.
मला भाजपच्या विजयासाठी अहोरात्र काम करणाऱ्या माझ्या सर्व कार्यकर्त्यांचा खूप अभिमान आहे. आता आम्ही आमच्या दिल्लीकरांची सेवा अधिक दृढतेने करण्यासाठी समर्पित राहू.
पराभवानंतर अरविंद केजरीवालांची पहिली प्रतिक्रिया
दिल्लीत झालेल्या पराभवानंतर माजी मुख्यमंत्री आणि आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. केजरीवाल म्हणाले, “आज दिल्ली विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. दिल्लीच्या जनतेने जो निर्णय दिला आहे, तो आम्ही अत्यंत विनम्रतेने स्वीकारतो. मी भाजपचे विजयाबद्दल अभिनंदन करतो. दिल्लीच्या जनतेने ज्या अपेक्षेने भाजपला विजयी केले आहे, ते त्या अपेक्षा पूर्ण करतील अशी मी आशा व्यक्त करतो.”
पुढे बोलताना अरविंद केजरीवाल म्हणाले, “गेली 10 वर्षे जनतेने आम्हाला काम करण्याची संधी दिली. त्या कार्यकाळात आम्ही खूप कामे केली. आरोग्य , वीज, शिक्षण आणि अन्य क्षेत्रात जनतेला चांगल्या सोयी देण्याचा प्रयत्न केला. जनतेने जो निर्णय दिला आहे, त्यानुसार आम्ही मजबूत विरोधी पक्ष म्हणून आमची जबाबदारी पार पाडू. लोकांच्या आनंदात, दुखा:त आम्ही सहभागी होऊ. आम्ही राजकारणात सत्तेसाठी आलेलो नव्हतो. तर आम्ही लोकांच्या सेवेसाठी राजकारण हे एक साधन समजत आलो आहोत.