Photo Credit : Social Media
नवी दिल्ली: दिल्लीत आम आदमी पक्ष आणि काँग्रेसने लोकसभा निवडणूक एकत्र निवडणूक लढले होते. लोकसभा निवडणुकीत इंडिया अलायन्स (काँग्रेस-आप) दिल्लीत एकही जागा जिंकू शकली नाही. पराभवाचा आढावा घेण्यासाठी काँग्रेसने काही दिवसांपूर्वी दिल्लीत बैठक बोलावली होती. यात दिल्लीतील लोकसभा निवडणुकीतील पराभवाची कारणे शोधण्यात आली. यानुसार काँग्रेस आणि आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये समन्वयाचा अभाव असल्याने या पराभवामागचे कारण सांगितले जात आहे.
राष्ट्रीय पातळीवर आप आणि काँग्रेसमध्ये युती होती, पण दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना ही युती तळागाळात मजबूत करता आली नाही. दोन्ही पक्षांमध्ये समन्वयाचा अभाव देखील होता, ज्यामुळे राजधानीतील सातही जागांवर इंडिया आघाडीचा पराभव झाला. मात्र या निवडणुकीत आम आदमी पक्षासोबतच्या युतीचा दिल्लीत काँग्रेसला फारसा फायदा झाला नाही.
आम आदमी पार्टीने 2024 ची लोकसभा निवडणूक काँग्रेससोबत आघाडी करून लढवली होती. या निवडणुकीत आम आदमी पक्षाची मतांची टक्केवारी 24.17 टक्के होती, तर काँग्रेसला 18.91 टक्के मते मिळाली होती. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला 22.51% मते मिळाली, तर आम आदमी पार्टीला 18.11% मते मिळाली. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने सातही जागा जिंकल्या होत्या. पाच जागांवर काँग्रेसचे उमेदवार दुसऱ्या, तर आम आदमी पक्षाचे उमेदवार दोन जागांवर दुसऱ्या क्रमांकावर आहेत.
2024 मध्ये आम आदमी पार्टीने काँग्रेसपेक्षा एक जागा जास्त लढवली होती. काँग्रेसने तीन जागांवर तर आम आदमी पार्टीने चार जागांवर निवडणूक लढवली. या कारणास्तव 2019 च्या तुलनेत 2024 मध्ये आम आदमी पक्षाच्या मतांची टक्केवारी वाढली. तसेच, आम आदमी पक्षाने ज्या जागा लढवल्या त्या लोकसंख्येच्या आधारावरही मोठ्या आहेत, त्यामुळे 2024 मध्ये पक्षाची मतांची टक्केवारी मागील निवडणुकीपेक्षा वाढली आहे.
या निवडणुकीत भाजपची मतांची टक्केवारी 56.86% वरून 54.35% घसरली असली तरी, त्यांनी दिल्लीच्या सर्व सात जागा जिंकल्या. विशेष बाब म्हणजे जेजे क्लस्टर या झोपडपट्टी भागातही भाजपने आम आदमी पक्षाचा पराभव करत त्यांच्या बाल्लेकिल्ल्याला सुरुंग लावला.
२०२४ च्या लोकसभा निकाल पाहता विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने विचार केला तर करावल नगर, घोंडा, रोहतास नगर, बुरारी या जागांवर काँग्रेसची कामगिरी अत्यंत खराब आहे. महाबल मिश्रा, अरविंदर सिंग लवली, प्रल्हाद सिंग साहनी, नीरज बसोया, राजकुमार चौहान यांसारख्या लोकांनी वेगवेगळ्या कारणांमुळे काँग्रेस सोडली. अशा स्थितीत राजधानीत पक्षाची संघटना गेल्या काही वर्षांत खूपच कमकुवत झाली आहे. आता अशा स्थितीत दिल्लीतील विधानसभा निवडणुकीपूर्वी पुन्हा एकदा काँग्रेस संघटन बांधण्याचे मोठे आव्हान पक्षासमोर असेल.