यंदा देशात कसा असणार मान्सून? (फोटो- istockphoto)
देशात यंदा पावसाचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता
मान्सूनवर अल निनोचा प्रभाव राहण्याची शक्यता
मान्सूनबाबत समोर आली महत्वाची माहिती
India Monsoon Update: राज्यात सध्या तापमान वाढताना दिसून येत आहे. जून महिन्यापासून पावसाळ्याला सुरूवात होईल. त्यामुळे यंदा देशात पाऊस कसाअसेल आणि मान्सूनची स्थिती कशी असेल याबाबत माहिती जाणून घेऊयात. मागील वर्षी मान्सून वेळेआधीच दाखल झाला होता. त्यामुळे राज्याला आणि देशातील अनेक भागांना अतिवृष्टीचा फटका बसला होता. मात्र यंदा स्थिती कशी असणार? मान्सून कसा राहणार? याबाबत अधिक माहिती जाणून घेऊयात.
गेल्या वर्षी मान्सून देशात वेळेआधीच दाखल झाला होता. अतिवृष्टी झाली होती. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. दरम्यान जागतिक हवामान संघटनेने मान्सूनबाबतचा पहिला अंदाज जाहीर केला आहे. यामुळे चिंता वाढल्याचे दिसून येत आहे.
यावर्षी भारतात मान्सूनवर अल निनोचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे. जर हा अंदाज खरा ठरला तर भारतात यावर्षी पावसाचे प्रमाण कमी राहू शकते. त्यामुळे महाराष्ट्रात देखील पावसाचे प्रमाण कमी राहू शकते. मात्र यंदा उन्हाळा मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
India Weather: लई अवघड रे गड्या! छत्री, रेनकोट सोडा अन्…; देशात यंदा उष्णतेचा कहर असणार
देशात यंदा उष्णतेचा कहर असणार
भारतीय हवामान विभागाने मार्च ते मे या कालावधीसाठीचा हंगामी तापमान आणि पावसाचा अंदाज नुकताच जाहीर केला. यंदा देशातील उन्हाळा अधिक तीव्र होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मार्च ते मे २०२६ या कालावधीत देशातील बहुतांश भागांत कमाल तसेच किमान तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. काही भागांत उष्णतेच्या लाटांचे प्रमाणही वाढण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
Heat Wave: उष्णतेचा हाहा:कार; महाराष्ट्र ‘या’ भागात भयानक उन्हाळा, नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन
हवामान विभागाच्या अंदाजानुसार संपूर्ण उन्हाळी हंगामात देशातील बहुतेक भागांत किमान तापमानही सरासरीपेक्षा जास्त राहू शकते. मात्र दक्षिण भारतातील काही भाग आणि काही इतर ठिकाणी किमान तापमान सामान्य ते किंचित कमी राहण्याची शक्यता आहे. मार्च २०२६ महिन्याचा विचार करता देशातील अनेक भागांत कमाल तापमान सामान्य ते किंचित कमी राहण्याची शक्यता आहे. मात्र ईशान्य भारत, पूर्व भारतातील काही भाग, पश्चिम हिमालयीन प्रदेश तसेच मध्य आणि द्वीपकल्पीय भारतातील काही भागांत कमाल तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याचा अंदाज आहे. त्याचप्रमाणे मार्च महिन्यात देशातील बहुतांश भागांत किमान तापमान सरासरीपेक्षा जास्त राहू शकते. तर उत्तर-पश्चिम भारत, दक्षिण द्वीपकल्प आणि पूर्व किनारपट्टीवरील काही भागांत किमान तापमान सामान्य ते कमी राहण्याची शक्यता आहे.






