धर्मशाला: पहिल्या टी- २०I मध्ये दणदणीत विजय मिळवल्यानंतर, रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ आज धर्मशाला येथे मालिका जिंकण्याचे लक्ष्य ठेवणार आहे. दुसऱ्या टी-२० मध्ये पावसामुळे खेळाची मजा खराब होऊ शकते. या सामन्यापूर्वी टीम इंडियाला मोठा झटका बसला आहे. ऋतुराज गायकवाडही दुखापतीमुळे संघाबाहेर आहे. त्याच्या जागी मयंक अग्रवालला संघाचा भाग बनवण्यात आले आहे.
लखनऊ मध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या सामन्यात इशान किशनने ८९ धावांची शानदार खेळी करत फॉर्ममध्ये पुनरागमन केले. त्याचवेळी विराट कोहलीच्या जागी तिसऱ्या क्रमांकावर खेळणाऱ्या श्रेयस अय्यरनेही आपल्या बॅटने अप्रतिम खेळ करत नाबाद ५७ धावा केल्या. या दोघांनी भारताला १९९ धावांची मोठी धावसंख्या गाठण्यास मदत केली. अशा स्थितीत आजच्या सामन्यात या दोन खेळाडूंकडून पुन्हा एकदा मोठ्या खेळीची अपेक्षा आहे. टीम इंडियाने गेल्या १० टी-२० सामन्यांमध्ये पराभव केलेला नाही.