फोटो सौजन्य- pinterest
महाराष्ट्रातील असंख्य कुटुंबांचे कुलदैवत मानले जाणारे ज्योतिबा हे भक्तांच्या श्रद्धेचे प्रमुख केंद्र आहे. “ज्योतिबाच्या नावानं चांगभलं!” हा जयघोष आजही यात्रांमध्ये, उत्सवांमध्ये आणि भक्तांच्या ओठांवर घुमताना ऐकू येतो. या जयघोषामागे दडलेली आहे एक अद्भुत पौराणिक कथा.
महाराष्ट्रातील कोल्हापूरजवळील वाडी रत्नागिरी डोंगरावरती बसलेलं ज्योतिबा देवस्थान हे अत्यंत प्रसिद्ध आणि श्रद्धास्थान मानलं जातं. ज्योतिबा या देवतेलाच ज्योतिर्लिंग, केंदारलिंग, रवळनाथ आणि सौदागर अशा विविध अंगांनी उल्लेखतात. ज्योतिबा हे ब्रह्मा, विष्णू, महेश जमदग्नी ऋषी आणि बारा सूर्यांचा तेजःपुंज अवतार आहे. यातील केदारलिंग हे भगवान शिवाचं रुप मानलं जातं आणि ते अन्याय आणि दृष्ट शक्तीचं नाश करणारे म्हणून ओळखले जाते. कोल्हापूरच्या महालक्ष्मी देवीशी ज्योतिबांचा घनिष्ट संबंध मानला जातो.
या मंदिरांची रचना पारंपरिक आणि भव्य आहे. उंच डोंगरावर बसलेलं हे मंदिर दगडी बांधकामाचं असून त्यावरती सुंदर कोरीव काम दिसतं. मंदिरात ज्योतिबा देवाची मूर्ती असून ती काळ्या पाषाणातील आहे. मंदिर परिसरात अनेक छोटी मंदिर आणि दीपमाळा दिसतात. येथील वातावरण प्रसन्न आणि आध्यात्मिक वाटतं. डोंगरावरूनच आसपासचा परिसर खूपच सुंदर दिसतो. त्यामुळे धार्मिकतेसोबत निसर्गसौदर्यांचा देखील आनंद मिळतो. येथील मंदिराचं सर्वांत मोठ वैशिष्ट्य म्हणजे येथे होणारा गुलाल उत्सव. दरवर्षी चैत्र महिन्यात येथे मोठी यात्रा भरते. याला चैत्र यात्रा असे म्हणतात. या काळात लाखो भाविक ज्योतिबांच्या दर्शनासाठी येतात आणि संपूर्ण मंदिर परिसर गुलालाने गुलाबी रंगांत न्हाहून निघतो. “ज्योतिबाच्या नावानं चांगभलं!” या जयघोषाने वातावरण दुमदुमून जातं. हा उत्सव महाराष्ट्रातील सर्वांत वेगळ्या आणि रंगीबेरंगी धार्मिक परंपरापैकी एक मानला जातो.
ज्योतिबा देवाची पौराणिक कथा अशी सांगितली जाते की, पूर्वी या भागात रत्नासूर आणि कोल्हासूर असे दोन दैत्य लोकांना त्रास देत होते. यावेळी देवी महालक्ष्मी दृष्टांचा नाश करण्यासाठी भगवान शिवाला मदतीसाठी पाचारण केलं त्यावर भगवान शिवांनी ज्योतिबा रुपात अवतार घेतला. आपल्या सहकार्यासह या दैत्यांवरती युद्ध करून पराभव मिळवला या विजयामुळे परिसरात शांतता प्रस्थापित झाली आणि ज्योतिबा हे रक्षकदेव म्हणून प्रसिद्ध झाले.
ज्योतिबा देवस्थानाचे धार्मिक महत्त्व खूप मोठं आहे येथे भक्त येऊन आपल्या इच्छा व्यक्त करतात आणि अडचणी दूर व्हाव्यात म्हणून यासाठी प्रार्थना करतात. विशेषतः नवस पूर्ण करण्यासाठी लोक येथे आवर्जुन येतात. असे मानले जाते की, ज्योतिबा देव आपल्या भक्ताचं रक्षण करतात आणि त्यांना संकटांपासून दूर ठेवतात. ज्योतिबा मंदिर हे केवळ धार्मिक स्थान नसून श्रद्धा, परंपरा आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक ओळखीच प्रतीक आहे. येथे येणाऱ्या प्रत्येक भाविकाला भक्ती, ऊर्जा आणि समाधानाचा एक वेगळाचं अनुभव मिळतो.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)
Ans: ज्योतिबा हे महाराष्ट्रातील एक पूजनीय देवता असून अनेक कुटुंबांचे कुलदैवत मानले जातात. त्यांना भगवान शिवाचे रूप मानले जाते.
Ans: या जयघोषाचा अर्थ — ज्योतिबाच्या कृपेने सर्व काही चांगले होवो. हा भक्ती, विश्वास आणि सकारात्मकतेचा प्रतीक आहे.
Ans: ज्योतिबाने राक्षसांचा नाश करून धर्माचे रक्षण केले, अशी पौराणिक कथा सांगितली जाते. त्यामुळे ते रक्षणकर्ता देव मानले जातात.






