कडाक्याच्या गर्मीमध्ये हार्ट अटॅक येतो का? उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये 'का' वाढतो हार्ट अटॅकचा धोका, जाणून घ्या यामागील कारण
जगभरात हार्ट अटॅकसारख्या गंभीर आजारांच्या रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. कोणत्याही क्षणी हार्ट अटॅक येऊन मृत्यू सुद्धा होऊ शकतो. कडाक्याच्या उन्हाळ्यात शरीरसंबंधित अनेक समस्या उद्भवतात. उष्माघात, डिहाड्रेशन तर काहीवेळा हृद्यासंबंधित समस्या उद्भवण्याची जास्त शक्यता असते. उन्हाळ्याच्या दिसवांमध्ये सतत येणाऱ्या घामामुळे शरीरातील पाणी आणि आवश्यक इलेक्ट्रोलाइट्स बाहेर पडून जाते. शरीरातील इलेक्ट्रोलाइट्सची पातळी कमी झाल्यामुळे रक्त घट्ट होऊन रक्ताच्या गुठळ्या, अतालता, कमी रक्तदाब आणि हृदयविकाराचा झटका येऊन कोणत्याही क्षणी मृत्यू सुद्धा होऊ शकतो. त्यामुळे शरीराची योग्य काळजी घेणे फार आवश्यक आहे. मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार किंवा किडनीच्या आजारांनी ग्रस्त व्यक्तींनी हार्ट अटॅक येण्याची शक्यता खूप जास्त असते.(फोटो सौजन्य – istock)
हार्ट अटॅक येण्याच्या प्रमुख कारण केवळ रक्तवाहिन्यांमध्ये वाढलेले कोलेस्ट्रॉल नसून शरीरातील पाण्याची पातळी कमी होणे, बिघडलेली इलेक्ट्रोलाइट्सचे संतुलन इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम हृदयाच्या आरोग्यावर पडतो. त्यामुळे पाण्याची पातळी कमी झाल्यानंतर हृदयावर जास्तीचा तणाव येतो आणि रक्तप्रवाहात अनेक अडथळे निर्माण होतात. चला तर जाणून घेऊया कडाक्याच्या उष्णतेचा हृदयाच्या आरोग्यावर नेमका कसा परिणाम होतो आणि यामागील कारणे.
मानवी शरीराचे तापमान स्थिर राहण्यासाठी अंतर्गत अनेक शारीरिक हालचाली होतात. जेव्हा बाहेरील तापमानामध्ये वाढ होते, तेव्हा शरीर त्वचा आणि घामाच्या माध्यमातून उष्णता बाहेर टाकण्यास सुरुवात करते. यामुळे त्वचेवरील रक्तवाहिन्या रुंदावतात आणि तिथला रक्तप्रवाहाचा वेग वाढतो. यामुळे हृदयाला जास्तीची हालचाल करावी लागते. हृदयावर आलेला जास्तीचा तणाव निरोगी व्यक्ती सहन करते पण वाढलेले वय आणि गंभीर आजाराने त्रस्त असलेल्या व्यक्तींना हा तणाव सहन होत नाही. त्यामुळे वाढत्या उन्हाळ्यात शरीराची काळजी घेणे फार आवश्यक आहे.
उष्णता वाढल्यामुळे घामावाटे शरीरातील पाणी आणि सोडियम-पोटॅशियमसारखे अतिशय महत्वाचे घटक बाहेर पडून जातात. यामुळे शरीरात डिहायड्रेशनचा धोका वाढण्याची शक्यता असते. वाढत्या डिहायड्रेशनचा थेट हद्य आणि रक्तवाहिन्यावर होतो. शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्यानंतर रक्ताची पातळीसुद्धा कमी होऊन जाते. रक्त नेहमीपेक्षा जास्त घट्ट किंवा जाड होते ज्यामुळे रक्त पंप करण्यासाठी प्रचंड कष्ट करावे लागतात. या प्रक्रियेमुळे रक्ताच्या गुठळ्या होण्याचे प्रमाण झपाट्याने वाढू लागते. तयार झालेल्या गुठळ्या हृदयाच्या धमन्यांमध्ये अडकल्या तर हार्ट अटॅक किंवा मेंदूमध्ये स्ट्रोक येण्याची जास्त शक्याता असते.
डिहायड्रेशन आणि रक्तवाहिन्या रुंदावल्यामुळे शरीराचा रक्तदाब अचानक कमी होऊन जातो. यामुळे हृदयाला आवश्यक प्रमाणात ऑक्सिजन पुरवठा होत नाही. घामावाटे शरीरातील इलेक्ट्रोलाइट्स पातळी कमी होऊन जाते, ज्यामुळे हृदयाची विद्युत यंत्रणा बिघडून शरीराला धोका निर्माण होतो. त्यामुळे कडाक्याच्या उन्हाळ्यात बाहेर जाणे टाळावे. हृदयविकार किंवा हाय बीपीसाठी दिल्या जाणाऱ्या डायुरेटिक्स गोळ्या शरीरातील पाण्याची पातळी कमी करून टाकतात. यामुळे उष्णतेचा धोका वाढतो.
Ans: होय, अतिउष्ण हवामानामुळे शरीरावर ताण येऊ शकतो. उष्णतेमुळे शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी हृदयाला जास्त मेहनत घ्यावी लागू शकते, त्यामुळे काही लोकांमध्ये हृदयाशी संबंधित धोका वाढू शकतो.
Ans: जास्त उष्णतेमुळे शरीरातून घामाद्वारे पाणी आणि क्षार कमी होऊ शकतात. यामुळे डिहायड्रेशन, रक्तदाबातील बदल आणि हृदयावर अतिरिक्त ताण येऊ शकतो.
Ans: हृदयविकार असलेले, उच्च रक्तदाब किंवा मधुमेह असलेले, वृद्ध व्यक्ती आणि जास्त शारीरिक मेहनत करणाऱ्या लोकांनी विशेष काळजी घ्यावी.






