दिल्लीमधील आंदोलनात वापरण्यात आलेले अश्रूधूर नळकांडे म्हणजे काय? जाणून घ्या शरीरावर होणारे गंभीर दुष्परिणाम
अश्रूधूर नळकांडे म्हणजे काय?
अश्रूधूर नळकांड्याचा शरीरावर होणारा परिणाम:
अश्रूधूर सोडल्यानंतर लगेच काय करावे?
मागील काही दिवसांपासून राजधानी दिल्लीमध्ये तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी नीट-यूजी पेपरफुटीबद्दल जबाबदारी निश्चित करण्यासाठी कॉकरोच जनता पार्टीने (CJP) आंदोलन केले. या आंदोलनात हजारोच्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत हजारो आंदोलकांनी संसद भवनाकडे मोर्चा काढला.त्यानंतर दिल्ली पोलिसांनी आंदोलकांना रोखले. उपस्थित आंदोलकांना पांगवण्यासाठी सुरक्षा दलांनी अश्रुधूर आणि लाठीचार्ज केला. यामध्ये अनेक विद्यार्थी जखमी झाले आहेत. याशिवाय आंदोलन स्थळी सोडण्यात आलेल्या अश्रुघुरांचे नळकांडे 2020 मध्येच एक्सपायर झाले होते. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी अश्रुघुरासोबत आंदोलकांवर लाठीचार्ज केला. दिल्लीमध्ये घडलेल्या या घटनेमुळे अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण झाले आहेत. चला तर जाणून घेऊया अश्रूधूर नळकांडे म्हणजे काय? अश्रूधूर नळकांड्याचा शरीरावर होणारा परिणाम, याबद्दल सविस्तर माहिती.(फोटो सौजन्य – istock)
दिल्लीतील आंदोलन नियंत्रणात करण्यासाठी पोलिसांकडून अश्रूधूर नळकांडे सोडण्यात आले होते. पोलीस आणि सुरक्षा यंत्रणा जमावाला पांगवण्यासाठी याचा वापर केला जातो. अश्रूधूर नळकांडेमध्ये CS गॅस किंवा काही ठिकाणी CN गॅस सारख्या रासायनिक संयुगांचा वापर केला जातो. नळकांडे जमीनीवर सोडल्यानंतर त्यातून निघणाऱ्या धुरामुळे डोळ्यांसंबंधित समस्या उद्भवण्याची जास्त शक्यता असते. हा धूर गर्दीमध्ये सोडल्यानंतर अत्यंत वेगाने सगळीकडे पसरतो. यामुळे डोळे, नाक, घसा आणि श्वसनमार्गात तीव्र जळजळ आणि श्वास कोंड्यासारखा वाटतो.
अश्रूधूर नळकांडे सोडल्यानंतर त्याचा परिणाम तात्काळ होतो. काहीवेळा आसपासच्या परिसरात धूर होऊन डोळ्यांमध्ये जळजळ किंवा श्वासाच्या समस्या होतात. पण बंद जागेत अश्रूधूर नळकांडे सोडल्यास त्याचे परिणाम अतिशय घातक होतात. श्वासाचा आजार झाल्यामुळे फुफ्फुसांना गंभीर हानी पोहचण्याची शक्यता असते. दिल्लीमध्ये झालेल्या आंदोलनात अश्रूधूर नळकांडे सोडून तिथे निर्माण झालेली परिस्थिती नियंत्रणात आणली जाते. पण काहीवेळा तिथे उपस्थित असलेल्या व्यक्तींच्या शरीरावर गंभीर परिणाम होऊ शकतात.
Ans: अश्रूधूर नळकांडे (Tear Gas Canisters) ही कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी वापरली जाणारी साधने आहेत. ती फोडल्यानंतर डोळे, नाक आणि श्वसनमार्गाला तीव्र त्रास देणारा रासायनिक धूर पसरतो, ज्यामुळे गर्दी विखुरण्यास मदत होते.
Ans: हिंसक किंवा नियंत्रणाबाहेर गेलेल्या जमावाला पांगवण्यासाठी आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस किंवा सुरक्षा यंत्रणा अश्रूधूरचा वापर करू शकतात.
Ans: डोळ्यांत जळजळ, सतत पाणी येणे, खोकला, श्वास घेण्यास त्रास, नाक आणि घशात जळजळ तसेच त्वचेवर चुरचुर होणे अशी लक्षणे दिसू शकतात.






