आतड्यांमध्ये वाढलेल्या विषाणूमुळे कोणत्याही क्षणी येऊ शकतो हार्ट अटॅक किंवा स्टोक, आतडे स्वच्छ करण्यासाठी करा 'हे' घरगुती उपाय
आतड्यांमध्ये खराब विषाणू का वाढतात?
आतडे स्वच्छ करण्यासाठी उपाय?
गट हेल्थ बिघडल्यानंतर दिसून येणारी लक्षणे?
अन्नपदार्थ खाल्ल्यानंतर पोटातून आतड्यांमध्ये जातात. आतड्यांमध्ये गेल्यानंतर चांगले विषाणू अन्नपदार्थ पचन करण्यासाठी मदत करतात. पण काहीवेळा आतड्यांमध्ये साचून राहिलेल्या विषारी घटकांमुळे आरोग्य बिघडण्याची खूप जास्त शक्यता असते. आतड्यांमध्ये जमा झालेली विषारी घाण संपूर्ण शरीराचे गंभीर नुकसान करते. हे सूक्षम विषाणू केवळ अन्नपदार्थ पचन करण्यासाठीच नाहीतर हृदयाचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी सुद्धा मदत करतात. पण आतड्यांमधील विषाणूचे संतुलन बिघडल्यानंतर रक्तदाब, कोलेस्ट्रॉल आणि रक्तवाहिन्यांमध्ये सूज वाढते आणि गंभीर आजार होतात. त्यामुळे पचनसंस्था चांगली ठेवण्यासाठी केवळ अन्नपदार्थांच नाहीतर पुरेशी झोप, व्यायाम आणि प्रोबायोटिक्सचा समावेश आहारात असणे तितकेच महत्वाचे आहे. आतडे निरोगी राहिल्यास संपूर्ण शरीर कायमच हेल्दी राहील. चला तर जाणून घेऊया आतडे स्वच्छ करण्यासाठी कोणते उपाय करावेत.(फोटो सौजन्य – istock)
फक्त चवच नाही तर आरोग्याचा खजिना; दररोज खा अननस आणि मिळवा हे 7 आश्चर्यकारक फायदे
पचनसंस्थेमधील चांगले आणि वाईट विषाणू शरीरातील कोलेस्ट्रॉवर परिणाम करतात. यामुळे कोणत्याही क्षणी शरीरातील रक्तदाबाची पातळी वाढते. चुकीचे अन्नपदार्थ खाल्ल्यानंतर त्यात असलेले वाईट विषाणू आतड्यांमध्ये जातात. आतड्यांमध्ये गेल्यानंतर ते थेट रक्तप्रवाहात मिसळून हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये सूज निर्माण करतात. शरीराची पचनसंस्था आणि हृदय एकमेकांशी जोडलेले असतात. आतड्यांमधील बॅक्टेरिया अन्नाचे विघटन करून मेटाबोलाइट्स तयार करतात. जे रक्ताद्वारे हृदयापर्यंत पोहोचतात. पण पचनसंस्था खराब झाल्यानंतर आतड्यांतील विषारी घटक रक्तप्रवाहात प्रवेश करतात आणि हृदयाच्या स्नायूंना कमकुवत करून टाकतात.
आतड्यांमधील चांगले विषाणू शरीरातील सूज नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात. पण शरीरात वाईट विषाणूची पातळी वाढल्यानंतर ‘साइटोकिन्स’ नावाचा घटक मोठ्या प्रमाणावर वाढतो, ज्यामुळे रक्तवाहिन्या आतून सूज येते. फायबर युक्त पदार्थ खाल्ल्यामुळे पचनाच्या समस्या अजिबात उद्भवत नाही आणि आतड्या सुद्धा स्वच्छ राहतात.
पचनक्रिया बिघडल्यानंतर ती पुन्हा चांगली करण्यासाठी खूप जास्त वेळ लागतो. दैनंदिन आहारात तिखट, तेलकट किंवा अतिमसालेदार पदार्थ खाल्यामुळे शरीराच्या पचनक्रियेवर परिणाम होतात. त्यामुळे आहारात सहज पचन होणाऱ्या पदार्थांचे सेवन करावे. पालेभाज्या, फळे, फायबरयुक्त पदार्थ, पोषक आहार, भरपूर पाणी, कडधान्य इत्यादो पदार्थ आतड्यांमध्ये चांगल्या बॅक्टेरियांना वाढवतात.
दिवसभरात कमीत कमी ३ ते ४ लिटर पाणी पिणे आवश्यक आहे. भरपूर पाण्याच्या सेवनामुळे आतड्यांमधील घाण बाहेर पडून जाते आणि शरीर स्वच्छ होते. आतड्यांमधील जमा झालेला विषारी मल पाण्याच्या सेवनामुळे मऊ होतो. आतडे डिटॉक्स करण्यासाठी भरपूर पाणी आणि इतर डिटॉक्स पेयांचे सेवन करणे आवश्यक आहे. जास्त साखर, मैदा आणि ट्रान्स फॅट पचनसंस्थेतील बॅक्टेरियांचे संतुलन बिघडून जातात. त्यामुळे हे पदार्थ अजिबात खाऊ नये. याशिवाय रोजच्या आहारात दही, ताक, आंबवलेले पदार्थ खाल्यास पचनक्रिया निरोगी राहील.
Ans: आपल्या पचनसंस्थेत (आतड्यात) राहणाऱ्या सूक्ष्मजीवांचे (बॅक्टेरिया) संतुलन, जे अन्न पचवण्यास आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतात.
Ans: नियमित शौचास होणे, पोट फुगणे किंवा बद्धकोष्ठता नसणे, चांगली ऊर्जा पातळी आणि अन्नाची ऍलर्जी नसणे.
Ans: लसूण, कांदा, केळी, ओट्स यांसारखे पदार्थ खा, जे चांगल्या बॅक्टेरियाला खायला देतात.






