(फोटो सौजन्य: istock)
अपुरी झोप, कामाचा तणाव आणि शरीरात वाढत असलेले साखरेचे प्रमाण आपली स्मरणशक्ती कमकुवत करतात आणि यामुळे आपल्याला एकाग्र राहण्यास अडथळे निर्माण होतात. मेंदूला तल्लख आणि निरोगी ठेवण्यासाठी काय करायला हवं यासाठी डाॅक्टर सूद यांनी आपल्या @doctorsoood इंस्टाग्राम अकाऊंटवर एक काही टिप्स शेअर केल्या आहेत. चला याविषयी सविस्तर जाणून घेऊयात.
अपुऱ्या झोपेमुळे मेंदूचे भाग आकुंचन पावू शकतात
झोपेच्या कमतरतेमुळे ग्रे मॅटरचे प्रमाण कमी होते आणि हिप्पोकॅम्पसचा ऱ्हास होतो, जे स्मरणशक्ती वाढवण्यात महत्त्वाचे घटक मानले जातात. अगदी थोड्या काळासाठी झोप कमी झाल्यानेही मेंदूच्या रचनेत बदल होऊ शकतो. दीर्घकाळ अपुऱ्या झोपेमुळे न्यूरोजेनेसिसमध्ये अडथळा, सिनॅप्टिक व्यत्यय आणि बीटा-अमायलॉइड सारख्या टाकाऊ पदार्थांना शरीराबाहेर काढता येत नाही ज्यामुळे मेंदूचे वृद्धत्व वाढू शकते.
स्मरणशक्ती आणि एकाग्रता कमी होते
दीर्घकाळ टिकणाऱ्या तणावामुळे शरीरातील कॉर्टिसोलची पातळी वाढते ज्याचा थेट परिणाम हिप्पोकॅम्पस आणि प्रीफ्रंटल कॉर्टेक्सवर होतो. कालांतराने यामुळे न्यूरोजेनेसिस कमी होतो, सिनॅप्टिक सिग्नलिंगमध्ये व्यत्यय येतो. यामुळे लक्ष, कार्यकारी स्मृती आणि निर्णयक्षमता कमी होते. दीर्घकालीन ताणामुळे न्यूरोइन्फ्लेमेशन आणि ऑक्सिडेटिव्ह नुकसान देखील वाढते.
मेंदूचे वृद्धत्व वाढते
रक्तातील साखरेचे प्रमाण वाढले की त्याचा परिणाम मेंदूवरही होऊ लागतो. दीर्घकालीन हायपरग्लायसेमियाचा संबंध बौद्धिक क्षमतेत वेगाने होणारी घट, मेंदूचा लहान आकार आणि मेंदूच्या सूक्ष्म रक्तवाहिन्यांच्या दुखापतीशी आहे. यामागील यंत्रणांमध्ये ऑक्सिडेटिव्ह ताण, दाह, मेंदूतील इन्सुलिन प्रतिरोध आणि मेंदूच्या लहान रक्तवाहिन्यांचे नुकसान यांचा समावेश होतो. यामुळे रक्तप्रवास आणि नर्व्ह सेल्सच्या कार्यात अडथळा निर्माण होतो.
स्मृतिभ्रंशाचा धोका वाढतो
संशोधनानुसार, श्रवणशक्ती कमी होणे हे स्मृतिभ्रंशाच्या वाढत्या धोक्याशी संबंधित आहे. यामागे काही सोपी कारणं आहेत जसे की, मेंदूवर जास्त ताण येणं, आवाज कमी ऐकू आल्यामुळे मेंदूत होणारे बदल आणि लोकांपासून दूर राहिल्यामुळे विचार करण्याची क्षमता कमी होणे.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.






